Pages

Friday, March 25, 2011

धान्य सडत असल्याची सरकारची कबुली.


धान्याचे विक्रमी उत्पादन होत असून गोदामांमधील साठवणुकीची क्षमता कमी पडत असल्यामुळे गोदामांमध्ये धान्य सडत असल्याची कबुली अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी राज्यसभेत दिली. गव्हाचे विक्रमी उत्पादन होत असून देश 'ग्रेन बॉम्ब'वर बसला आहे. धान्य साठवण्याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुखर्जी म्हणाले. धान्य सडत असल्याची कबुली मी देतो. साठवणुकीची क्षमता वाढविण्यालाही मी सहमत आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव दिला जात असल्यामुळे अलीकडे धान्याचे उत्पादन वाढत आहे. गरजेनुसार अतिरिक्त क्षमता वाढवायला हवी, असे ते अर्थ विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले.
गोदामांमध्ये धान्य सडत असून आदिवासींना निकृष्ट धान्य पुरविले जात असल्याबद्दल माकपच्या वृंदा करात यांनी तीव्र चिता व्यक्त केली होती. शून्य तासाला मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, सरकार अतिरिक्त धान्य गरिबांना पुरविण्याच्या मागणीकडे लक्ष देत नाही. 
धान्य सडू दिले जात आहे. त्यांनी सभागृहात सडलेले गहू आणि तांदूळ दाखविले. हे धान्य आदिवासी भागात पाठविले जात असून ते खाण्यायोग्य नाही. चांगल्या धान्याचा पुरवठा करावा. धान्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी निगराणी समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली. उपसभापती के. रहमान खान म्हणाले की, करात यांच्या भावनांशी संपूर्ण सभागृह सहमत आहे. सरकारने सदस्यांच्या भावनांची दखल घ्यावी. नामनियुक्त सदस्य ए.के. गांगुली म्हणाले की, धान्य उत्पादनाचा स्फोट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
चांगल्या पावसामुळे यावर्षी ८.२ कोटी टन धान्याचे उत्पादन झाले. मात्र साठवणूक करण्याची क्षमता कमी आहे. देशाने आणखी दीड लाख टन धान्य वाढविण्याची क्षमता मिळविण्याची गरज आहे. काँग्रेसचे सदस्य माबेल रिबेलो यांनीधान्य उत्पादनवाढीमुळे येऊ घातलेल्या 'संकटा'बाबत सरकारने श्वेतपत्र जारी करावे अशी मागणी केली. 
आभार लोकमत.

No comments:

Post a Comment