Pages
▼
Tuesday, April 17, 2012
माळरानावर बहरले डाळींब
कोरडवाहू शेतीला मिळाले शेततळ्याचे वरदान
अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात सिंचन शेतीचा अभाव आहे. कोरडवाहू शेतीत शेततळ्याच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना सिंचन करण्याचा प्रयत्न कृषी विभाग आणि राज्य शासनाने चालविला आहे. या वर्षभरात जिल्ह्यात ३ हजार ८०० शेतकऱ्यांनी कृषी विभागातील योजनेमधून शेततळे तयार केले असून त्याचा शेतीसाठी मोठा लाभ होत आहे.
मागील काही वर्षांत विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात आल्या. या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले होते. अभ्यासकांनी शेतकरी आत्महत्येचे कारण सिंचनाचा अभाव असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले. त्यामध्ये सिंचनावरच भर देण्यात आला.
Monday, April 16, 2012
कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक - राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक आणि प्रक्रिया खरेदी विक्री सह संस्था, राहता, जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर उभारण्यात येत असलेल्या साई प्रवरा ॲग्रो प्रोसेसिंग पार्कसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन श्री.विखे पाटील यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीर कुमार गोयल, कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक नीता राजीव लोचन, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक दादासाहेब झगडे, पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अभय बोगीरवार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वास भोसले, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
Wednesday, April 11, 2012
सुनील राजगुरू यांचा मत्स्य व्यवसाय
सुनील राजगुरू हे शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण. आई शिक्षण खात्यात, तर वडील आरोग्य खात्यात नोकरीस. वडिलोपार्जित चाळीस एकर जमीन असताना पारंपरिक पिकांमुळे मात्र शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे पारंपरिक शेतीस फाटा देऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या सुनील यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस रेशीम उद्योग आणि ससे पालनाचा व्यवसाय केला.
कथा हिरव्या यशाची
कुंभार यांच्या कुटुंबात एकूण पाच भाऊ. त्यामुळे वडिलोपार्जित अल्पशा जमिनीतून प्रत्येकाच्या वाट्याला केवळ दोन गुंठे जमीन आली. मात्र लक्ष्मण कुंभार यांनी चुलत्याची २६ वर्ष सेवा केल्याने त्याचे फळ जमिनीच्या रुपात त्यांना मिळाले. घर चालविण्यासाठी त्यांनी प्रारंभी घराची कामे केली. मात्र त्यात ते फार काळ रमले नाही. ते गावाकडे आले. कोतळूक गावात नदीकिनारची उतारावरची जमीन त्यांच्याकडे आली. जमिनीला शेतीयोग्य करण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या कष्टाला फळही लवकर मिळाले. भाताचे उत्पन्न चांगले येऊ लागले.
आधुनिक शेती लाखमोलाची
Tuesday, April 10, 2012
नातं मातीचं
नोकरीच्या अमिषाने मुंबई येथे भर तारूण्यात गेलेले भेकरे शेतीपत्रिका या शेतीविषयक मासिकाचे नियमित वाचक असल्याने त्यांचे मन नोकरीत रमले नाही. शेतीची आवड असल्याने १९८० मध्ये ते गावी परतले. गावात स्वत:ची अशी जमीन नव्हती पण शेती करण्याची प्रबळ इच्छा असल्याने भाड्याने जमीन घेऊन त्यावर शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली. केवळ तिसरीपर्यंत शिकलेले असूनही नवे ज्ञान आत्मसात करण्याची आवड असल्याने कोकणात सहसा न आढळणारी कलिंगडाची शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली आणि गेली २८ वर्षे शेतकरी म्हणून त्यांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. गुहागर तालुक्यातील कलिंगडाच्या वाढत्या क्षेत्रामागे भेकरे यांचीच प्रेरणा असल्याचे कोतळूक परिसरातील ग्रामस्थ सांगतात.
शेतीतील आधुनिक वाल्मिकी
Sunday, April 1, 2012
युवक शेतकऱ्यांनी धरली गटशेतीची वाट
प्रत्येकी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये सुरु असलेला हा प्रयोग उत्तर सोलापूर तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही पथदर्शी ठरत असून इस्त्रायलच्या धर्तीवर सेडनेटमधील ग्रुप फार्मिंगचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रयोगशील शेतकरी अंकुश टोणपे यांनी सांगितले.
पारंपरिक पिकाला पर्याय काकडीचा
शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी आवड असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील मुकुंद साठे या प्रयोगशील शेतकऱ्याने ऊस पिकाला पर्याय म्हणून अवघ्या २५ गुंठ्यात काकडीचे अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या लाख मोलाच्या काकडीने त्यांना चक्क लखपती केले आहे.