Wednesday, June 13, 2012

पूजा सावंत यांची सेंद्रिय शेती


रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम त्यामुळे जमिनीचा कमी होणारा कस आदी बाबी लक्षात घेऊन तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व पटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील पूजा पांडुरंग सावंत यांनी सेंद्रीय व औषधी शेतीचा अभिनव प्रयोग करून आपल्या पूर्वजांचा सेंद्रीय व औषधी शेतीचा वारसा जतन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वी जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

टाकळी सिकंदर येथील कृषीभूषण कै.दिगंबर (अण्णा) सावंत यांच्या स्नुषा पूजाताईंचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे विवाहानंतरही त्यांना शेतीची ओढ स्वस्थ बसू देईना. रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग परस बागेतील झाडांवर सुरू केले. 
सुरुवातीला पाला पाचोळ्याचे खत, गांडूळ खत वापरायला सुरुवात केली. त्यामुळे कुंडीतील फळांचा आकार, रंग, चव व फळ पिकण्याचा कालावधी याचा चांगला अनुभव आला. इतकेच नाही तर त्यांनी कुंडीतील पेरूच्या झाडाला सेंद्रीय खत वापरल्यामुळे ७०० ग्रॅम वजनाचे पेरू मिळाले. सेंद्रीय खतांच्या वापरामुळे झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचेही लक्षात आले. तर कीड नियंत्रणासाठी गोमूत्र, ताक, कडुनिंब अर्काची फवारणी नियमित केली. परसबागेतील सेंद्रीय खतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांना हा प्रयोग शेतीत राबविण्याची कल्पना सुचली. 

यासाठी त्यांना त्यांचे पती पांडुरंग सावंत यांची मोलाची मदत झाली. त्यांनी टाकळी सिकंदर येथील त्यांच्या शेतीमध्ये सहा एकर आंबा, दोन एकर चिकू, एक एकर आवळा, एक एकर कोकण लिंबू तर बांधावर वनझाडे आणि नारळाची लागवड केली. 

एवढ्यावरच न थांबता आयुर्वेदिक औषधांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन त्यांनी शेतात अजरुन, नोनी, गुंज, गुडमार, रिठा, निर्गुडी, बेहडा, सर्पगंधा, अश्वगंधा, तुळशी, डिकमल, कडुनिंब, चंदनाची लागवड केली. लागवड करताना एकेरी पीक पद्धतीचा अवलंब न करता एकत्रित पिकांचा अंतर्भावही शेतात केला. एकेरी फळ पीक पद्धत अवलंबिली असता मोठ्या प्रमाणावर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात आले. याबाबत शेतकर्यांणमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजनही केले होते. 

गत दोन वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेने आयोजिलेल्या स्पर्धेत त्यांनी मुक्त रचना, बोन्साय, औषधी वनस्पती, परस बागेतील शोभेची झाडे यामध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. पारंपरिक शेतीमध्ये थोडा बदल करून सेंद्रीय शेतीचा अवलंब करून बहुपीक पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढून शाश्वत उत्पन्न मिळू शकते, हे पूजाताईंनी त्यांच्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. त्यांच्या शेतीतील कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने गौरविले आहे. केवळ 'चूल आणि मूल' या मध्ये न रमता भोवतालच्या स्त्रियांनी काळ्या मातीतही थोडे रमावे, असे सांगण्यास त्या विसरत नाहीत.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद