Monday, February 27, 2012

एका एकरात तिळाचे ३५ हजारांचे उत्पन्न


वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील हळद पिकाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथील शेतकरी यादवराव ढवळे यांनी गेल्या तीन वर्षापासून उन्हाळी तीळ लागवड करुन एका एकरात ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकासाठी आलेला खर्च वजा जाता त्यांना ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबिनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्याने शेतकरी प्रामुख्याने सोयाबिननंतर हरभऱ्याचे पीक घेतात. तर ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे ते शेतकरी गहू किंवा भाजीपाला वर्गीय पिके घेतात. परंतु बाजारामध्ये भाजीपाल्यांचे प्रमाण वाढले तर भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती करणे फारसे परवडत नाही.

योग्य व्यवस्थापनामुळे टोमॅटोचे विक्रमी उत्पादन

भारत कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करुन पिकांचे योग्य नियोजन केले तर टोमॅटोसारख्या बेभरवशाच्या पिकातूनही विक्रमी उत्पादन घेता येते. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील राजपूर येथील दत्ता सानप यांनी हा प्रयोग यशस्वी करुन सहा महिन्याच्या हंगामात साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

‘हिरव्या पुण्या’ची कहानी


आयुर्वेद ही भारतीय आरोग्यशास्त्राची विशेष ओळख आहे. ही औषधे बनविण्यासाठी विशेष औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची आवश्यकता असते. पूर्वी आपल्या देशात अशी वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. तथापि, अशी झाडे दुर्मिळ होऊ लागली आहेत. उद्या अशी झाडे लोप पावली तर आयुर्वेदिक औषधे मिळणेही कठीण होईल. हा समंजस विचार करुन नाशिकमधील कुसुम दहिवेलकर यांनी एक रोपवाटिका निर्माण करुन वनस्पतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमती दहिवेलकर ह्या निवृत्त वनाधिकारी. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या पैशातून पाथर्डी गावात थोडी जागा विकत घेऊन ‘हिरवे पुण्य’ नावाची रोपवाटिका साकारली आहे.

Friday, February 17, 2012

चाकोरीबाहेर जाऊन हळद उत्पादनाचा यशस्वी प्रयोग


नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.कसमादे पट्टा हा तसा नेहमीच अवर्षण प्रवण राहिला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतकरी बांधवांना शेती करताना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु पर्जन्यमान अल्प प्रमाणात असले तरीही या पट्ट्यातील शेतकरी आपल्या मेहनतीच्या जोरावर गहू, कांदा, मका या पिकांबरोबरच डाळिंबाचे उत्पादन घेतात.

Wednesday, February 8, 2012

सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन


नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला शेतमाल अलिकडे दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करून पिकविलेले धान्य तथा भाजीपालाच आज वापरावा लागतो. त्यातून शरीराला किती आणि कोणते अन्नघटक मिळतात हा प्रश्न आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत केवळ नैसर्गिक आणि सेंद्रीय पद्धतीने गेल्या बारा वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी बाबाराव जाधव हे शेती करीत आहे. बाबाराव जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे तंत्र वापरुन भरघोस उत्पादन घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या अकरा वर्षापासून प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रीय शेतीचा ते प्रचार करीत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या गहू, हरभरा, तूर, सोयाबिन, भाजीपाला यासारख्या सेंद्रीय शेतमालाला प्रचंड मागणी आहे.

Thursday, February 2, 2012

झाडा-फुलांचा जिव्हाळा जपणारी कविता

निसर्गाचे विभ्रम आणि कविता यांचं एक अतूट असं नातं असतं. निसर्गाचं रूप टिपणारी कविता शुद्ध आस्वादपर, वर्णनपर असू शकते, तशी ती अनेकदा मानवी जीवनाशी या निसर्गाला जोडून एक विलक्षण असा आविष्कार घडवते. मराठीतील एक ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांची कविता याच जातकुळीतली आहे. मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘बरेच काही उगवून आलेले’ हा कवितासंग्रह जगण्यात निसर्गाच्या खुणा शोधत जाणाऱ्या कवितांनी सजलेला आहे.

धामणस्करांच्या कवितेतून भेटणारा निसर्ग वाचकांच्या ओळखीचा आहे. निसर्गातले त्यांचे सर्वात जवळचे घटक म्हणजे हिरवेपणा उधळणारी झाडं आणि रंगवर्षाव करणारी फुलं. माणूसही तसा निसर्गाचाच भाग आहे, पण झाडा-फुलांमधले रंग-विभ्रम त्याच्यात नाहीत. मात्र त्यांना टिपणारी संवेदनशीलता माणसाकडे नक्कीच आहे. म्हणूनच मनुष्य आपल्या जगण्याच्या संदर्भात निसर्गाचा विचार करतो, निसर्गात स्वतःच्या आयुष्याच्या खुणा शोधू पाहतो, झाडा-फुलांच्या तटस्थपणे फुलण्या-कोमेजण्यातून आपल्या जगण्याचे संदर्भ जागवतो. धामणस्करांची कविता याच पठडीतली आहे. निसर्ग हा त्यांच्या अनुभवाचा आणि चिंतनाचा विषय आहेच पण तो केवळ सौंदर्याचा आविष्कार म्हणून किंवा दृश्य जाणीवांचा आस्वाद म्हणून अवतरत नाही.

पडीक जमिनीतून पिकविले सोने


पेरणी योग्य नसलेल्या पडीक जमिनीमध्ये अहोरात्र काबाडकष्ट करीत कुटुंबाच्या उन्नतीसाठी झपाटलेल्या युवा शेतकऱ्याने कृषीक्रांती घडविली आहे. पडीक जमिनीवर त्याने भरघोस कपाशीचे उत्पादन घेण्याचा करिश्मा केला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील डेहनीच्या दिनेश रामभाऊ मारशेटवार या नवोदित शेतकऱ्याने आपल्या अपार परिश्रमाच्या जोरावर जराशा संकटाने कंपित होणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले असून तालुक्यात त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले जात आहे. उद्यमशीलता, धेर्य, सचोटी आदी गुणांच्या जोरावर माणूस विपरित परिस्थितीवर मात करु शकतो, हे अनेकदा ऐकायला मिळते. या गुणांची कास धरुन दिनेशने आपल्या मालकीच्या तीन एकर मुरमाड व पडीक जमिनीमध्ये कृषीक्रांती घडवून आणली आहे. एकीकडे काळ्याभोर मातीच्या जमिनी योग्य नियोजनाअभावी पडीक करून निसर्गाला दोष देणा-या शेतक-यांची संख्या वाढत असताना दिनेशने मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याचे धैर्य दाखविले आहे. 

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद