Friday, March 11, 2011

लावली तूर...उत्पन्न भरपूर.





नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील मांडवी गावापासून अंबाडी घाटाकडे निघाल्यावर उजव्या बाजूस असलेले हिरवेगार शेत लक्ष आकर्षित करते. शेतात साधारण ५ फूट उंचीची तुरीचे रोपे वाढलेली आहेत. एकसारखी छाटणी करण्यात आल्याने शेतातील ते सौंदर्यही नजरेत भरते. सोबत कोवळी लाल-पिवळी फुले सूर्यप्रकाशात छान चमकतात. हे सौंदर्य समाधानाने नजरेत साठविताना शेतमालक माधव चव्हाण यांना होणारा आनंद चेहर्‍यावर स्पष्ट दिसतो. 

हा संपूर्ण परिसर तसा माळरानाचा मात्र चव्हाण यांच्या बाजूला असलेल्या जमिनीचा पोत जरा चांगला आहे. आपल्या १५ एकर शेतात प्रामाणिकपणे कष्ट करून हातात येईल ते उत्पन्न घेण्याकडे त्यांचा कल होता. मात्र तालुका कृषि अधिकारी पी. आर. देशमुख आणि त्यांचे सहकारी राठोड यांच्याशी परिचय झाल्यानंतर शेतीत नवे प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. 

पूर्वी पारंपरिक पध्दतीने कापूस आणि सोयाबीनसारखी पिके घेतली जायची. बर्‍याचदा मर्यादित पाण्यामुळे उत्पन्न कमी यायचे. राठोड यांच्या सल्ल्यानुसार चव्हाण यांनी १ लाख २५ हजार रूपये खर्च करून ठिबक सिंचनाची सोय करून घेतली. त्यामुळे त्यांना चांगला फायदा झाला. कापसाचे उत्पन्न वाढले. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांनी यंदाच्या मोसमात तुरीची लागवड केली. तुरीचे पहिले पीक हातात आल्यानंतर त्यांनी बियाणे कंपनीच्या सल्ल्यानुसार दुहेरी उत्पन्नासाठी रोपांची एकसारखी कटिंग केली. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. शेतातील प्रत्येक रोपांवर मुळाच्या अगदी वरच्या भागापासून शेंगा लागण्यास सुरूवात झाली आहे. 

पहिल्या तोडणीनंतर त्यांनी पिकाला डिएपी व युरिया दिले. दुसर्‍या पिकाची वाढ जोमाने सुरू झाली असून प्रत्येक रोपावर शेंगांचा बहर आला आहे. एकूण १०० क्विंटल तूर मिळण्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. दोन रोपांच्यामध्ये त्यांनी उन्हाळी पीक म्हणून टरबूज आणि काकडीची लागवड केली आहे. त्यापासून त्यांना अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. ठिबक सिंचनाचा या पिकांनादेखील लाभ होणार आहे. 

पारंपरिक पीक पध्दतीत अभ्यासाअंती केलेल्या बदलामुळे चव्हाण यांचे शेत बहरले आहे. पुढच्या हंगामात नगदी पिकांकडे अधिक लक्ष देण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. त्यांच्या प्रयत्नांना कृषि विभागाच्या सहकार्यामुळे बळ मिळाले आहे. असे प्रयत्न आदिवासी भागातील इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद