Sunday, September 12, 2010

अन्नसुरक्षा अभियानाने केला शेतकर्‍यांचा फायदा

कृषी विभागाच्या अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत हरभरा पिकातील कामगंध सापळ्याचा फायदा अनेक गावातील शेतकर्‍यांनी घेतला. रानबोडी तसेच हरदोली (नाईक) या गावातील अनेक शेतकर्‍यांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव होता. मात्र कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना विविध योजना तसेच किड सर्वेक्षणाची माहिती दिली.

पांरपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकर्‍यांना म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. तेव्हा कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावागावात सभा घेऊन शेतकर्‍यांना विविध योजनांची तसेच किड सर्वेक्षणाबद्दल माहिती देण्यात आली.

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील रानबोडी गावातील विनोद हिरामन ठाकरे तर हरदोली (नाईक) गावातील महादेव उरकुडा थोटे या शेतकर्‍यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांत...

माझ्या शेतात घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढतच होता. अनेक शेतकरी त्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी, पक्षी, थंड पेय याचा वापर करत होते. पण कामगंध सापळ्याबाबत त्यांना माहिती नव्हती. कृषी विभागाकडून त्यांना ही माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनंतर शेतात एकरी कामगंध सापळे लावण्याचे ठरवले. ते लावल्यानंतर एका सापळ्यात किमान आठ ते दहा घाटेअळीचे पतंग शेतकर्‍यांना सापडले. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांमध्ये कुतुहल निर्माण झाले. एक पतंग एका दिवसाला ३५० ते ४५० अंडी घालतात. एका सापळ्यात सात ते आठ पतंग सापडले म्हणजे एकूण ३५०० अळ्यांचे नियंत्रण करण्यात आले. यामुळे फवारणीचा खर्चही कमी झाला आहे.

पाहता पाहता गावात याचा प्रसार झाला आणि प्रत्येक शेतकर्‍याने ही पद्धत अवलंबली. आता प्रत्येकाच्या शेतात कामगंध सापळे दिसू लागले आहेत. कमी खर्चाच्या पद्धतीत घाटेअळीवर नियंत्रण मिळवता येत असल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले आहेत.

'महान्यूज'मधील मजकूर .

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद