Pages

Tuesday, July 17, 2012

काजूबोंड प्रक्रिया : एक नवी दिशा


काजूबोंडापासून उत्तम प्रकारचे सीरप तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग रत्नागिरीत सुरू झाल्याने आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत काजूबोंडाची उपयुक्तता पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने कोकणातील काजू बागायतदारांना एक नवी दिशा मिळाली आहे.
कोकणात प्रवेश करताक्षणी पर्यटकांचे स्वागत होते ते काजू, आंबा आणि नारळ-पोफळीच्या दाट झाडींनी. हिरव्यागर्द झाडीतून डोकावणारे पिवळे-लाल काजूबोंड खूपच सुंदर दिसतात. त्याच्या खालच्या बाजूस असलेली काजू बी काढल्यावर उर्वरित बोंड टाकून दिले जातात. शाळेतून जाणारी मुले रस्त्याने असलेल्या झाडांवरची काजूबोंड काढून मजेने खातात.