Friday, March 25, 2011

महाकृषी संचार सेवा शेतकर्‍यांना उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री




महाकृषि संचार सेवा शेतकर्‍यांना अतिशय उपयुक्त ठरेल. शेतकर्‍यांना या उपक्रमाचा शेतीच्या विकासासाठी करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग आणि भारत संचार निगम लिमीटेड यांच्या महाकृषी संचार सेवेचा गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम झाला.


मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मोबाईलच्या तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. बँकिंगच्या क्षेत्रात मोबाईलमुळे बदल झाले आहेत. असेच बदल आता इतर क्षेत्रातही होतील. त्याची आज या महाकृषी संचार योजनेपासून सुरवात झाली आहे. या सेवेमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात निश्चितच बदल होतील. मोबाईलच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे एक महाकुटुंब निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांच्या जीवनातील ही अतिशय महत्वाची बाब आहे.

कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, या सेवेमुळे विद्यापीठात सुरू असणारे संशोधन, शासनाचे विविध कार्यक्रम, योजना, बी-बियाणे यांची माहिती शेतकर्‍यांना मिळेल. आतापर्यंत पाच लाख शेतकरी या सेवेचे सदस्य झाले आहेत. आणखी अडीच लाख शेतकरी या सेवेत सहभागी होऊ इच्छितात. 

ग्राम विकास मंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, फलोत्पादन राज्यमंत्री राजेंद्र गावित, कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल आदी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आभार मानले.

महाकृषी संचार सेवेबाबत 

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकर्‍यांना मोबाईल सीयूजी सेवा उपलब्ध करून देणार. यामुळे शेतकर्‍यांना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी कमी खर्चात संपर्कात राहणे सोयीचे होणार आहे. उपक्रमात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता, गुणवत्ता, कृषी विभागाच्या योजना इत्यादींच्या माहितीसाठी तत्काळ देणे सोयीचे होणार आहे. तसेच शेतकर्‍यांना एसएमएसव्दारे शेतीबाबत विनामुल्य सल्ला दिला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद