Friday, April 22, 2011

कारल्यामुळे झाला लखपती.





निसर्गाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न घटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकर्‍यांनी जमिनी विकण्याचा सपाटा लावला असतानाच दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेघरच्या पंकज पाटील या तरुण शेतकर्‍याने भातशेतीबरोबरच साडेतीन एकरामध्ये कारल्याचे पीक घेऊन नवीन पायंडा पाडला आहे.

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख होती. मात्र, काही वर्षांपासून जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगाने वाढू लागले आणि पडिक जमिनीसह शेतजमिनींवर प्रकल्प उभे राहू लागले. त्यातच खडीकरणाच्या जमिनी संरक्षक बंधारे फुटल्याने नापीक होऊ लागल्या. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्या, मसाल्याची पिके घेण्याबरोबरच दुग्धव्यवसाय करण्याच्या सूचनाही कृषी विभागाकडून वारंवार करण्यात आल्या. 

अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेपूर येथील पंकज पांडुरंग पाटील या तरुणाने असाच एक नवा पायंडा पाडला आहे. त्याने साडेतीन एकर शेतात नऊ वर्षापासून कारल्याचे पीक घेतले आहे. दहावीच्या परीक्षेत अयशस्वी झालेल्या पंकजला पुढे शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिकता आले नाही. त्याने कृषी व्यवसायातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबानेही सहकार्य केले. त्याचप्रमाणे कृषी विभागाचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 

पावसाळी भातकापणीनंतर अभिषेक जातीच्या कारल्याचे पीक घेण्यात येते. एक दिवसाआड ८०० ते ९०० किलो कारले मिळते, असे पंकज सांगतो. नवी मुंबईतील वाशी येथील बाजारात कारले विक्रीसाठी नेण्यात येते. या पिकातून वर्षाला सुमारे तीन लाखांचा नफा मिळतो, असे तो आत्मविश्वासपूर्वक सांगतो.

कारल्याचे पीक घेताना त्याला सर्व प्रकारची आवश्यक द्रव्ये मिळतील असा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी ७५ टक्के शेणखत आणि २५ टक्के रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. रासायनिक खतामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानेच शेणखतावर अधिक भर दिल्याचे पंकज सांगतो. उत्पादन वाढीसाठी आणि पिकाचा दर्जा राखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करत असल्यामुळे त्याचा त्याला फायदाच होत आहे. त्याने अतिरिक्त उत्पन्नातून आणखी जमीन खरेदी केली आहे. 

पाऊस लहरी आहे आणि दराचा भरवसा नाही यामुळे हताश न होता बाजारभावाचा अंदाज घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे हिताचे आहे, असा संदेशही तो यानिमित्ताने देतो. 

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद