Friday, May 25, 2012

रोपट्यांची तहान भागविणारा ठिबक सिंचनाचा अभिनव उपक्रम

ग्लोबल वार्मिंगचे संकट संपूर्ण जगाला भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, महाराष्ट्रातही जमिनीची धूप होत आहे. दरवर्षी उन्हाबरोबरच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी जमिनीत पाणी साठवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. सिंचनाच्या सुविधा वाढवून शासन यासाठी प्रयत्न तर करीत आहेच त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनही याला हातभार लावला जात आहे. यादृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात रोपट्यांच्या वाढीसाठी राबविला जाणारा ठिबक सिंचनाचा अभिनव प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

ठिबक सिंचनाचे महत्व ओळखून शेतकरी आता शेतामध्ये या प्रणालीचा सर्रास वापर करू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागानेही, आता केवळ ‘पाणी वाचवा’ हा संदेश देऊन न थांबता ‘ठिबक’च्या एका अनोख्या उपक्रमातून वृक्षांची तहान भागवण्याला सुरूवात केली आहे.

Wednesday, May 23, 2012

देवचंद शिवणकर : काकडी पिकामुळे लखपती


‘इच्छा असली तेथे मार्ग निघतोच’. इतरांना दोष देऊन व स्वत:च्या कामावरुन पळपुटेपणा करणाऱ्यांना भाग्यही साथ देत नाही. याचा प्रत्यय मला आला आहे, असे मनोगत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिखलीचे हरहुन्नरी युवक शेतकरी देवचंद गोविंदा शिवणकर यांनी व्यक्त केले. मेहनतीच्या जोरावर काकडीचे भरघोस पीक घेतल्याने शिवणकर आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाले आहेत.देवचंद शिवणकर हे आदिवासी कास्तकार. त्यांनी राष्ट्रीय कृषी फलोत्पादन अभियानांतर्गत आपल्या शेतात हजार चौरस फूटाचे ग्रीनशेड-नेट हाऊस बांधण्यासाठी कनेरी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेकडे अडीच लाख रूपये कर्जाची मागणी केली. ह्या हजार चौरस फुटाचे ग्रीनशेड-नेट उभारण्यासाठी त्यांनी प्रथमत: तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला. ह्या तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी प्रकल्प बांधणी केलेल्या तांत्रिक मदतीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर काकडीचे उत्पादन घेण्याचे निर्धारित केले.

बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन


वाशिम जिल्ह्यातील शेजूबाजार पासून जवळच असलेल्या तपोवन गावातील शेतकरी बंडूजी किसन येवले यांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पिकास मुंबई-पुण्यामध्ये बटाटा असे नाव आहे. मात्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हे पीक आलू याच नावाने लोकप्रिय आहे. श्री. येवले यांच्याकडे एकूण १५ एकर शेती असून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्व शेती सिंचनाखाली आणली आहे. विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा, हरभरा, लसूण आदी पिके घेतली आहेत. बटाटा पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते याविषयी त्यांनी बरेच ऐकले होते. त्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता होती. यासाठी त्यांनी बटाटा या पिकाविषयी सर्व माहिती गोळा केली. आपल्या शेतात हे पीक घेणे शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले. 

Tuesday, May 22, 2012

ये फुलों की राणी....


असे म्हटले जाते की तुमच्याकडे दोन रूपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या (जेवण करा) आणि एक रुपयाची फुले. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुले तुम्हाला कसे जगायचे ते शिकवतील. ठाणे जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील भारती अविनाश सावे यांच्या बाबतीत हे अगदी प्रत्यक्षात आलेय. त्यानी फुलांना जगवलेय आणि कसे जगायचे ते फुलांनी त्यांना शिकवलेय. फुलझाडे लावण्याच्या त्यांच्या छंदाला त्यांनी फुलशेतीचे स्वरूप दिले आणि स्वतःबरोबरच परिसरातील आदिवासी भगिनींनाही त्यांनी कृषी क्षेत्रात सहभागी करून घेतले. 

त्यांचा जन्म वसई येथे १९५८ साली झाला. गरीब परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. त्यानंतर हिरे कंपनीत त्यांनी काम केले. तिथे सचोटीने काम केल्याने त्यांनी कुशल कामगार हा किताब मिळविला. लग्नानंतर सासरची परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. त्यामुळे पती अविनाश सावे यांना मदत म्हणून गावच्या बाजारात पटकन विकली जातील, अशी उत्पादने निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. इथेच त्यांची व्यापार वृत्ती (बिझनेस माईंड) दिसून येते. त्यानंतर कर्ज काढून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. 

माळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पाणी जातं,
गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवित.....

Tuesday, May 15, 2012

मेळघाटमध्ये सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन


चिखलदरा तालुक्‍यातील सोमवारखेडा, वस्तापूर, कुलंगणा (खुर्द) कुलंगणा बुजरूक या चार गावातील अनेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहेत. शेतीत लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळे होणारी हानी आणि महागाईमुळे येणारा कर्जबाजारीपणा या बाबी लक्षात आल्यावर सेंद्रीय पद्धतीने शेती केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. जीवन विकास संस्था यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, मिरची, ज्‍वारी, भुईमूग यांचे सेंद्रीय पद्धतीने चांगले

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद