Pages

Saturday, January 22, 2011

रोपांच्या थेट मुळाशी पोहोचले तंत्रज्ञान, जमिनीखालून पिकांना पाणी व खतेसुद्धा!

हवे तेव्हा, हवे तेवढे पाणी, खते थेट जमिनीखालून रोपांच्या मुळाशी देण्याचे आधुनिक तंत्रज्ञान देशात उपलब्ध झाले आहे. उसाचे शिवार हिरवेगार करणाऱ्या ठिबक सिंचनाचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांना थेट तामिळनाडूत जावे लागते. मात्र, महाराष्ट्रातीलच जैन इरिगेशनने हे तंत्र विकसीत केले आहे. कोडाईकॅनॉलला पर्यटक, मदुराईला मीनाक्षी मंदिरात दर्शनासाठी भाविक येतात. आता कोमाची पट्टीतील ई. शिवप्रकाशन व किलकोटाई गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला ते भेट देत आहेत. विशेष म्हणजे या शिवार फेरीत माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रकाश देवसरकर, दिनकर मोरे, प्रभाकर गायकवाड, संभाजी कार्ले, पंढरीनाथ शिंदे यांसह साखर उद्योगातील धुरिण सहभागी झाले आहेत. जमिनीखालील ठिबक सिंचन प्रथम ‘हवाई’मध्ये नंतर दक्षिण अफ्रिका, स्वीत्र्झलॅण्ड, झिम्बावे आदी देशांत १५ वर्षांपासून वापरात आहे. आंध्रप्रदेशात पाच वर्षांपासून ठिबक सिंचन सुरू झाले. आता १५ हजारांवर क्षेत्र पोहोचले आहे. ठिबकची नळी यंत्राने जमिनीत टाकली जाते. त्यामुळे पाणी उसाच्या रोपांच्या मुळांना मिळते. जमिनीचा वरचा भाग कोरडा राहत असल्याने तण वाढत नाही. उसाच्या दोन ओळीतील अंतर सहा फूट ठेवल्याने आंतरपीके घेता येतात. पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. सर्व खत लागू होते. आंतरमशागत ट्रॅक्टरने, तर तोडणी हॉर्वेस्टर यंत्राने करता येते. नळीचा अडथळा मशागतीला व तोडणीला होत नाही. एकदा संच वापरला की, उसाचे दहा खोडवे घेता येतात, असे अनेक फायदे असल्याचा दावा कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. पी. सोमण यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment