Wednesday, February 21, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 21/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ सकाळी......*

काल जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती ती बर्‍यापैकी निवळली असून आज दिवसभरात महाराष्ट्रावर वातावरण स्वच्छ व निरभ्र राहील.

खालील सॅॅटेलाइट फोटो क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील उत्तर भाग ज्यामध्ये सर्व जिल्हे येतात....

ठाणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अशा सर्व जिल्ह्यात....

दक्षिणेकडील सिंधुदुर्ग-गोवा कोल्हापूर सांगली साताराचा काही भाग रत्नागिरी सोलापूर या भागात वातावरणात बाष्प काही प्रमाणात टिकून आहे.. त्यामुळे साधारण उकाडा जास्त जाणवेल......!

तसेच,

खलील सॅटेलाइट फोटो क्रमांक दोनमध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर......म्हणजेच खालील फोटो मध्ये शून्य अंशांची जी रेषा आहे.. तिथपासून दहा अंशांच्या रेषेपर्यंत उत्तर व दक्षिण या दोन्ही भागात म्हणजेच "विषुववृत्तीय" प्रदेशात ढगांची एकदमच दाटी कालपासून वाढली असून येणाऱ्या काळात ही चिंतेची बाब असू शकते......

कारण सध्या वाऱ्याचा वेग व दिशा नैऋत्येकडून हिमालयाकडे असल्याने यातील काही दाट ढग हे पुढील काळात म्हणजेच पुढील महिन्यात भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या भूपृष्ठावर येऊन अवकाळी पाऊस घेऊन येण्याची शक्यता आहे.....

भारत सरकारने सूचना दिल्याप्रमाणे येत्या एक-दोन  दिवसानंतर पाऊस व गारपिटीची शक्यता आहे....
*पण* परिस्थिती एवढी भयानक नाही.
कारण सद्यस्थितीला तरी उत्तरेकडून व दक्षिणेकडून ढगांची आगेकूच महाराष्ट्रावर दिसत नाही.
कदाचित आज-उद्या परिस्थिती बदलू शकेल पण परिस्थिती खूपच भयानक असेल असे वाटत नाही.
सर्व समाज माध्यमांमधून व tv चॅनल्समधून जे भासविण्यात येत आहे तेवढी परिस्थिती भयानक असेल असे वाटत नाही तरीही शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली बरी......

खालील व्हिडिओ मध्ये आम्ही आपणास गेल्या 24 तासातील ढगांची व वातावरणातील बाष्प यांची परिस्थिती दाखवीत आहोत...

यातून असा निष्कर्ष निघतो की सध्या तरी वातावरण हे पूर्णपणे शांत असून एक दोन दिवस असेच शांत राहण्याची शक्यता आहे........!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद