Showing posts with label अन्नसुरक्षा अभियान. Show all posts
Showing posts with label अन्नसुरक्षा अभियान. Show all posts

Friday, March 25, 2011

धान्य सडत असल्याची सरकारची कबुली.


धान्याचे विक्रमी उत्पादन होत असून गोदामांमधील साठवणुकीची क्षमता कमी पडत असल्यामुळे गोदामांमध्ये धान्य सडत असल्याची कबुली अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी राज्यसभेत दिली. गव्हाचे विक्रमी उत्पादन होत असून देश 'ग्रेन बॉम्ब'वर बसला आहे. धान्य साठवण्याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुखर्जी म्हणाले. धान्य सडत असल्याची कबुली मी देतो. साठवणुकीची क्षमता वाढविण्यालाही मी सहमत आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव दिला जात असल्यामुळे अलीकडे धान्याचे उत्पादन वाढत आहे. गरजेनुसार अतिरिक्त क्षमता वाढवायला हवी, असे ते अर्थ विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले.
गोदामांमध्ये धान्य सडत असून आदिवासींना निकृष्ट धान्य पुरविले जात असल्याबद्दल माकपच्या वृंदा करात यांनी तीव्र चिता व्यक्त केली होती. शून्य तासाला मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, सरकार अतिरिक्त धान्य गरिबांना पुरविण्याच्या मागणीकडे लक्ष देत नाही. 
धान्य सडू दिले जात आहे. त्यांनी सभागृहात सडलेले गहू आणि तांदूळ दाखविले. हे धान्य आदिवासी भागात पाठविले जात असून ते खाण्यायोग्य नाही. चांगल्या धान्याचा पुरवठा करावा. धान्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी निगराणी समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली. उपसभापती के. रहमान खान म्हणाले की, करात यांच्या भावनांशी संपूर्ण सभागृह सहमत आहे. सरकारने सदस्यांच्या भावनांची दखल घ्यावी. नामनियुक्त सदस्य ए.के. गांगुली म्हणाले की, धान्य उत्पादनाचा स्फोट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
चांगल्या पावसामुळे यावर्षी ८.२ कोटी टन धान्याचे उत्पादन झाले. मात्र साठवणूक करण्याची क्षमता कमी आहे. देशाने आणखी दीड लाख टन धान्य वाढविण्याची क्षमता मिळविण्याची गरज आहे. काँग्रेसचे सदस्य माबेल रिबेलो यांनीधान्य उत्पादनवाढीमुळे येऊ घातलेल्या 'संकटा'बाबत सरकारने श्वेतपत्र जारी करावे अशी मागणी केली. 
आभार लोकमत.

Sunday, September 12, 2010

अन्नसुरक्षा अभियानाने केला शेतकर्‍यांचा फायदा

कृषी विभागाच्या अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत हरभरा पिकातील कामगंध सापळ्याचा फायदा अनेक गावातील शेतकर्‍यांनी घेतला. रानबोडी तसेच हरदोली (नाईक) या गावातील अनेक शेतकर्‍यांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव होता. मात्र कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना विविध योजना तसेच किड सर्वेक्षणाची माहिती दिली.

पांरपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकर्‍यांना म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. तेव्हा कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावागावात सभा घेऊन शेतकर्‍यांना विविध योजनांची तसेच किड सर्वेक्षणाबद्दल माहिती देण्यात आली.

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील रानबोडी गावातील विनोद हिरामन ठाकरे तर हरदोली (नाईक) गावातील महादेव उरकुडा थोटे या शेतकर्‍यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांत...

माझ्या शेतात घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढतच होता. अनेक शेतकरी त्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी, पक्षी, थंड पेय याचा वापर करत होते. पण कामगंध सापळ्याबाबत त्यांना माहिती नव्हती. कृषी विभागाकडून त्यांना ही माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनंतर शेतात एकरी कामगंध सापळे लावण्याचे ठरवले. ते लावल्यानंतर एका सापळ्यात किमान आठ ते दहा घाटेअळीचे पतंग शेतकर्‍यांना सापडले. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांमध्ये कुतुहल निर्माण झाले. एक पतंग एका दिवसाला ३५० ते ४५० अंडी घालतात. एका सापळ्यात सात ते आठ पतंग सापडले म्हणजे एकूण ३५०० अळ्यांचे नियंत्रण करण्यात आले. यामुळे फवारणीचा खर्चही कमी झाला आहे.

पाहता पाहता गावात याचा प्रसार झाला आणि प्रत्येक शेतकर्‍याने ही पद्धत अवलंबली. आता प्रत्येकाच्या शेतात कामगंध सापळे दिसू लागले आहेत. कमी खर्चाच्या पद्धतीत घाटेअळीवर नियंत्रण मिळवता येत असल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले आहेत.

'महान्यूज'मधील मजकूर .

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती