Pages

Thursday, January 20, 2011

बायोगॅस प्रकल्पापासून वीज निर्मीती...

वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा हे गाव मालेगाव पासून ९ कि.मी अंतरावर आहे. हे गाव तसे पुर्वीपासून माळरान व डोंगराळ म्हणून ओळखले जाते. परंतु त्याच जमिनीवर अविनाश जोगदंड व घनश्याम (हिम्मत) जोगदंड या २ युवकांनी मनात जिद्य कायम ठेवून शेतीला व्यवसायाचे स्वरूप दिले.व ७५ एकर शेतजमिनीवर वेगवेगळया ठिकाणावरचे तंत्रज्ञान वापरून वीज निर्मीती प्रकल्प उभारला.बायोगॅसवर आधारित हा वाशिम जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.या माध्यमातून २५ ते ३० हजार रूपयांची वीज निर्मीती होते.

शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले होते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित २५० एकर जमीन होती. चांगले शिक्षण घेवून त्यांनी शेतीलाच आपले करीअर बनवले व शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले कनिष्ठ दर्जाच्या जंगली विभागात त्यांनी उत्कृष्ठ दर्जाची शेती तयार करून दाखवली.त्यांच्याकडे लहान मोठे ७५ जनावरे आहेत त्यांचाच उपयोग करून त्यानी १०० टक्के सेंद्रीय शेती केली. उर्जा बायोगॅस सिस्टीममुळे शेणापासून गॅस निर्मीती व वीज निर्मीती केली.उर्जा बायोगॅस सिस्टीममुळे गुरांच्या शेणापासून गॅस निर्मीती केली.सध्या ३५ एकर जमीन पूर्ण सिंचनाखाली आहे.तिथेच जनावरांसाठी चारा सुध्दा उत्पादित केला जातो तिथेच त्यांनी जनावरे पाळली त्यापासून दररोज ५०० किलो शेणापासून २५ एच.पी.वीज निर्मीती केली.

दररोज ५६ कि.व्हॅट (के.व्ही) वीज तर वर्षाकाठी २० हजार ४४० के.व्ही.वीज स्वत: तयार केली.सिंचनाची उपकरणे सुध्दा याच विजेवर चालवली.तशी ही वीज दर तासाला १९ युनिट प्रमाणे १ वर्षाला १ लाख ६६ हजार ४८० युनिटचा वापर होतो.त्यासाठी १५ लाख ४५ हजार रूपये खर्च होतो म्हणून त्यांनी १५ लाखाची या माध्यमातून बचत केली.अशा प्रकारे स्वत:च्या कौशल्यातून इतर तरूणांनी या वाटेवर चालून उद्योग व्यवसायाची कास धरावी.

'महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment