Pages

Friday, July 1, 2011

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडले झुआरीचे कार्यालय


shetkari sanghatna halla
कोल्हापुरात खतांची टंचाई आणि मोठ्या प्रमाणात लिंकींग सुरु आहे. याच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही खत विक्रेते आणि झुआरी कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.
गेल्या काही दिवसांपासून झुआरी कंपनीकडून खतांचे लिकींग होत असल्याची तक्रार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्याविरोधात जाब विचारायला गेलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
लिंकींग विरोधात प्रशासन कारवाई करत नसल्याने जिल्ह्यात खुलेआम लिंकींग सुरु आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी झुआरीच्या कार्यालयात तोडफोड केली. लिंकींग बंद करुन शेतकऱ्यांना पुरेशी खते उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

No comments:

Post a Comment