देशातल्या एकूण कापूस उत्पादनापैकी गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये ७५ टक्के उत्पादन घेतले जाते. या तीन राज्यांमध्ये जून महिन्यात सर्वाधिक कमी पाऊस झालाय. त्यामुळे या प्रमुख कापूस उत्पादक भागात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक कमी पाऊस झाल्याने इथले क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा घटण्याची शक्यता आहे. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हे क्षेत्र आणखी घटण्याचा अंदाज आहे. देशात १ जुलै २०१० च्या तुलनेत १ जुलै २०११ मध्ये २२ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड घटल्याची माहिती केंद्रीय कृषी सचिव पी. के. बासू यांनी दिली.
No comments:
Post a Comment