Pages

Saturday, March 17, 2012

युगपुरुष... यशवंतराव चव्हाण साहेब


 
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा, प्रेम आणि आदर आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दाखविलेली दूरदृष्टी आणि घेतलेले अचूक निर्णय यातूनच आजचा प्रगतीशील महाराष्ट्र घडला आहे. राष्ट्रीय पातळीवरही चव्हाण साहेबांनी आपलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि देशवासियांच्या मनात स्वत:विषयी निर्माण केलेला विश्वास या बळावरच देशाचं उपपंतप्रधानपदही त्यांच्याकडे चालून आलं. चव्हाण साहेबांच्या रुपानं देशाला सक्षम उपपंतप्रधान लाभला तसंच मराठी माणूस उपपंतप्रधान झालेला पाहण्याचं भाग्य आपल्याला अनुभवता आलं, अशा या युगपुरुषाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.

यशवंतराव चव्हाण साहेबांनी जातीभेदविरहीत, सुसंस्कृत आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. आपलं राज्य केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रगतीशील राज्य बनले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय राज्याच्या प्रगतीला गती आणि सर्वसामान्य माणसाला बळ देणारा होता. राज्यातील जनतेचं कल्याण हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी अविरत कार्य केलं.