जागेची योग्य निवड : शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल, याप्रमाणे वळवावे. शक्यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजुची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजुला थोड्या अंतरावर खोदावे.
Wednesday, June 13, 2012
कोरडवाहू शेतीसाठी शेततळे संजीवनीच !
पूजा सावंत यांची सेंद्रिय शेती
टाकळी सिकंदर येथील कृषीभूषण कै.दिगंबर (अण्णा) सावंत यांच्या स्नुषा पूजाताईंचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे विवाहानंतरही त्यांना शेतीची ओढ स्वस्थ बसू देईना. रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग परस बागेतील झाडांवर सुरू केले.
Tuesday, June 12, 2012
साखर उद्योग टिकविण्यासाठी ऊस उत्पादन वाढवावे - हर्षवर्धन पाटील
साखर आयुक्तालयामार्फत आयोजित 'ऊस विकास कार्यशाळा-हंगाम २०१२-१३' चे उद्घाटन श्री.पाटील यांच्या हस्ते सोमवारी पुण्यातील 'यशदा' मध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील आमदार सा.रे.पाटील, सहकार सचिव राजगोपाल देवरा, वसंतदादा साखर संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, साखर आयुक्त मधुकर चौधरी, ऊस तज्ज्ञ डॉ.डी.जी.हापसे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Wednesday, June 6, 2012
द्राक्ष बागेत टोमॅटो आंतरपिकाचे भरीव उत्पादन
पारंपरिक शेती करताना त्यास माहिती तंत्रज्ञान व नवीन कृषी तंत्राची जोड दिल्यास शेतीतून भरीव उत्पादन घेणे शक्य होते. यासाठी कृषी विभागाकडून अनेकविध नवीन तंत्रज्ञानाची आणि नवीन प्रयोगांची माहिती शेतकरी बंधुना देण्यात येते. नवनवीन करण्याची उर्मी असलेल्या निफाड तालुक्याच्या उगाव येथील मधुकर मापारी यांनी द्राक्ष बागेत टोमॅटोचे आंतरपिक घेऊन भरीव उत्पादन घेतले आहे. हे मापारी यांचे हे पाऊल इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शकच आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उत्पादन खर्चामुळे शेती व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. अत्यल्प पाणी आणि कामाचे यशस्वी नियोजन करून द्राक्ष बागेत टोमॅटोचे आंतरपीक घेऊन भरीव उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग मापारी यांनी केला आहे. मधुकर मापारी यांची उगांव शिवारात ६५ आर शेत जमीन आहे. शेतातच वस्ती करून मापारी कुटुंब राहत आहे. त्या क्षेत्रात मार्च एप्रिल २०११ मध्ये डांग्रीज जातीच्या द्राक्षहुंडीची, थॉमसन जातीची द्राक्षकाडी कलम भरली. त्यास ठिंबक सिंचन, आधारासाठी बांबू, अँगल, तार इत्यादी कामासाठी ६ लाख ३० हजार रुपये एवढा खर्च केला. द्राक्षवेलीची वाढ जोमाने होण्यासाठी सेंद्रीय, रासायनिक खतांची योग्य मात्रा वेळोवळी दिली. द्राक्षबागेची लागवड करताना एकाच वरंब्यावर दोन्ही बाजूने एकमेकांशी तिरप्या पद्धतीत लागवड करुन २१ ओळीद्वारे सुमारे २४५० हुंडी लागवड केली.
द्राक्षवेलीच्या वाढीची प्रक्रिया सुरू असताना जून २०११ मध्ये दोन ओळींमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत टोमॅटोची आंतरपीक म्हणून लागवड केली. त्यांची योग्य मशागत करून पुरेसे पाणी खत देऊन वाढ केली. टोमॅटो पिकाचा पोत दृष्ट लागण्याइतपत सुधारला. त्या पिकासाठी आधार म्हणून द्राक्ष बागेलाच आधारासाठी लावलेल्या तारीचा आणि सुतळीचा वापर केला. टोमॅटो पिकाच्या देखभालीवर सुमारे ४५ हजार रुपयांचा खर्च केला.
आज टोमॅटोचे भरघोस उत्पादन निघत असून प्रती कॅरेटचे बाजारभाव २५० ते ५०० रूपये मिळू लागले आहेत. टोमॅटो पिकाची द्राक्ष बागेत झालेली वाढ विशेष लक्षवेधी ठरत आहे. टोमॅटो पिकाकडे मापरी परिवाराने लक्ष पुरविले असले तरी द्राक्षवेलीची देखील त्याच नेटाने काळजी घेतली आहे. द्राक्षवेल देखील आता परिपूर्ण वाढली असून कोणत्याही स्वरूपात रोगराई होणार नाही याची काळजी मापारी कुटुंबाने घेतली आहे. शेती-पाण्याचे नियोजन यशस्वी करून मधुकर मापारी यांनी सुनील व बाबासाहेब या दोन मुलांच्या साथीने द्राक्षांमध्ये टोमॅटो पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. उगांव आणि परिसरातील गावांमधून तज्ज्ञ व अनुभवी शेतकरी मापारी परिवारांचे यशस्वी नियोजन व उत्पादन बघत असून त्याप्रमाणे आपल्या शेतातही असाच प्रयोग करण्याचा मानस मापारी यांच्याकडे बोलून दाखवित आहेत.
श्री.मापारी यांनी केलेला प्रयोग यशस्वी झालेला असून सर्वच शेतकरी बंधुनी कृषी विभागाने पुरविलेल्या विविध योजनांचा व नवनवीत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती परवडणारीच आहे, असे मत मधुकर मापारी यांनी व्यक्त केले आहे.
सहकारातुन पर्यटन केंद्र
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) सहकार्यातून राज्यातील पहिला इकोऍ़ग्रो टुरिझम कंपनी उभारण्याची किमया सातारा जिल्हातील तापोळा येथील धरणग्रस्त शेतकरी युवकांनी केली.एवढेच नाही तर गेल्या दीड वर्षात नऊ ते दहा लाख रुपयांचा व्यवसाय करण्याबरोबरच गावातील २५ कुटुंबाना रोजगार मिळवून दिला आहे.
Monday, June 4, 2012
कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी शेती मिशन स्थापन करणार - पृथ्वीराज चव्हाण
जमीन पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते पिरंगुट येथे प्रारंभ
राज्य पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ श्री. थोरात यांचे हस्ते पुणे जिल्ह्यातील पिरंगुट (ता. मुळशी) येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्रामसिंह थोपटे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार शरद ढमाले, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुळशी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती उज्वला पिंगळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी गणेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत्रज्ञान
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीवर आधारित आहेत. पण शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन त्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी प्रयत्न करणे कर्तव्य समजून कोल्हापूर येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबवित आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होत असून संपूर्ण राज्याला हे अभियान दिशादर्शक आहे. या विषयी त्यांनी दिलेली माहिती ....
प्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविणे आवश्यक असल्याचे आपणास का वाटले?
उत्तर:- ऊसाच्या पाचटाच्या व्यापक फायद्यांचा व जमिनीच्या बिघडत जाणाऱ्या आरोग्याचा विचार करता हे तंत्रज्ञान राबविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्हा पाचटमुक्त करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2011 ला हा संकल्प केला. यामुळे 100 कोटी रुपयांचे उत्पादन वाढणार असून उत्पादन खर्चात 50 कोटी रुपयांची बचत होणार आहे. हे सुरुवातीच्या अभ्यासाअंती लक्षात आल्यानंतर हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले.
Sunday, June 3, 2012
शेवगा शेतीचा 'मराळे' पॅटर्न
खरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग
सिंधुदुर्गात होत असलेली कृषी क्रांती येथील समृद्धीचे कारण बनणार आहे. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन प्रयोग करण्याची मानसिकता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मालवण तालुक्यातील बिळवस येथील सिताराम सदाशिव सावंत यांनी असाच एक प्रयोग केला असून मुंबई येथील काम सुटल्यावर त्यांनी गावात येऊन दुसऱ्याची शेती भाडेतत्वावर घेऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला कृषी उद्योग करण्यावर भर दिला आहे.
सावंत यांनी स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसतानाही शेतीची आवड असल्याने दुसऱ्या शेतकऱ्याची सुमारे २५ गुंठे जमीन भाडेतत्वावर घेतली. या शेतीमध्ये खरबुजाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खरबुजाच्या लागवडीचा जिल्ह्यातील हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. खरबुजाची जिल्ह्यात प्रथमच लागवड असल्याने मालवण पंचायत समितीच्या कृषी विभागाची सावंत यांनी लागवडीसाठी मदत घेतली. येथील कृषी विस्तार अधिकारी मदने यांनी खरबुजाच्या लागवडीसाठी सावंत यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
Saturday, June 2, 2012
शेतीतून समृद्धी
शेती व्यवसाय हा पुरूषांपुरता मर्यादित राहिलेला नसून महिलांनीदेखील मातीतून मोती पिकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. जमिनीची मशागत करण्यापासून कृषी उत्पादनांच्या प्रक्रिया उद्योगापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. ग्रामीण भागात रूजलेल्या बचत गट चळवळीच्या माध्यमातून या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील जागृती महिला बचत गटाने शेती क्षेत्रातील यशस्वी महिलांकडून प्रेरणा घेऊन भाजीपाला उत्पादनात चांगली प्रगती केली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने २००४ मध्ये एकत्र येऊन या बचत गटाची स्थापना करण्यात आली. प्राथमिक स्वरुपाची बचत करून महिलांनी गटाच्या कार्याला सुरुवात केली. महिलांनी पारंपरिक व्यवसाय न करता कृषी कार्यावर आधारित भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. प्रारंभी परसबागेच्या स्वरुपात या कामाची सुरुवात झाली. नंतरच्या काळात गटाच्या अध्यक्षा दिप्ती उसरे यांनी दिलेल्या एक गुंठा जागेत भाजीपाल्याची लागवड करणे सोईचे झाले. महिलांना २००५ मध्ये शेतीकामासाठी २५ हजारांचे कर्ज मिळाले. त्यातून शेतीची काही साधने खरेदी करण्यात आली.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Keywords
“पिवळी क्रांती
अंजीर
अंतरपिक
अन्नधान्य
अन्नसुरक्षा अभियान
आदिवासी
आधुनिक पोल्ट्री व्यवसाय
आंबा
आवळा
इस्त्रो
उपमुख्यमंत्री
उस
ऊस
ऊसतोडणी
ऍग्रो टुरिझम
कर्जमाफी
कात
कांदा
कापूस
कारले
कीडनियंत्रण
कुक्कुटपालन
कृषि उत्पन्न बाजारसमिति
कृषि योजना
कृषी दिन
कृषी विद्यापीठ
कृषीतंत्र
कृषीमंत्री
केळी
कोकम
कोळंबी
खते
खरबूज
गहू
जमिन
जलसंधारन
झरा
ट्रक्टर
ठिबक
डाळिंब
डाळींब महोत्सव - 2010
ढोबळी मिरची
तलाव
तुर
तेल्या
दुग्धव्यवसाय
दॅट उपकरण
द्राक्ष
निर्यात
निलक्रांती
पाणी
पाणी अडवा
पाणी जिरवा
पान
पीक
पुरंदर
पृथ्वीराज चव्हाण
प्रक्रिया उद्योग
फलोत्पादन
फळबाग
फायटोप्थोरा
बचत गट
बटाटा
बागाईतदार
बाजारपेठ
बाजारभाव
बायोगॅस
बियाणांची गुणवत्ता
बी-बियाणे उपलब्धता
बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival.
भाजीपाला.
भात
भेंडी
मच्छिमार
मजूर
मत्स्य व्यवसाय
मधशाळा
मधुमक्षिका पालन
मराठवाडा कृषी विद्यापीठ
महा-रेन
महाकृषी
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो
महिको
महिला अणि कृषि क्षेत्र
माती परीक्षण
मिरची
मोसंबी
यशोगाथा
रेशीम
रेशीम उद्योग
रोग-नियंत्रण.
वनराई बंधारे
वीज निर्मीती
वृक्षायुर्वेद
शिवामृत
शेडनेट हाऊस
शेतकरी
शेततळे.
शेती
शेती व्यवसाय
शेतीपूरक व्यवसाय
शेतीशाळा
शेतीसाठी हवामानाचा सल्ला
समूह शेती
साखर
साखर कारखाना
सिंचन प्रकल्प
सीताफल
सेंद्रिय शेती
सोनेरी हळद
सोयाबीन
स्ट्रोबेरी
स्वाभिमानी शेतकरी संघटना
हरितक्रांती
हळद
Popular Keywords
7/12
Acts/Rules
Agriculture
Agrowon
Biogas
Blue green algae
Contact Action .
Crop Protection
Dairy
Drip Irrigation
FAO
Ferilizer
Fertilizer contol order
Fertilizer general information
Food
Food Processing
Fruits
Global Worming
Grapes
HACCP
Haritkranti 2010
History of pome.
Horticulture
Indian farmer
Insectiside
Kashmir
Keshar
Land Holding
Mahafruit
Mahakrushi
Mango
Milk
Monsanto
MPKV
MSAMB
National seed acts/rules.
NRC Grapes
Onion
Pesticides
Pestiside
Pomegranate
Poultry business
Poultry Feed
Price
Prutviraj Chavhan
Pulses
Seed general information
Seed production
Strawberry
Strawberry Producer
Subsidy
Sugarcane
Systemic
Type of action.Fumigent
University
USDA
Vegetables
Water resources
weather forcasting
Wheat
World Agriculture