Thursday, December 29, 2011

गावच्या मातीची झेप दक्षिण आफ्रिकेकडे

गावाकडच्या मातीतील मुलं मुळातच कष्टाळू, धडपडी असतात अन् याचं एक उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर पांडुरंग काळगुडे हे आहेत. श्री काळगुडे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडग्याचे रहिवासी. लष्करी सेवेत काम करत असताना हा जवान देशाच्या संरक्षण सेवेतील आपल्या विशेष नैपुण्याच्या बळावर शांतिदूत बनला. दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशात भारत सरकारच्या वतीने त्याची नियुक्ती होणार आहे.सैन्य दलात मराठा बटालियनमधून भरती झालेला ज्ञानेश्वर सध्या पंजाबमधील पठाणकोट येथे नायक पदावर कार्यरत आहे. गेल्याच महिन्यात परराष्ट्रात शांतिदूत म्हणून नेमणूक करण्यासाठी पठाणकोट येथील मराठा बटालियनमधील तीन सैनिकांची निवड झाली.त्यात ज्ञानेश्वरचा समावेश करण्यात आला.यासाठी ज्ञानेश्वरचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे.कला.मानवता,अहिंसा ही मूल्ये अंगी बाळगून कल्याणासाठी त्यांचा वापर करणे शक्य असलेल्या सैनिकालाच शांतिदूत म्हणून नेमले जाते. ज्ञानेश्वरने या सर्व कसोटया पार केल्या.ज्ञानेश्वर काळगुडे शांतिदूत म्हणून २६ नोव्हेंबरला २०११ ला दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशाकडे सहा महिन्यांसाठी रवाना झाला.

Tuesday, December 27, 2011

कोरडवाहू शेतकऱ्‍यांसाठी दहा हजार कोटींचा विशेष कार्यक्रम - मुख्यमंत्री


विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी पाच वर्षात सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासोबतच कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११३ व्या जयंती उत्सवानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम तयार करताना डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शेतीविषयक विचारांचाही यात समावेश करुन हा कार्यक्रम अमरावती विभागात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Monday, December 26, 2011

ऊसाने आणली आर्थिक सुबत्ता


प्रत्येक शेती प्रकाराला त्या त्या भागातील वातावरण पोषक असतं. त्यामुळेच ती शेती त्या ठराविक भागातच चांगली होते. मात्र, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना सध्याचा तरुण शेतकरी वेगवेगळया प्रयोगाच्या माध्यमातून वातावरणाला जुळवून घ्यायला भाग पाडत आहे. अर्थात कल्पकतेला मेहनतीची जोड दिल्यावर वेगळया वातावरणात नवे पीक घेताना ठराविक भागात मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा थोडंसं कमी उत्पन्न मिळालं तरी तो प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. देवगड तालुक्यांतील पुरळ गावचे सुनील रघुनाथ फाटक यांनीही एक वेगळा प्रयोग केला आहे आणि त्याचे चांगले रिझल्टही त्यांना मिळाले.

Wednesday, December 21, 2011

Natural resources key facts from FAO

K E Y   FA C T S

From 2 000 to 5 000 litres of 
water are needed to produce 
the food consumed daily by 
one person.

Between 2000 and 2004, some 
262 million people were affected 
by climate-related disasters. 
Of these, 98 percent lived in 
developing countries.

With the world population 
expected to reach 8.2 billion by 
2030, the planet will have to feed 
an additional 1.5 billion people, 
90 percent of whom will be living 
in developing countries.

Twenty percent of the world’s 
population lives in river basin 
areas at risk of frequent flooding.

More than 1.2 billion people live 
in areas of severe water scarcity. 
About 1.6 billion people live in 
water-scarce basins where human 
capacity or financial resources are 
insufficient to develop adequate 
water resources.

An estimated 250 million people 
already have been affected by 
desertification, and nearly one 
billion more are at risk.

To Read Complete report click here...



Tuesday, December 20, 2011

आंगणेवाडीत फुलली झेंडूची शेती


केवळ पारंपरिक पिके घेण्यात न अडकता कोकणातील शेतकरी आता शेतीमध्ये वेगळे प्रयोग करुन फायदा देणारी पिके घेऊ लागला आहे. आंगणेवाडी येथील शेतकरी श्रीनिवास भानजी आंगणे यांनी प्रायोगिक तत्वावर दीड गुंठा शेतीमध्ये ' झेंडू ' ची लागवड करुन भरघोस उत्पन्न मिळविले आहे.

विविध माध्यमातून आज शेतकऱ्यांना आधुनिक पीक पध्दतीची, लागवडीची माहिती मिळत आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या श्री. आंगणे यांनी झेंडूची लागवड करण्यासाठी वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांच्याशी संपर्क साधत या फुलाच्या लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेतली. लागवडीसाठी त्यांनी' कलकत्ता रेड ' या जातीची झेंडूच्या रोपांची निवड केली. 

Monday, December 19, 2011

दुधी भोपळ्याचे पीक फायदयाचे


कोकणातील शेतकऱ्याचा आता विविध नाविन्यपूर्ण पिके घेण्यावर जास्त भर आहे. त्यामध्ये दुधी भोपळयाचेही पीक येते. दुधी भोपळ्यात फारशी पौष्टीक द्रव्ये नसली तरी कार्बोहायड्रन्टेस व खनिज द्रव्ये पुरेशा प्रमाणात असतात. यामध्ये सारक गुणधर्म असल्याने पचनास हलका असतो. दुधी भोपळ्यापासून दुधी हलवा करतात. त्यामुळे बाजारातही चांगली मागणी असते.

पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम किंवा भारी जमीन या पिकास पोषक ठरते किंवा हलक्या जमिनीतही भरपूर सेंद्रिय खताचा वापर केल्यास पीक चांगले मिळते. जमिनीचा सामू ६ ते ७ दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. मात्र, कडाक्याची थंडी या पिकास अपायकारक ठरते.

यामधील संकरित जाती पुसा नवीन, अर्का बहार, सम्राट, पुसा समर,प्रॉलिफिक लॉग, पुसा समर प्रालिफिक राऊंड, पंजाब कोमल अशा असून कोकणात लागवडीसह सम्राट जातीची शिफारस केली जाते. या जातीची फळे हिरवी व मध्यम आकाराची असून ती दंडगोलाकृती असतात व ही फळे दूरवर बाजारात पाठविल्यासही उत्कृष्ट राहतात तर हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल उत्पन्न मिळते.

लागवडीसाठी जमीन तयार करुन घेतल्यावर ३ मीटर अंतरावर ५० ते ६० सें.मी.रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस ३० से.मी.लांब,तेवढेच रुंद व खोल आकाराचे ९० सें.मी. अंतरावर खड्डे तयार करावेत. प्रत्येक आळ्यात एक ते सव्वा किलो शेणखत, १० ग्रॅम कार्बारील पावडर मातीत मिसळून घ्यावी. लागवडीपूर्वी हेक्टरी ३७ किलो नत्र, ५० किलो स्फूरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे सर्व आळ्यात सारख्या प्रमाणात विभागून द्यावे. प्रत्येक आळ्यात ३ ते ४ बिया टाकाव्यात. म्हणजे हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे पुरते. फक्त दोनच जोमदार रोपे ठेवावीत.

जास्त उत्पादनासाठी वेल मांडवावर चढवावेत. उन्हाळी हंगामात वेल जमिनीवर सोडले तरी चालतात. नत्र खताची ६० किलोची मात्रा ३० आणि ६० दिवसांनी घ्यावी. या पिकावर भुरी रोग,केवडा,कडा करपा,मावा,तांबडे भुंगेरे फळमाशी अशा रोगापासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी कॅराथोन,डायथेन एम-४५,डायथेन झेड-७८ या औषधांनी पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळे कोवळी असतानाच काढावीत. साधारणपणे फळांवर लव असताना व फळास नखाने हळूच दाबल्यास नखांचे व्रण दिसतात. अशा वेळी फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळे दर ५ ते ६ दिवसांच्या अंतराने काढावीत. हेक्टरी ३०० ते ४०० क्विंटल उत्पादन मिळते.

Wednesday, December 7, 2011

मसाला पिकांत मासरुळची आघाडी


बुलडाणा जिल्ह्यातील मासरुळ गावाची यापूर्वीची ओळख होती पानवेल, मिरची उत्पादन करणारे गाव. प्रतिकूल हवामानामुळे या पिकांना फटका बसला. आता या गावातील शेतकरी आले, हळद या पिकांमध्ये आपली ओळख तयार करण्याकडे वाटचाल करीत आहेत. या पिकातून आपली आर्थिक घडी बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अनेकदा गावांची नावे एखादे वैशिष्ट्य दर्शवितात. कधी कधी ही नावेच गावचा चेहरा असतात. बुलडाणा तालुक्यातील मासरुळ या गावाबाबत असेच म्हणता येईल. या गावात सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी मिरचीचे पीक घेतोच घेतो. मिरची पिकाने या गावाला प्रगतीची वाट दाखवली. वाईच्या बाजारपेठेपासून ते थेट दिल्ली बाजारातील व्यापारी या गावात येऊन मिरची खरेदी करतात, अशी या गावची ख्याती झाली आहे. सध्या मिरचीला हवा तसा दर मिळतोच असे नाही. निसर्गाच्या लहरीपणाचे आघात अनेकदा सोसावे लागतात. त्यामुळेच येथील गावकरी आता मिरचीला थोडा ब्रेक देऊन हळद, आले अशा नगदी पिकांच्या लागवडीकडे झुकले आहेत.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद