Tuesday, April 17, 2012

माळरानावर बहरले डाळींब


पर्जन्यमानात घट झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडणारे दर पाहता शेती उद्योग तोट्यात आला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांना बाजूला सारत पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करून आणि मेहनत व चिकाटीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील आवटी बंधूंनी त्यांच्या खंडाळा मकरध्वज शिवारातील माळरानावर डाळिंबाचा बगीचा फुलविण्यात यश मिळविले आहे. खडकाळ आणि निकस म्हणवल्या जाणाऱ्या माळरानावर डाळिंबांचा बहर निर्माण करुन इतर शेतकऱ्यासमोर नवा आदर्श निर्माण करण्याचे काम आवटे बंधूनी केले आहे.

कोरडवाहू शेतीला मिळाले शेततळ्याचे वरदान


अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात सिंचन शेतीचा अभाव आहे. कोरडवाहू शेतीत शेततळ्याच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना सिंचन करण्याचा प्रयत्न कृषी विभाग आणि राज्य शासनाने चालविला आहे. या वर्षभरात जिल्ह्यात ३ हजार ८०० शेतकऱ्यांनी कृषी विभागातील योजनेमधून शेततळे तयार केले असून त्याचा शेतीसाठी मोठा लाभ होत आहे.

मागील काही वर्षांत विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात आल्या. या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले होते. अभ्यासकांनी शेतकरी आत्महत्येचे कारण सिंचनाचा अभाव असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले. त्यामध्ये सिंचनावरच भर देण्यात आला.

Monday, April 16, 2012

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक - राधाकृष्ण विखे पाटील


कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासन खाजगी उद्योजकांच्या भागीदारीत आगामी पाच वर्षात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक आणि प्रक्रिया खरेदी विक्री सह संस्था, राहता, जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर उभारण्यात येत असलेल्या साई प्रवरा ॲग्रो प्रोसेसिंग पार्कसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन श्री.विखे पाटील यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीर कुमार गोयल, कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक नीता राजीव लोचन, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक दादासाहेब झगडे, पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अभय बोगीरवार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वास भोसले, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

Wednesday, April 11, 2012

सुनील राजगुरू यांचा मत्स्य व्यवसाय


पारंपरिक शेती सध्या न परवडणारी झाल्याने शेतीस पूरक व्यवसाय म्हणून मासे पालनाचा व्यवसाय सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातील प्रगतशील तरुण शेतकरी सुनील प्रल्हाद राजगुरू यांनी सुरू केला आहे.

सुनील राजगुरू हे शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण. आई शिक्षण खात्यात, तर वडील आरोग्य खात्यात नोकरीस. वडिलोपार्जित चाळीस एकर जमीन असताना पारंपरिक पिकांमुळे मात्र शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे पारंपरिक शेतीस फाटा देऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या सुनील यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस रेशीम उद्योग आणि ससे पालनाचा व्यवसाय केला. 

कथा हिरव्या यशाची


'प्रयत्न करणाऱ्यांची शेती आहे. मेहनत करीत रहा ती भरभरून देईल' रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील लक्ष्मण कुंभार यांच्या शेतीला भेट दिल्यावर त्यांच्या या बोलण्यातील सत्यता पटते. आपल्या चार एकरच्या शेतीत भाजीपाला आणि कलिंगडाचे भरघोस उत्पन्न घेताना त्यांनी वर्षाचे उत्पन्न तीन लाखांपर्यंत पोहोचविले आहे.
कुंभार यांच्या कुटुंबात एकूण पाच भाऊ. त्यामुळे वडिलोपार्जित अल्पशा जमिनीतून प्रत्येकाच्या वाट्याला केवळ दोन गुंठे जमीन आली. मात्र लक्ष्मण कुंभार यांनी चुलत्याची २६ वर्ष सेवा केल्याने त्याचे फळ जमिनीच्या रुपात त्यांना मिळाले. घर चालविण्यासाठी त्यांनी प्रारंभी घराची कामे केली. मात्र त्यात ते फार काळ रमले नाही. ते गावाकडे आले. कोतळूक गावात नदीकिनारची उतारावरची जमीन त्यांच्याकडे आली. जमिनीला शेतीयोग्य करण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या कष्टाला फळही लवकर मिळाले. भाताचे उत्पन्न चांगले येऊ लागले.

आधुनिक शेती लाखमोलाची


शेती आता केवळ पारंपरिक पद्धतीने करण्याचा व्यवसाय राहिलेला नाही. यामध्ये सातत्याने काहीतरी नवीन प्रयोग केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील शेलगाव राऊत येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीमंत रामभाऊ राऊत यांनी दहा गुंठे शेडनेटमध्ये सिमला मिरचीची लागवड करुन हेच सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी याद्वारे दीड लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजूनही उत्पादन सुरू असून त्यातून त्यांना किमान ५० हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. श्रीमंत राऊत यांनी पारंपरिक शेती करुन शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे. यासाठी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी सहायक एस.पी.बंडगर, कृषी केंद्र चालक श्रीकृष्ण ढवळे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी दहा गुंठ्यावर नेटशेडमध्ये सिमला मिरची लागवड करण्याचा निर्णय केला. वाणाची निवड केल्यानंतर सिमला मिरचीची रोपे घरीच तयार करण्यात आली. 

Tuesday, April 10, 2012

नातं मातीचं


रत्नागिरी जिल्ह्यात अनेकजण पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात निष्णात आहेत. मात्र कोकणच्या तांबड्या मातीत शेती करताना तिच्या वैशिष्ट्यांचा आणि येणाऱ्या पिकांचा नीट अभ्यास करून शेतीत अनुकूल परिवर्तन करण्याचे प्रयत्न फार थोड्या प्रमाणात आढळून येतात. शिवाय अशा प्रयत्नात यश मिळाल्यावर 'जे जे आपणासी ठावे...' या उक्तीप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना पीकपद्धतीची माहिती देण्याचे प्रयत्नही फारसे आढळत नाहीत. मात्र गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील शेतकरी जानू पांडू भेकरे याला अपवाद ठरले आहेत. 
नोकरीच्या अमिषाने मुंबई येथे भर तारूण्यात गेलेले भेकरे शेतीपत्रिका या शेतीविषयक मासिकाचे नियमित वाचक असल्याने त्यांचे मन नोकरीत रमले नाही. शेतीची आवड असल्याने १९८० मध्ये ते गावी परतले. गावात स्वत:ची अशी जमीन नव्हती पण शेती करण्याची प्रबळ इच्छा असल्याने भाड्याने जमीन घेऊन त्यावर शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली. केवळ तिसरीपर्यंत शिकलेले असूनही नवे ज्ञान आत्मसात करण्याची आवड असल्याने कोकणात सहसा न आढळणारी कलिंगडाची शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली आणि गेली २८ वर्षे शेतकरी म्हणून त्यांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. गुहागर तालुक्यातील कलिंगडाच्या वाढत्या क्षेत्रामागे भेकरे यांचीच प्रेरणा असल्याचे कोतळूक परिसरातील ग्रामस्थ सांगतात.

शेतीतील आधुनिक वाल्मिकी


भूमातेच्या उदरातून स्वकष्टातून सोने पिकविण्याचे महान काम सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील वाजेवाडीचे प्रगतशील शेतकरी शंकरराव खोत यांनी केले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये स्वकष्टाने शेतीची मशागत, पीकपद्धतीचे शास्त्रशुद्ध नियोजन, पाणी-खते-कीटकनाशकांच्या फवारणीचा तसेच बाजारपेठेचा अभ्यास आणि नियोजन करून परवडणारी आणि लाभदायी शेती करण्याचा नवा फंडा श्री.खोत यांनी जिद्द, कष्ट, मेहनत आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शोधला आहे.वाजेवाडी इथं तारळी नदीच्या काठावर खोत कुटुंबियांची शेतीवाडी आहे. पाच भावांचं एकत्र कुटुंब, त्यात शंकरराव सर्वात धाकटे. पाचही भावांना शेतीतील तांत्रिक बाबींचे परिपूर्ण ज्ञान असल्याने त्यांच्या या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे शेती करण्यासाठी उपयोग झाला. १९९०-९१ च्या सुमारास बारामती येथील कृषीभूषण अप्पासाहेब पवार यांची झालेली भेट शंकररावांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. उपलब्ध जमीन, पाणी आणि मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करुन निर्धारपूर्वक भूमातेच्या सेवेला लागण्याचा निर्णय त्यांनी अप्पासाहेबांच्या सल्ल्यानुसार घेतला.

Sunday, April 1, 2012

युवक शेतकऱ्यांनी धरली गटशेतीची वाट


बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीत निर्माण झालेल्या अशाश्वतपणावर मात करीत काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या जिद्दीला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नान्नजच्या सहा युवक शेतकऱ्यांनी गट शेतीची वाट धरली आहे. 

प्रत्येकी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये सुरु असलेला हा प्रयोग उत्तर सोलापूर तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही पथदर्शी ठरत असून इस्त्रायलच्या धर्तीवर सेडनेटमधील ग्रुप फार्मिंगचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रयोगशील शेतकरी अंकुश टोणपे यांनी सांगितले. 

पारंपरिक पिकाला पर्याय काकडीचा


जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश लाभते. त्यातही शेतक्षेत्रातील आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते. पारंपरिक आणि अति खर्चिक ऊस पिकाला फाटा देऊन नव-नवीन पिकांची लागवड केल्यावर देखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. 

शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी आवड असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील मुकुंद साठे या प्रयोगशील शेतकऱ्याने ऊस पिकाला पर्याय म्हणून अवघ्या २५ गुंठ्यात काकडीचे अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या लाख मोलाच्या काकडीने त्यांना चक्क लखपती केले आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद