Sunday, September 9, 2012

द्राक्ष-कमी खर्चात रोगनियंत्रणाची रणनीती - डॉ. एस. डी. सावंत

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील (एनआरसी) शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन वक्ते डॉ. एस. डी. सावंत
विषय - कमी खर्चात रोगनियंत्रणाची रणनीती
वक्ते - डॉ. एस. डी. सावंत

पाऊस नाही, त्यामुळे रोगराई कमी, परिणामी खर्च कमी होईल, असे वाटू देऊ नये. रिमझिम पाऊस पडला तरी बागेत रोग येण्याची शक्‍यता वाढते. रोगावरील खर्च कमी करणे हे छाटणी कशी घेता यावर अवलंबून असते. छाटणीच्या तारखा अशा निश्‍चित केल्या पाहिजेत, की जेणेकरून बाग फुटल्यानंतर लगेच पाऊस पडणार नाही. छाटणीनंतर सुरवातीच्या काळात डाऊनी येतो, त्यापासून बाग वाचविण्यासाठी छाटणीचे नियोजन योग्य वेळी व्हावे. 15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही. त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. रोग नियंत्रणावरही ताबा राहतो.

महत्त्वाचे मुद्दे -
- ज्या बागांची छाटणी लवकर होते, त्या बागांशेजारच्या न छाटलेल्या बागेत रोग येणार नाही याची काळजी घ्यावी.
- काडीवरील डाऊनीच्या बीजाणूंचा नायनाट करण्यासाठी पेस्टिंग करावे. यात तीन ते पाच ग्रॅम मॅन्कोझेब आणि दोन ग्रॅम सल्फर यांचे मिश्रण करावे. याद्वारे भुरीचेही नियंत्रण होण्यास मदत होईल.
- छाटणीनंतर फुटलेल्या अनेक फुटी पुढे जातात. त्या हाताने काढून टाकाव्यात. त्यामुळे रोगाचे बीजाणू वाढणार नाहीत.

पोंगा अवस्थेतील काळजी -
पोंगा अवस्थेत रोगाचा धोका जास्त असतो. ही अवस्था येईपर्यंत बागायतदारांनी दोन ते तीन फवारण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे फवारणीतील फार कमी अंश पाने, फुलांपर्यंत पोचतो. बाकीचे द्रावण उडून जाते. त्यासाठी रोग केव्हा येतो, याचा अभ्यास असावा. पोंगा अवस्थेत पोंग्यात
सकाळी पडणाऱ्या दवाचे पाणी शिरले असेल तरच फवारणी करावी. हे तपासण्यासाठी पोंगा हाताने दाबून पाहावा. त्यात पाणी नसेल तर फवारणीची आवश्‍यकता नसते. अशावेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांऐवजी डायथायोकार्बामेट गटातील बाह्यस्पर्शी बुरशीनाशक फवारले तर पोंग्यात रोगाचा धोका टाळता येतो. डायथायोकार्बामेटची (मॅन्कोझेब किंवा मेटीराम सारखी बुरशीनाशके) तीन ते पाच किलो पावडर प्रति एकर या प्रमाणात धुरळणी केल्यास रोगापासून चांगले संरक्षण मिळू शकते.


कमी खर्चाच्या नियोजनासाठी -
- उशिरा छाटावयाच्या बागांमध्ये रोगनियंत्रण सुरवातीपासून चांगले ठेवल्यास रोगांचे बीजाणू तेथे वाढणार नाहीत.
- डाऊनी, भुरी व करपा रोगांचे बीजाणू हवेद्वारे पसरतात. सप्टें.-ऑक्‍टो.मध्ये वारे पश्‍चिमेकडे वाहतात. म्हणून लवकर छाटलेल्या बागांच्या पूर्वेकडे न छाटलेल्या बागा नाहीत, याची खात्री करावी.
- जास्त रोग असलेली वा पानगळ झालेली बाग लवकर छाटल्यास रोगांच्या प्रसाराला आळा बसेल.
- फवारणीपूर्वी चांगले हवामान पाहूनच फवारणीचा निर्णय घ्यावा.
- हवामान अंदाजात ज्या दिवशी पावसाचा अंदाज दिलेला असतो, त्या दिवशी बागेत फवारणी टाळावी.
- ज्या रोगाचा धोका आहे, त्याच रोगासाठी बुरशीनाशक हे दुसरे कोणतेही कृषी रसायन न मिसळता फवारावे.
- अशाप्रकारे सुरक्षितरीत्या फवारणी नियोजन केले तर फवारणींची संख्या कमी होऊन खर्च टाळता येईल.
- ऑक्‍टोबर छाटणीनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशके व्यवस्थित वापरली तर रोगाचा धोका कमी होतो.
- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे वेदर स्टेशनच्या माध्यमातून बागेतील हवामान अंदाजानुसार फवारणीचा सल्ला दिला जातो. त्याचा उपयोग बागायतदारांनी करून घ्यावा.

श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांचे निधन.


भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांचे आज (रविवार) पहाटे वृध्दपकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी माऊली आणि मुलगी निर्मला असा परिवार आहे. गुजरात सहकारी दुग्ध फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, वर्गिस कुरियन यांचे आज पहाटे आणंद येथील नंदियाड रुग्णालयात निधन झाले. कुरियन यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी अमुलच्या मुख्यालयात आज सायंकाळपर्यंत ठेवण्यात येणार आहे. सायंकाळनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळ केरळचे असलेले डॉ. वर्गिस कुरियन हे गुजरातमध्ये आणंद येथे येऊन स्थायिक झाले. देशातील दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीत आमूलाग्र क्रांती करून तयंनी श्वेतक्रांतीचे जनक म्हणून आपली ओळख निर्माण केली. अमूल डेअरी, मिल्क मार्केटिंग फेडरेशन, इरमा, एनडीडी बोर्ड, त्रिभुवनदास फाऊंडेशन इत्यादी संस्थांची स्थापना करून गुजरातचे नाव त्यांनी जगभर नेले. दूध उत्पादकांची परिस्थिती सुधारण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल मॅगसेसे अ‍ॅवार्ड तसेच इतरही अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत.

डॉ. वर्गिस कुरियन यांनी अख्खी अमुल उभी केली. भारतातल्या दुग्धक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांनी नेस्ले वगैरेंसारख्या बलाढय़ बहुराष्ट्रीय कंपन्यांना अंगावर घेत अमुलचा ब्रँड घडवला. आपल्यासारख्या गरीब देशात केवढं मोठं काम हे. कुरियन यांचे मामा जॉन मथाई आपले पहिले रेल्वेमंत्री होते. नंतर ते देशाचे अर्थमंत्रीही झाले. त्यामुळे हा वारसा लक्षात घेता कुरियन यांनी राजकारणाची वाट धरली असती तरी ते नैसर्गिकच झालं असतं. पण त्यांनी तसं न करता गुजरातच्या वाळवंटातल्या गरिबांना हाताशी धरत अमुलक्रांती करून दाखवली.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद