
Saturday, December 31, 2011
Thursday, December 29, 2011
गावच्या मातीची झेप दक्षिण आफ्रिकेकडे
गावाकडच्या मातीतील मुलं मुळातच कष्टाळू, धडपडी असतात अन् याचं एक उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर पांडुरंग काळगुडे हे आहेत. श्री काळगुडे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडग्याचे रहिवासी. लष्करी सेवेत काम करत असताना हा जवान देशाच्या संरक्षण सेवेतील आपल्या विशेष नैपुण्याच्या बळावर शांतिदूत बनला. दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशात भारत सरकारच्या वतीने त्याची नियुक्ती होणार आहे.सैन्य दलात मराठा बटालियनमधून भरती झालेला ज्ञानेश्वर सध्या पंजाबमधील पठाणकोट येथे नायक पदावर कार्यरत आहे. गेल्याच महिन्यात परराष्ट्रात शांतिदूत म्हणून नेमणूक करण्यासाठी पठाणकोट येथील मराठा बटालियनमधील तीन सैनिकांची निवड झाली.त्यात ज्ञानेश्वरचा समावेश करण्यात आला.यासाठी ज्ञानेश्वरचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे.कला.मानवता,अहिंसा ही मूल्ये अंगी बाळगून कल्याणासाठी त्यांचा वापर करणे शक्य असलेल्या सैनिकालाच शांतिदूत म्हणून नेमले जाते. ज्ञानेश्वरने या सर्व कसोटया पार केल्या.ज्ञानेश्वर काळगुडे शांतिदूत म्हणून २६ नोव्हेंबरला २०११ ला दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशाकडे सहा महिन्यांसाठी रवाना झाला.
Tuesday, December 27, 2011
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचा विशेष कार्यक्रम - मुख्यमंत्री
विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी पाच वर्षात सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासोबतच कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११३ व्या जयंती उत्सवानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम तयार करताना डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शेतीविषयक विचारांचाही यात समावेश करुन हा कार्यक्रम अमरावती विभागात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Monday, December 26, 2011
ऊसाने आणली आर्थिक सुबत्ता
Wednesday, December 21, 2011
Natural resources key facts from FAO
K E Y FA C T S
From 2 000 to 5 000 litres of
water are needed to produce
the food consumed daily by
one person.
Between 2000 and 2004, some
262 million people were affected
by climate-related disasters.
Of these, 98 percent lived in
developing countries.
With the world population
expected to reach 8.2 billion by
2030, the planet will have to feed
an additional 1.5 billion people,
90 percent of whom will be living
in developing countries.
Twenty percent of the world’s
population lives in river basin
areas at risk of frequent flooding.
More than 1.2 billion people live
in areas of severe water scarcity.
About 1.6 billion people live in
water-scarce basins where human
capacity or financial resources are
insufficient to develop adequate
water resources.
An estimated 250 million people
already have been affected by
desertification, and nearly one
billion more are at risk.
To Read Complete report click here...
Tuesday, December 20, 2011
आंगणेवाडीत फुलली झेंडूची शेती
विविध माध्यमातून आज शेतकऱ्यांना आधुनिक पीक पध्दतीची, लागवडीची माहिती मिळत आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या श्री. आंगणे यांनी झेंडूची लागवड करण्यासाठी वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांच्याशी संपर्क साधत या फुलाच्या लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेतली. लागवडीसाठी त्यांनी' कलकत्ता रेड ' या जातीची झेंडूच्या रोपांची निवड केली.
Monday, December 19, 2011
दुधी भोपळ्याचे पीक फायदयाचे
पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम किंवा भारी जमीन या पिकास पोषक ठरते किंवा हलक्या जमिनीतही भरपूर सेंद्रिय खताचा वापर केल्यास पीक चांगले मिळते. जमिनीचा सामू ६ ते ७ दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. मात्र, कडाक्याची थंडी या पिकास अपायकारक ठरते.
यामधील संकरित जाती पुसा नवीन, अर्का बहार, सम्राट, पुसा समर,प्रॉलिफिक लॉग, पुसा समर प्रालिफिक राऊंड, पंजाब कोमल अशा असून कोकणात लागवडीसह सम्राट जातीची शिफारस केली जाते. या जातीची फळे हिरवी व मध्यम आकाराची असून ती दंडगोलाकृती असतात व ही फळे दूरवर बाजारात पाठविल्यासही उत्कृष्ट राहतात तर हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल उत्पन्न मिळते.
लागवडीसाठी जमीन तयार करुन घेतल्यावर ३ मीटर अंतरावर ५० ते ६० सें.मी.रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस ३० से.मी.लांब,तेवढेच रुंद व खोल आकाराचे ९० सें.मी. अंतरावर खड्डे तयार करावेत. प्रत्येक आळ्यात एक ते सव्वा किलो शेणखत, १० ग्रॅम कार्बारील पावडर मातीत मिसळून घ्यावी. लागवडीपूर्वी हेक्टरी ३७ किलो नत्र, ५० किलो स्फूरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे सर्व आळ्यात सारख्या प्रमाणात विभागून द्यावे. प्रत्येक आळ्यात ३ ते ४ बिया टाकाव्यात. म्हणजे हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे पुरते. फक्त दोनच जोमदार रोपे ठेवावीत.
जास्त उत्पादनासाठी वेल मांडवावर चढवावेत. उन्हाळी हंगामात वेल जमिनीवर सोडले तरी चालतात. नत्र खताची ६० किलोची मात्रा ३० आणि ६० दिवसांनी घ्यावी. या पिकावर भुरी रोग,केवडा,कडा करपा,मावा,तांबडे भुंगेरे फळमाशी अशा रोगापासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी कॅराथोन,डायथेन एम-४५,डायथेन झेड-७८ या औषधांनी पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळे कोवळी असतानाच काढावीत. साधारणपणे फळांवर लव असताना व फळास नखाने हळूच दाबल्यास नखांचे व्रण दिसतात. अशा वेळी फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळे दर ५ ते ६ दिवसांच्या अंतराने काढावीत. हेक्टरी ३०० ते ४०० क्विंटल उत्पादन मिळते.
Sunday, December 18, 2011
FAO Media Centre: Major gains in efficiency of livestock systems needed
Populations and income growth are fueling an ongoing trend towards greater per capita consumption of animal protein in developing countries, says the report, World Livestock 2011. Meat consumption is projected to rise nearly 73 percent by 2050; dairy consumption will grow 58 percent over current levels.
Thursday, December 8, 2011
Wednesday, December 7, 2011
मसाला पिकांत मासरुळची आघाडी
अनेकदा गावांची नावे एखादे वैशिष्ट्य दर्शवितात. कधी कधी ही नावेच गावचा चेहरा असतात. बुलडाणा तालुक्यातील मासरुळ या गावाबाबत असेच म्हणता येईल. या गावात सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी मिरचीचे पीक घेतोच घेतो. मिरची पिकाने या गावाला प्रगतीची वाट दाखवली. वाईच्या बाजारपेठेपासून ते थेट दिल्ली बाजारातील व्यापारी या गावात येऊन मिरची खरेदी करतात, अशी या गावची ख्याती झाली आहे. सध्या मिरचीला हवा तसा दर मिळतोच असे नाही. निसर्गाच्या लहरीपणाचे आघात अनेकदा सोसावे लागतात. त्यामुळेच येथील गावकरी आता मिरचीला थोडा ब्रेक देऊन हळद, आले अशा नगदी पिकांच्या लागवडीकडे झुकले आहेत.
Friday, December 2, 2011
Thursday, November 24, 2011
हळदीचे माहेरघर असलेले एक गाव
हळदीच्या पिकाची लागवड ही शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करुन घेणे आवश्यक असते. हे पीक लवकर केल्यास झाडांच्या वाढीस जास्त कालावधी मिळतो व त्यामुळे हळदीच्या उत्पादनात बरीचशी वाढ होते. या पिकासाठी जास्त सेंद्रिय पदार्थ असलेली किंवा नरम जमिनीची निवड योग्य ठरत असल्याचे येथील शेतकरी विठ्ठलराव रामराव देशमुख यांचे म्हणणे आहे. हळदीच्या लागवडीसाठी कंदाचा वापर केला जातो. हळद लागवडीसाठी गोल बेण्याचे बियाणे वापरणे कधीही चांगले असते. ही लागवड करताना चार ते सहा इंच एवढे अंतर दोन हळदीच्या कंदांमध्ये ठेवावे लागते. या लागवडीसाठी साधारणपणे प्रतिहेक्टरी २४ ते २५ क्विंटल बियाणे पुरेसे असते.
Tuesday, November 22, 2011
“Climate-Smart” Agriculture..
“Climate-Smart” Agriculture.
Policies, Practices and Financing for Food Security, Adaptation and Mitigation.
Over the past six decades world agriculture has become considerably more efficient.
Improvements in production systems and crop and livestock breeding programmes have resulted in a doubling of food production while increasing the amount of agricultural land by just 10 percent. However, climate change is expected to exacerbate the existing challenges faced by agriculture.The purpose of this paper is to highlight that food security and climate change are closely linked in the agriculture sector and that key opportunities exist to transform the sector towards climate-smart systems that address both.
Sunday, November 20, 2011
Agriculture key to addressing future water and energy needs
17 November 2011, Rome/Bonn - As pressure on the world's water resources reaches unsustainable levels in an increasing number of regions, a "business-as-usual" approach to economic development and natural resource management will no longer be possible, FAO said today.
Agriculture will be key to the implementation of sustainable water management, the Organization told attendees at an international meeting on water, energy and food security being held in Bonn.
Speaking on the sidelines at the Bonn 2011 Nexus Conference, FAO Assistant Director-General for Natural Resources, Alexander Mueller, said: "Tackling the challenges of food security, economic development and energy security in a context of ongoing population growth will require a renewed and re-imagined focus on agricultural development. Agriculture can and should become the backbone of tomorrow's green economy."
The conference in Bonn has been convened by Germany's Federal Ministry of Economic Cooperation and Development as a lead up to the UN's "Rio+20" Conference on Sustainable development in June 2012. It brings together leading actors in economic development, natural resource management and environmental policy and the food and energy sectors to look for new approaches to managing the interconnections between water, energy and food.
Saturday, November 19, 2011
महाराष्ट्रातील दोन दूध उत्पादकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान
नवी दिल्लीतील भारतीय कृषी विज्ञान केंद्र, पुसा येथे एका शानदार सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याच्या शालिनी राधाकृष्ण विखे-पाटील आणि सांगली जिल्ह्याचे प्रकाश दत्तात्रय पाटील हे दूध उत्पादक शेतकरी आहेत. या पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र, व २१ हजार रोख असे आहे.
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र...
रत्नागिरी शहराजवळच्या भाट्ये गावातील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा प्रथम पुरस्कार मिळाला. कोकणातील शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून नारळाच्या नवनवीन जाती विकसित करण्याच्या केंद्राच्या कार्याला ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता आहे.
भारतात पामवर्गीय महत्त्वाची चार पिके असून त्यात नारळ, तेलताड, पालमेरा (तोडगोळे) आणि सुल्पी (सुरमाड) आदींचा समावेश आहे. या पिकांवर देशातील २२ केंद्रात संशोधन सुरू आहे. यापैकी सर्वाधिक १३ केंद्रांवर नारळावर संशोधन सुरू आहे. या सर्व केंद्रांची द्वैवार्षिक सभा भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. त्यामध्ये दोन वर्षात झालेल्या संशोधनावर आधारित शिफारस करण्यात येऊन पुढील संशोधनाची दिशा ठरविण्यात येते. या वर्षात कासारकोड (केरळ) येथील 'केंद्रीय रोपण पिके संशोधन केंद्र' येथे घेण्यात आली. सभेत उत्कृष्ट काम करणाऱ्या संशोधन केंद्राची निवड करून त्यांना 'कै.अमित सिंग मेमोरीअल फाऊंडेशन पुरस्कार' देण्याचे निश्चित करण्यात आले. या पुरस्काराचा मान प्रथमच रत्नागिरी येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठांतर्गत स्थापण्यात आलेल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मिळाला.
Tuesday, November 15, 2011
शोभिवंत माशांचे संगोपन
Friday, November 11, 2011
अखेर शेतकरी जिंकले...कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये.
अखेर शेतकरी जिंकले...
ऊस दरावर तडजोड_
कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये
तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये प्रस्ताव.
ऊसदर आंदोलनाचा यशस्वी समारोप :
राज्यात सुरु असलेल्या उसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनांचे नेते आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत दरावर एकमत झालं आहे.
तब्बल साडेतीन तासांच्या बैठकीनंतर अखेर दोन्ही बाजूंनी लवचिकता दाखवल्याने सहमती होऊ शकली. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेत ऊसाच्या दरावर तडजोड केल्यानंतर अखेर निर्णय घेण्यात आला. सरकारने राज्यात ऊसासाठी तीन वेगवेगळे दर जाहीर केले आहेत.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऊसासाठी राज्यभरात पहिला हफ्ता जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर- सातारा- सांगली जिल्ह्यांसाठी पहिला हफ्ता २०५० रुपये प्रतिटन, पुणे-अहमदनगर- सोलापूर जिल्ह्यांसाठी १८५० रुपये प्रतिटन, खानदेश-विदर्भ-मराठवाडा जिल्ह्यांसाठी १८०० रुपये प्रतिटन इतका जाहीर करण्यात आला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. राजू शेट्टी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर आहेत.
दरम्यान लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. साखर आयुक्त किंवा सहकार आयुक्तांकडून लेखी आश्वासन आल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
सहकारमंत्र्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिनिधींकडे पत्र सोपवलं असून ते काही वेळातच शेट्टी यांच्याकडे पोहोचेल. त्यामुळे खासदार शेट्टींनी उपोषणाचा समारोप करणं ही फक्त औपचारिकता आहे.
Thursday, November 10, 2011
जंगलसंवर्धनासाठी अनोखा उपक्रम
सध्याचा स्थितीत शहरीकरण व औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या शहरीकरण व औद्योगीकरणासाठी नागरी समुदाय मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती उपयोगात आणत आहे. मात्र, जंगल संपत्तीच्या शाश्वत उपयोग व्हावा, हा विचार कुठेही दिसून येत नाही
सागवान आपल्या दारी
केवळ शेतीच्या भरवशावर न राहता शेतकऱ्यांनी कृषी आधारित इतर उत्पन्नाची साधने निर्माण करावी, यासाठी शासन नेहमीच शेतकऱ्यांना पाठबळ देत आले आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी दुग्धव्यवसायासह अनेक प्रकारचे जोडधंदे करू लागले आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम सामाजिक वनीकरण विभागाने यवतमाळ जिल्ह्यात राबविला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या धुऱ्यावर, बंधाऱ्यावर तसेच अनुत्पादनक क्षेत्रांवर सागवानाची लागवड केल्यास त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ‘सागजडी आपल्या दारी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
Tuesday, November 8, 2011
युवा शेतकऱ्याने पिकविली पपई बाग
उमरखेड पासून ६ किलोमिटर अंतरावर बेलखेड नावाचे गाव आहे. या गावातील युवा शेतकऱ्यांनी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी एक गट तयार केला आहे. गटातील हे शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतावर राबवित असतात. या युवा शेतकऱ्यांपैकी सुदर्शन नारायण कदम या शेतकऱ्याने परंपरागत शेती व पिक पध्दतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पपईची उत्कृष्ठ बाग फुलविली आहे. अवघ्या साडेसात महिन्याच्या कालावधीत या युवा शेतकऱ्याच्या पपईला चांगली बाजारपेठ देखील मिळू लागली आहे. त्यांची बहरलेली पपईची शेती पाहता अन्य शेतकऱ्यांची मार्गदर्शसाठी त्यांच्याकडे गर्दी दिसते.
सुदर्शन कदम यांनी मागील वर्षी १२ डिसेंबर २०१० रोजी आपल्या शेतामध्ये ७२ गुंठ्यामध्ये पपई पिकाची लागवड केली. पपईच्या दोन झाडांतील अंतर त्यांनी १० X ४.५० एवढे ठेवले. आधुनिक ड्रीप तंत्रज्ञानाचा वापर करुन या झाडांच्या सिंचनाची सुविधाही त्यांनी करून घेतली. अवघ्या सोडसात महिन्यात त्यांच्या पपईच्या फळ बागेला बहर आला आहे. एका झाडाला खालून वरपर्यंत लदबद पपईची फळं लगडली असून आजच्या स्थितीत एका झाडाला एक क्विंटलच्यावर पपई आहेत.
Friday, November 4, 2011
मोफत मत्स्यबीज योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
म्हसळा तालुक्यात शेतकरी सल्ला समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी सल्ला मसलत करुन विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खोदलेल्या शेततळ्यांना मोफत मत्स्यबीज देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा अनोखा उपक्रम तालुक्यात केला.
हवामानामध्ये सातत्याने होणारे फेरबदल लक्षात घेऊन खरीप हंगामातील भातशेतीसोबतच अन्य शेतीपूरक व्यवसाय करुन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी तालुका कृषिविभागामार्फत सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १३ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत.
हवामानामध्ये सातत्याने होणारे फेरबदल लक्षात घेऊन खरीप हंगामातील भातशेतीसोबतच अन्य शेतीपूरक व्यवसाय करुन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी तालुका कृषिविभागामार्फत सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १३ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत.
Tuesday, November 1, 2011
शेतकऱ्याची मुलगी ठरली ७ अब्जावं बाळ
लखनौ : एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेलं कन्यारत्न म्हणजेच नरगिस ही मुलगी जगातील ७ अब्जावं बाळं म्हणून निवडली गेली आहे. भारतात मुलींच्या भ्रूण हत्येवर लक्ष केंद्रित करण्याचा हा उद्देश आहे. बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या प्लान इंटरनॅशनलच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मळगाव येथे नरगिस ही मुलगी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी जन्माला आली.
नरगिस ही मुलगी जगात जन्माला येणारं ७ अब्जावं बाळ आहे.प्लान इंटरनॅशनलच्या मते नरगिसला प्रतिकात्मक म्हणून निवडण्यात आलंय, कारण जगात ७ अब्जावं कोणतं बाळ जन्माला आलं, हे सांगण कठीण आहे.
फिलिपाईन्समध्येही मनिलात जन्माला आलेल्या एका मुलीला प्रतिकात्मक म्हणून ७ अब्जावं बाळ म्हणून घोषित करण्यात आलंय. भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलांचा जन्म होतो. त्यातील ११ मुलंही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात जन्म घेतात.
नरगिस ही मुलगी जगात जन्माला येणारं ७ अब्जावं बाळ आहे.प्लान इंटरनॅशनलच्या मते नरगिसला प्रतिकात्मक म्हणून निवडण्यात आलंय, कारण जगात ७ अब्जावं कोणतं बाळ जन्माला आलं, हे सांगण कठीण आहे.
फिलिपाईन्समध्येही मनिलात जन्माला आलेल्या एका मुलीला प्रतिकात्मक म्हणून ७ अब्जावं बाळ म्हणून घोषित करण्यात आलंय. भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलांचा जन्म होतो. त्यातील ११ मुलंही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात जन्म घेतात.
राजुऱ्याचा मिरची बाजार
वरुड तालुका संत्र्याकरिता प्रसिध्द आहे. मिरचीचे उत्पादनासुध्दा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या परिसरातील मिरचीने देश विदेशात स्थान मिळविले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मिरची बाजार फुलायला सुरुवात होते. मिरची उत्पादकांच्या गाड्या दर दिवसाला येत असते.
Monday, October 31, 2011
गाजर गवत : गरज समूळ उच्चाटनाची
अत्र तत्र सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपाणी न घातला पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा कडेला, शेताच्या बांधावर, जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते. गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.
या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत. त्यामुळे गाजर गवताच्या समूळ उच्चाटनाची गरज लक्षात घेऊन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या सकल्पनेतून अमरावती येथे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ मंडळींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
राज्यात सुमारे चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापलेले आढळते. तसेच शेतीच्या पीक उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कृषी उत्पादनात वाढ करणे आणि गाजर गवताचे निर्मूलन करणे यासाठी सन २००६ मध्ये विधानसभेत ठराव पारित करण्यात आला होता. अजूनही हे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून या घातक गाजर गवताचे उच्चाटनासाठी तीन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम संबंधित यंत्रणेनी राबवावा या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन
ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचचे उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे.
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात.
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात.
पॉवर टिलर ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान
फार वर्षापूर्वी शेतकरी हा लाकडाच्या नांगराचा वापर शेतीच्या मशागतीसाठी करीत होता. यानंतर लोखंडी नांगराचा वापर करु लागला यासाठी बैलजोडी हे माध्यम होते. कालांतराने वाढत्या महागाईमुळे मजुरांची रोजंदारी वाढली, तसेच गुरांसाठी वैरणाची - चाऱ्याची कमतरता भासू लागली याचे परिणाम चाऱ्याचे दर वाढीवर झाले त्यामुळे शेतीसाठी बैलजोडी न परवडणारी झाली. शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्रीची आवश्यकता निर्माण झाली. त्यापैकीच पॉवर टिलर उपयुक्त ठरु लागला.
Wednesday, October 26, 2011
सेंद्रिय शुद्धता
पुष्पा कोंडविलकर यांचेकडे पारंपरिक फळबाग आणि भाताची शेती होत असे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात येई. सेंद्रिय खताविषयी अधिक माहिती घेतल्यावर बाहेरून किंमत मोजून खत आणण्याऐवजी आपल्याच शेतात सेंद्रिय खताचे युनिट उभारण्याचे त्यांनी निश्चित केले. २००५ मध्ये श्री समर्थ गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोंडविलकर गुरुजींनी निवृत्तीनंतर या युनिटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. प्रकल्पाची गुणवत्ता चांगली असली तर भूमीपुत्राचे ऋण फेडण्यासाठी खत प्रकल्पाच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल म्हणून त्यांनी या प्रकल्पाचा सूक्ष्म अभ्यास केला.
रेशीम शेती....फायदा किती
प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. शेतीमध्ये महिला केवळ निंदण, वखरण, मशागत आदी कामे करीत नाहीत तर या कामासोबतच संपूर्ण शेतीचा डोलारा आपल्या खांद्यावर घेतात. रेशीमच्या उत्पादनातून एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया वरखेडच्या कुसुमताई ढगे यांनी केली आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वरखेड येथील श्रीमती ढगे यांनी रेशीम उद्योगात आदर्श निर्माण केला असून एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पाच वर्षात त्यांनी हा पल्ला गाठला आहे. पाथरीपासून १५ कि.मी. अंतरावर वरखेड शिवारात रामदास ढगे हे शेतातच राहतात. त्यांच्या पत्नी कुसूमताई यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीला प्राधान्य दिले. पाच वर्षापासून त्या यशस्वीरित्या रेशीम शेती करीत आहेत. कुसूमताईंनी अडीच एकरात तुतीची लागवड केली असून त्यापासून त्यांना दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांचे रेशीम कोषाचे उत्पन्न मिळत आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वरखेड येथील श्रीमती ढगे यांनी रेशीम उद्योगात आदर्श निर्माण केला असून एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पाच वर्षात त्यांनी हा पल्ला गाठला आहे. पाथरीपासून १५ कि.मी. अंतरावर वरखेड शिवारात रामदास ढगे हे शेतातच राहतात. त्यांच्या पत्नी कुसूमताई यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीला प्राधान्य दिले. पाच वर्षापासून त्या यशस्वीरित्या रेशीम शेती करीत आहेत. कुसूमताईंनी अडीच एकरात तुतीची लागवड केली असून त्यापासून त्यांना दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांचे रेशीम कोषाचे उत्पन्न मिळत आहे.
Thursday, October 20, 2011
इतिहास खेड्यांचा..
भारत हा खेडयांचा देश आहे. भारतातील ७० टक्के लोक आज सुध्दा खेडयांतच राहतात. त्यामुळे भारतीय जीवनाचे खेडे हे प्रमुख केंद्र फार प्राचीन काळापासून आहे. वेदकाळातील वाङमयामध्ये खेडयांचे महत्व वर्णिले आहे. एकंदरीत सर्वच दृष्टीकोनातून खेडयांचे भारतीय जीवनातील महत्वपूर्ण स्थान निश्चित झाले आहे. राज्यकारभारातील प्रमुख घटक म्हणून, सांस्कृतिक जीवनातील प्रमुख केंद्र म्हणून, सामाजिक जीवनातील प्रमुख आधार म्हणून खेडयांचे महत्व ओळखले गेले आहे. भारताचा आत्मा खेडयात राहतो, असे यथार्थ वर्णन महात्मा गांधी यांनी केले होते.
सौर ऊर्जा कुंपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा
Wednesday, October 19, 2011
'धवल' यशाचा मार्ग
कारल्याचे गोड गाव
आज गावातून दळणवळण वाढले आहे. ६० कुटुंब आणि ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात १९१ हेक्टर शेतीचे क्षेञ आहे. मूग,कापूस,सोयाबीन आणि उडीद या पारंपारिक पिकातून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालण्याची कसरत फार मोठी होती,असे सांगणारे शेतकरी कारल्यानेच तारले,असे अभिमानाने सांगतात.
हिरव्या शेतात पिकतयं 'सोनं'
घनकचऱ्यापासून सेंद्रिय आणि जैविक खतनिर्मिती
अकोल्यातील भूधन ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २००३ मध्ये शहरापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या अमानतपूर ताकोंडा येथे खतनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी महानगरातील घनकचरा पुरविण्यात येतो. त्यासाठी मनपाला प्रती खेप १०० रुपये मिळतात. हा प्रकल्प सुरु झाल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे मनपाला सहज शक्य झाले आहे.
Sunday, October 16, 2011
लिंबूवर्गीय फळांची आता यंत्राने तोडणी
पारंपरिकतेसोबतच व्यावसायिक शेतीकामात मजुरांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या उपलब्धतेच्या या समस्येचे समाधान काही अंशी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच हा एक पुढील टप्पा बनू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
शेतक-यांनी तयार केली पाण्याची बँक
Wednesday, October 12, 2011
गोंधळवाडीचा गोडंबी उद्योग
अमानीतील पंरपरागत गोडंबी उद्योग,त्यापासन झालेली रोजगार निर्मिती व मिळणारे उत्पन्न अशी सर्वांग माहिती मिळविण्यासाठी गोंधळवाडी येथील रामदास गोदमले यांनी पुढाकार घेतला.बिब्बा उद्योगाशी संबंधित माहिती घेतल्यानंतर कोरडवाहू शेतीला या गोडंबी उद्योगाची जोड दिल्यास निश्चितच उत्पन्नात भर पडेल आर्थिक स्थैर्य लाभेल असा विश्वास या गावातील रामदास गोदमले यांना आला. त्यानंतर त्यांनी अमानीतील या उद्योगाकरिता लागणा-या कच्चा मालाचे पुरवठादारांशी संपर्क साधत त्यांच्याशी व्यावसायिक बोलणी केली. गेल्या चार वर्षापासून गोंधळवाडीतील बहुतांश घरात बिब्बे फोडून गोडंबी उत्पादन घेतले जाते.
बंधा-यात पाणी...... ग्रामस्थ समाधानी
पंढरपूर तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणारे गाव म्हणून गादेगावचा उल्लेख होतो. गावाच्या विकासाबाबत येथील नागरिक सदैव जागरुक असतात. पंढरपूर तालुक्याच्या पश्च्चिमेला असणा-या व सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या गादेगाव मध्ये प्रशासन व जनता एक विधायक कामासाठी एकत्र आली आणि त्यातून उभे राहिले एक सकारात्मक कार्य.
या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
चांदवडी माळरानावर फुलविली आमराई
सौ. पाटणे यांचे पती हिंदूराव पाटणे राज्य परिवहन महामंडळाकडे वाहक पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांना शेतीकडे पुरेसा वेळ देता येत नाही. पूर्वीचे हे गाव धोम धरणात गेल्यामुळे जांब, खडकी, मर्ढे या गावांच्या माळावर या प्रकल्पग्रस्तांना वसविण्यात आले आहे. पुनर्वसित मंडळींना थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या गावात शेतजमिनी मिळाल्यामुळे प्रयोगशील शेती करता येत नव्हती. हीच अवस्था सुनंदा पाटणे यांची होती.
सामाजिक वनीकरणाने बहरले रस्ते
Monday, October 10, 2011
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्प - राधाकृष्ण विखे पाटील
राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या डाग पाझर तलावाचे भूमिपूजन व कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्पाचा शुभारंभ श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
Thursday, October 6, 2011
समाजात मांगल्य निर्माण करू या - मुख्यमंत्री
विजयादशमी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि विजयोत्सवाचा सण आहे. दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तींच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण हा सण उत्साहाने साजरा करतो. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद याबरोबरच जातीभेद, वर्णभेद, धर्मांधता, अंधश्रद्धा याविरुद्ध लढण्यासाठी विजयादशमीचे पर्व प्रेरणादायक आहे. या पवित्र सणाशी अनेक पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ जोडले असले तरी याचे केवळ प्रतिकात्मक महत्व नाही, तर आपण सर्वांनी यानिमित्ताने एकत्र येऊन समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करून मांगल्याचे स्वागत करूया असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
राज्यात हळव्या भाताची काढणी सुरु तर भुईमूग, तूर, कापूस पक्वतेच्या अवस्थेत
राज्यात चालू वर्षी आतापर्यंत १,१६७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळी, सातारा जिल्ह्यातील मान दहीवडी, सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, पलूस, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यातील भोकर, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी अशा एकूण ११ तालुक्यात ४० ते ६० टक्के एवढाच पाऊस झाला आहे.
जलसंधारणामुळे लोधवड्यात पाणीच पाणी
उन्हाळ्यात लोधवडेकरांच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असे, ही स्थिती बदलायला हवी हे समजत होते, पण त्यासाठी काय करावे हेच गावकऱ्यांना उमजत नव्हते. याच दरम्यान गावचे सुपुत्र व सध्याचे कृषि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून इंडोजर्मन प्रकल्पाचे फादर रॉबर्ट डिकोस्टा यांनी गावाला भेट दिली आणि लोधवडेकरांच्या भाग्योदयास सुरवात झाली. या प्रकल्पाची सुरवात गावात करण्यात आल्याने अनेकांना रोजगराही मिळाला. सुरवातीला लोकांनी श्रमदानातून काम करून इंडोजर्मनच्या परीक्षेत ग्रामस्थांनी बाजी मारली.
जमिनीच्या पुनर्मोजणी संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय - मुख्यमंत्री
राज्यातील भूमि पुनर्मोजणीसंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत केले.
राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP)अंतर्गत भू -मापन संदर्भात जमाबंदी आयुक्त आणि संचालक चंद्रकांत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले, त्यावेळी ते बोलत होते.
या सादरीकरणास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर.आर.पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजीव अग्रवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव एस.के. श्रीवास्तव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. नितीन करीर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Tuesday, October 4, 2011
फुलशेतीतून लाखाचे उत्पन्न
श्री. पडघणे पाच वर्षांपूर्वी वरुडच्या नर्सरीत रोपट्यांना पाणी देण्याचे काम करीत होते. चिकित्सक वृत्तीमुळे पाणी देण्याबरोबरच झाडावर डोळे बांधून कलम तयार करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. एवढ्यावरच न थांबता नर्सरी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. त्यादृष्टीने थोडीफार बचत करीत व मक्त्याने शेती करून पैसा जमविला व दीड एकर शेती विकत घेतली. या शेतीत फुलशेती फुलवून श्री. पडघणे यांनी आर्थिक बाजू भक्कम केली. गुलाब, निशीगंध, ग्लॅरेडिया, वॉटर लिली, झेंडू आदी फुलांची लागवड करून त्यांचा शहरातील बाजारपेठेत पुरवठा केला. यातून त्यांनी नागपूर रोडवर नर्सरीसाठी जागा विकत घेतली. श्री. पडघणे यांची नर्सरी आज तेथे बहरली आहे.
Sunday, October 2, 2011
मत्स्य व्यवसायाने मालामाल केले
गटाचा व्यवहार सुरळीत असल्यामुळेच युको बॅक ,नगरधनच्या बॅक व्यवस्थापकाने गटाचे ग्रेडेशन करुन गटाला प्रथम कर्ज १५ हजार उपलब्ध करुन दिले. यापैकी मालाबाई यांनी रुपये पाच हजार कर्ज गटाकडून २ टक्के व्याज दराने घेतले. त्यामुळे छोट्या तळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टप्प्या टप्याने सदर कर्जाची गटाला परतफेड केली. त्यातून मालाबाईला रुपये दोन हजार सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा मिळाला.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फुलविली पपई बाग
अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत या शेतकऱ्याला पहिल्या तोड्यात १ लाख १० हजार रुपये तर दुसऱ्या तोड्यात ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. गोविंद तासके यांनी मागील वर्षी १८ नोव्हेंबर २०१० रोजी दोन हेक्टरमध्ये पपई पिकाची लागवड केली होती. पपईच्या दोन झाडातील अंतर त्यांनी ७ बाय ८ ठेवून ड्रीप तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे सिंचन करणे सुलभ झाले. एका झाडाला ७० ते १०० पर्यंत पपया लागल्या आहेत. दोन हेक्टरमध्ये १ लाख ६० हजार रुपये खर्च आला. शेतात ३ हजार झाडे उभी असून येत्या काळात ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे तासके यांनी सांगितले.
Wednesday, September 28, 2011
डेरा आंदोलन स्थगित
कोरडवाहू शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली अमरावती ते कराड ही यात्रा स्थगित केल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली. ही यात्रा सोमवारी विदर्भ, मराठवाड्यातून पुण्यात दाखल झाली. यावेळी बच्चू कडू, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मागण्या लवकरच मान्य होतील असं सांगितलं. बच्चू कडू यांच्या मागण्यांपैकी अनेक मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत स्वत: केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत. याबाबत एक महिनाभरात योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांना सांगितलं. त्यानंतर डेरा आंदोलन स्थगित करत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं.
या मागण्या महिनाभरात मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Starmajha.
Starmajha.
Tuesday, September 27, 2011
वन हक्कामुळे वन निवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम
अनुसूचित जमाती व परंपरागत वन निवासी कायदा २००६ व नियम २००८ अनुसार पिढ्यानपिढ्या जंगलामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जमाती आणि इतर वननिवासींना केंद्र शासनाच्या वनाधिकार अधिनियमामुळे वैयक्तिक व सामुहिक वनाचा अधिकार मिळाला. मेंढालेखा या गावाला १५ ऑगष्ट २००९ रोजी सामुहिक वनहक्क देण्याची घोषणा करण्यात आली. २८ ऑगष्ट २००९ ला मेंढा (लेखा) गावाला १ हजार ८०९.६१ हेक्टरवर वन जमिनीवर सामुहिक वनहक्क देण्याबाबत स्वाक्षरी करण्यात आली आणि १५ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन राज्यपाल एस. जे. जमीर यांचे हस्ते मेंढा ग्रामसभेला अधिकारपत्र देण्यात आले.
Sunday, September 25, 2011
हिंगोलीत एक व्यक्ती दोन झाड उपक्रम
'जिवंत सात-बारा मोहीम'
जिथे राबती हात, तेथे श्रीहरी
तेंदुपत्ता संकलनात गडचिरोली राज्यात अग्रेसर
यावर्षी एकटया गडचिरोली वनवृत्तातून २ लाख ९७ हजार ७७० स्टॅडर्ड बॅग तेदुपत्ता संकलन करण्यात आले. हंगामी रोजदाराच्या माध्यमातून बेरोजगारांना काम व राज्य शासनाला कोटयावधी रुपयांचा महसूल मिळतो. गावांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदा शासनाने यावर्षी तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट गावातील ग्रामपंचयातीनाच देण्याचे ठरविले. मात्र त्यानंतर काहीच निर्णय झाला नाही. अखेरीस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कंत्राटदाराच्या मार्फतीनेच तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यात येईल, असे शासनातर्फे जाहिर करण्यात आले. त्यानंतर तेंदू युनिटची खरेदी केली. त्यानंतर जिल्हयात तेंदूपत्ता संकलनाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
Saturday, September 24, 2011
सहकारातून रोजगार
शेतीशाळा प्रशिक्षणामुळे उत्पादनात वाढ
आंतरपिकाने फुलविला शेतमळा
Sunday, September 18, 2011
कांद्याच्या निर्यातीबाबत मंगळवारी केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत निर्णय घेणार - केंद्रीय अर्थमंत्री
कांदा पिकाच्या निर्यातीबाबत मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील कांदा, साखर निर्यात आणि कापूस पिकाच्या दरवाढीमुळे सूत गिरण्यांवर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील कांदा, ऊस आणि कापूस या नगदी पिकांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री डॉ. पंतगराव कदम, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, कृषी व पणन सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वस्त्रोद्याग प्रधान सचिव सुनील पोरवाल, सहकार सचिव राजगोपाल देवरा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Tuesday, September 13, 2011
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी - छगन भुजबळ
नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असून भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी, देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी कळकळीची मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीसाठी ते आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पंतप्रधानाचे प्रधान सचिव टी.के.ए.नायर यांची भेट घेतली. यावेळी एक निवेदन त्यांना सादर करण्यात आले असून या प्रकरणात पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. नाशिक व परिसरात सध्या कांद्याचे भाव प्रचंड घसरले असून कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत असल्याची माहिती त्यांनी या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शेळीपालनातून हजारोची बचत !
धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील छावडी गावात दि. २६ जानेवारी, २००८ रोजी सातपुडा सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. ध्येय कसे गाठावे याचे योग्य नियोजन केले. गटाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती अंजना किशन पिंपळे व सचिव म्हणून श्रीमती पुनम ओंकार पिंपळे यांची निवड करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया, निजामपूर शाखेत गटाच्या नावाने खाते उघडले.
या बचत गटास खेळते भांडवल शासनाने दिलेले अनुदान याचा योग्य तो फायदा उठवत गटाने आपली यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न चालवला व दिलेले रुपये २५,००० कर्ज फेड वेळीच करत त्यांनी शासनाने दिलेले १ लाख रुपये एवढया रकमेचे अनुदान कायमस्वरुपी खेळते भांडवलाचा फायदा मिळवून घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Keywords
अंजीर
अंतरपिक
अन्नधान्य
अन्नसुरक्षा अभियान
आंबा
आदिवासी
आधुनिक पोल्ट्री व्यवसाय
आवळा
इस्त्रो
उपमुख्यमंत्री
उस
ऊस
ऊसतोडणी
ऍग्रो टुरिझम
कर्जमाफी
कांदा
कात
कापूस
कारले
कीडनियंत्रण
कुक्कुटपालन
कृषि उत्पन्न बाजारसमिति
कृषि योजना
कृषी दिन
कृषी विद्यापीठ
कृषीतंत्र
कृषीमंत्री
केळी
कोकम
कोळंबी
खते
खरबूज
गहू
जमिन
जलसंधारन
झरा
ट्रक्टर
ठिबक
डाळिंब
डाळींब महोत्सव - 2010
ढोबळी मिरची
तलाव
तुर
तेल्या
दुग्धव्यवसाय
दॅट उपकरण
द्राक्ष
निर्यात
निलक्रांती
पाणी
पाणी अडवा
पाणी जिरवा
पान
पीक
पुरंदर
पृथ्वीराज चव्हाण
प्रक्रिया उद्योग
फलोत्पादन
फळबाग
फायटोप्थोरा
बचत गट
बटाटा
बागाईतदार
बाजारपेठ
बाजारभाव
बायोगॅस
बियाणांची गुणवत्ता
बी-बियाणे उपलब्धता
बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival.
भाजीपाला.
भात
भेंडी
मच्छिमार
मजूर
मत्स्य व्यवसाय
मधशाळा
मधुमक्षिका पालन
मराठवाडा कृषी विद्यापीठ
महा-रेन
महाकृषी
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो
महिको
महिला अणि कृषि क्षेत्र
माती परीक्षण
मिरची
मोसंबी
यशोगाथा
रेशीम
रेशीम उद्योग
रोग-नियंत्रण.
वनराई बंधारे
वीज निर्मीती
वृक्षायुर्वेद
शिवामृत
शेडनेट हाऊस
शेतकरी
शेततळे.
शेती
शेती व्यवसाय
शेतीपूरक व्यवसाय
शेतीशाळा
शेतीसाठी हवामानाचा सल्ला
समूह शेती
साखर
साखर कारखाना
सिंचन प्रकल्प
सीताफल
सेंद्रिय शेती
सोनेरी हळद
सोयाबीन
स्ट्रोबेरी
स्वाभिमानी शेतकरी संघटना
हरितक्रांती
हळद
“पिवळी क्रांती
Popular Keywords
7/12
Acts/Rules
Agriculture
Agrowon
Biogas
Blue green algae
Contact Action .
Crop Protection
Dairy
Drip Irrigation
FAO
Ferilizer
Fertilizer contol order
Fertilizer general information
Food
Food Processing
Fruits
Global Worming
Grapes
HACCP
Haritkranti 2010
History of pome.
Horticulture
Indian farmer
Insectiside
Kashmir
Keshar
Land Holding
MPKV
MSAMB
Mahafruit
Mahakrushi
Mango
Milk
Monsanto
NRC Grapes
National seed acts/rules.
Onion
Pesticides
Pestiside
Pomegranate
Poultry Feed
Poultry business
Price
Prutviraj Chavhan
Pulses
Seed general information
Seed production
Strawberry
Strawberry Producer
Subsidy
Sugarcane
Systemic
Type of action.Fumigent
USDA
University
Vegetables
Water resources
Wheat
World Agriculture
weather forcasting