Thursday, December 22, 2016

आज २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस आहे.

*आज २२ डिसेंबर*
आज वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. आज केवळ १० तास ४७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला 'विंटर सोल्सस्टाईल' असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो. २१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते. खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जून नंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो, नंतर काही भाग निरकस दिशेत येतो. त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो. पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना देशांश म्हणतात. मधोमध शून्य अंशावरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशावर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर अर्काटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून या वेळी प्रचंड तापमान वाढलेले असते. भारतात वेळेचे निर्धारण पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक देशांश रेखांपैकी ८२(१/२) अंशावरील देशांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील देशांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते. आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी जगभरातील लोकं गर्दी करतात. आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात. आज ६ वाजून ५ मिनीटांनी सूर्यास्त होणार आहे. तसेच आजपासून उत्तरायण प्रारंभ होत आहे. या दिवसाला हिवाळा अयन दिवस असेही म्हणतात.

Monday, December 19, 2016

२०५०: ९ अब्ज लोक आणि त्यांचे अन्न

पुढील ३५ वर्षा मध्ये जगाची लोकसंख्या ७.१ अब्ज वरून ९ अब्ज होऊ शकते आणि या लोकसंख्येला लागणारे अन्न हि एक मोठे समस्या आहे. त्यासाठी शेतीचे उत्पन्न पुढील काही वर्षांमध्ये दुप्पट करावे लागणार आहे असे शेतीविषयक विचारवंतांचे म्हणणे आहे. सद्य परस्थिती पाहता हि गोष्ट अवघड आहे पण शक्य आहे. या उद्याच्या जगाला अन्न पुरवण्यासाठी सध्याचे शेतीविषयक शिक्षण आणि तंत्रज्ञाचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर काही नवीन पद्धती, शेती अवजारे आणि नवीन शोध याची गरज आहे. त्यासाठी काही समस्यांचे निराकरण करणे अतिशय अवश्य आहे. प्रामुख्याने भेडसावणाऱ्या समस्या :


१)प्रति एकरी कमी उत्पादन:
अयोग्य खाते आणि औषधे, अयोग्य पीकाची निवड आणि अपुरी माहिती या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन घटते. उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पीक घेणे आवश्यक असून त्याचबरोबर पिकाची पुरेपूर माहिती, योग्य शेती अवजारे आणि खाते यांचा योग्य वापर करावा लागणार आहे.

२)वया जाणारे अन्न:
हि एक अतिशय महत्वाची समस्या आहे. प्रत्येक तयार केलेल्या १०० कॅलरी अन्नापैकी ६५ कॅलरी अन्न वाया जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी काही नवीन संकल्पना राबवण्याची गरज असून तयार केलेले सर्व शेती उत्पादन आपल्याला कसे पूर्णपणे वापरता येईल याची काळजी घेणे अवश्य आहे.

३)वातावरणाची अपुरी साथ:
बदलते वातावर आणि त्याचा शेती उत्पादनावर होणार परिणाम हि एक अतिशय गंभीर समस्या आहे व या समस्येसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. अवकाळी पाऊस, गारांचा मारा आणि वाढते तापमान असे काही ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम असून त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा तोटा होत आहे आणि यामुळे शेती उत्पादन (अन्न) घटत आहे.

४)वातावरणाची अपुरी माहिती:
शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती नसल्या कारणाने शेतकरी काही उपाययोजना करण्यात अपयशी ठरतो. त्यासाठी वातावरणाची अचूक माहिती देणारी संकेतस्थळ आणि विविध मोबाइल अँप्लिकेशन याचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. या माहितीमुळे शेतकरी वेळोवेळी वातावरणातील बदलांसाठी काही प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजना करण्यांत यशस्वी ठरेल आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्याला होईल.


जर शेतकऱ्यांना बाजारपेठ, वातावरण, पिकांची पुरेपूर माहिती अणि जल व्यवस्थापन याची माहिती असेल तर शेतीची उत्पादन पुढील येणाऱ्या कही वर्षामधे आपण दुप्पट करू असे शेती विषयक तज्ञांचे  म्हणणे आहे . अणि या साठी इंटरनेटचा वापर वाढवला पाहिजे जेणेकरून शेतीविषयक सर्व माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल. तसेच भांडवल गुंतवणूक आणि शेती व्यवस्थापन याचीही फार गरज असून या गोष्टी शेतकऱ्यांना समजावून घेण्याची गरज आहे. जगामध्ये इस्राईल,अमेरिका, इटली, जर्मनी, चीन आणि न्यू झेलण्ड अशा काही राष्ट्रांनी शेतीमध्ये फार प्रागति केली असून या देशामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या फक्त १५ ते २० % असून सुद्धा ते त्यांना लागणारे सर्व अन्न तयार करू शकतात तेव्हा इतर देशांनी सुद्धा त्याच्या काही अत्याधुनिक पद्धती अणि तंत्रज्ञान याचा वापर करणे अवश्य आहे. आज भारतामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे प्रमाण ३०% असून आपण आपले सर्व अन्न देशांमध्येच तयार करू शकतो त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. 

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद