
Pages
▼
Saturday, December 31, 2011
Thursday, December 29, 2011
गावच्या मातीची झेप दक्षिण आफ्रिकेकडे
गावाकडच्या मातीतील मुलं मुळातच कष्टाळू, धडपडी असतात अन् याचं एक उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर पांडुरंग काळगुडे हे आहेत. श्री काळगुडे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडग्याचे रहिवासी. लष्करी सेवेत काम करत असताना हा जवान देशाच्या संरक्षण सेवेतील आपल्या विशेष नैपुण्याच्या बळावर शांतिदूत बनला. दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशात भारत सरकारच्या वतीने त्याची नियुक्ती होणार आहे.सैन्य दलात मराठा बटालियनमधून भरती झालेला ज्ञानेश्वर सध्या पंजाबमधील पठाणकोट येथे नायक पदावर कार्यरत आहे. गेल्याच महिन्यात परराष्ट्रात शांतिदूत म्हणून नेमणूक करण्यासाठी पठाणकोट येथील मराठा बटालियनमधील तीन सैनिकांची निवड झाली.त्यात ज्ञानेश्वरचा समावेश करण्यात आला.यासाठी ज्ञानेश्वरचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे.कला.मानवता,अहिंसा ही मूल्ये अंगी बाळगून कल्याणासाठी त्यांचा वापर करणे शक्य असलेल्या सैनिकालाच शांतिदूत म्हणून नेमले जाते. ज्ञानेश्वरने या सर्व कसोटया पार केल्या.ज्ञानेश्वर काळगुडे शांतिदूत म्हणून २६ नोव्हेंबरला २०११ ला दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशाकडे सहा महिन्यांसाठी रवाना झाला.
Tuesday, December 27, 2011
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचा विशेष कार्यक्रम - मुख्यमंत्री
विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी पाच वर्षात सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासोबतच कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११३ व्या जयंती उत्सवानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम तयार करताना डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शेतीविषयक विचारांचाही यात समावेश करुन हा कार्यक्रम अमरावती विभागात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Monday, December 26, 2011
ऊसाने आणली आर्थिक सुबत्ता
Wednesday, December 21, 2011
Natural resources key facts from FAO
K E Y FA C T S
From 2 000 to 5 000 litres of
water are needed to produce
the food consumed daily by
one person.
Between 2000 and 2004, some
262 million people were affected
by climate-related disasters.
Of these, 98 percent lived in
developing countries.
With the world population
expected to reach 8.2 billion by
2030, the planet will have to feed
an additional 1.5 billion people,
90 percent of whom will be living
in developing countries.
Twenty percent of the world’s
population lives in river basin
areas at risk of frequent flooding.
More than 1.2 billion people live
in areas of severe water scarcity.
About 1.6 billion people live in
water-scarce basins where human
capacity or financial resources are
insufficient to develop adequate
water resources.
An estimated 250 million people
already have been affected by
desertification, and nearly one
billion more are at risk.
To Read Complete report click here...
Tuesday, December 20, 2011
आंगणेवाडीत फुलली झेंडूची शेती
विविध माध्यमातून आज शेतकऱ्यांना आधुनिक पीक पध्दतीची, लागवडीची माहिती मिळत आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या श्री. आंगणे यांनी झेंडूची लागवड करण्यासाठी वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांच्याशी संपर्क साधत या फुलाच्या लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेतली. लागवडीसाठी त्यांनी' कलकत्ता रेड ' या जातीची झेंडूच्या रोपांची निवड केली.
Monday, December 19, 2011
दुधी भोपळ्याचे पीक फायदयाचे
पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम किंवा भारी जमीन या पिकास पोषक ठरते किंवा हलक्या जमिनीतही भरपूर सेंद्रिय खताचा वापर केल्यास पीक चांगले मिळते. जमिनीचा सामू ६ ते ७ दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. मात्र, कडाक्याची थंडी या पिकास अपायकारक ठरते.
यामधील संकरित जाती पुसा नवीन, अर्का बहार, सम्राट, पुसा समर,प्रॉलिफिक लॉग, पुसा समर प्रालिफिक राऊंड, पंजाब कोमल अशा असून कोकणात लागवडीसह सम्राट जातीची शिफारस केली जाते. या जातीची फळे हिरवी व मध्यम आकाराची असून ती दंडगोलाकृती असतात व ही फळे दूरवर बाजारात पाठविल्यासही उत्कृष्ट राहतात तर हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल उत्पन्न मिळते.
लागवडीसाठी जमीन तयार करुन घेतल्यावर ३ मीटर अंतरावर ५० ते ६० सें.मी.रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस ३० से.मी.लांब,तेवढेच रुंद व खोल आकाराचे ९० सें.मी. अंतरावर खड्डे तयार करावेत. प्रत्येक आळ्यात एक ते सव्वा किलो शेणखत, १० ग्रॅम कार्बारील पावडर मातीत मिसळून घ्यावी. लागवडीपूर्वी हेक्टरी ३७ किलो नत्र, ५० किलो स्फूरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे सर्व आळ्यात सारख्या प्रमाणात विभागून द्यावे. प्रत्येक आळ्यात ३ ते ४ बिया टाकाव्यात. म्हणजे हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे पुरते. फक्त दोनच जोमदार रोपे ठेवावीत.
जास्त उत्पादनासाठी वेल मांडवावर चढवावेत. उन्हाळी हंगामात वेल जमिनीवर सोडले तरी चालतात. नत्र खताची ६० किलोची मात्रा ३० आणि ६० दिवसांनी घ्यावी. या पिकावर भुरी रोग,केवडा,कडा करपा,मावा,तांबडे भुंगेरे फळमाशी अशा रोगापासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी कॅराथोन,डायथेन एम-४५,डायथेन झेड-७८ या औषधांनी पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळे कोवळी असतानाच काढावीत. साधारणपणे फळांवर लव असताना व फळास नखाने हळूच दाबल्यास नखांचे व्रण दिसतात. अशा वेळी फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळे दर ५ ते ६ दिवसांच्या अंतराने काढावीत. हेक्टरी ३०० ते ४०० क्विंटल उत्पादन मिळते.
Sunday, December 18, 2011
FAO Media Centre: Major gains in efficiency of livestock systems needed
Populations and income growth are fueling an ongoing trend towards greater per capita consumption of animal protein in developing countries, says the report, World Livestock 2011. Meat consumption is projected to rise nearly 73 percent by 2050; dairy consumption will grow 58 percent over current levels.
Thursday, December 8, 2011
Wednesday, December 7, 2011
मसाला पिकांत मासरुळची आघाडी
अनेकदा गावांची नावे एखादे वैशिष्ट्य दर्शवितात. कधी कधी ही नावेच गावचा चेहरा असतात. बुलडाणा तालुक्यातील मासरुळ या गावाबाबत असेच म्हणता येईल. या गावात सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी मिरचीचे पीक घेतोच घेतो. मिरची पिकाने या गावाला प्रगतीची वाट दाखवली. वाईच्या बाजारपेठेपासून ते थेट दिल्ली बाजारातील व्यापारी या गावात येऊन मिरची खरेदी करतात, अशी या गावची ख्याती झाली आहे. सध्या मिरचीला हवा तसा दर मिळतोच असे नाही. निसर्गाच्या लहरीपणाचे आघात अनेकदा सोसावे लागतात. त्यामुळेच येथील गावकरी आता मिरचीला थोडा ब्रेक देऊन हळद, आले अशा नगदी पिकांच्या लागवडीकडे झुकले आहेत.