Showing posts with label पान. Show all posts
Showing posts with label पान. Show all posts

Thursday, June 16, 2011

सांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.




सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे गावचे अनिल व दिलीप खांबे या दोघा बंधुंनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. तरुणांनी व्यावसायिक शेती कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. केवळ तीस गुंठा जमिनीवर त्यांनी आपला हा पानमळा फुलविला आहे. माल नसतानाही आपल्या एका जीवलग मित्राचा सल्ला घेऊन त्यांनी हा पानमळा फुलवला आहे. आपल्या गावातील अन्य शेतकरीही सुखाने नांदावा यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

मजुरांच्या कमतरतेमुळे अलिकडे पानमळे कमी होत चालले आहेत. अशाही परिस्थितीत केवळ नोकरीच्या मागे न लागता कायमस्वरुपी उत्पन्न देणारे पीक घ्यावे या उद्देशाने चिकुर्डे येथील या युवकांनी माळरानावर ३० गुंठ्यात पानमळा घेऊन दरवर्षी चार लाखांहून अधिक उत्पन्न घेण्याचा विक्रम केला. त्यांच्या पानाला येथील पाणी व जमिनीच्या कसामुळे एक वेगळी चव आहे. यामुळे पुण्या- मुंबईतील बाजारपेठेत त्यांच्या पानाला प्रचंड मागणी आहे.

अनिल यशवंत खांबे यांचे केवळ दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण घेतलेल्या इतर मुलांची होत असलेली परवड पाहून नोकरीच्या मागे न लागता आपले बंधू दिलीप खांबे यांच्याबरोबर शेती करण्याचे ठरवून आपल्या माळरान जमिनीवर सुरुवातीला टोमॅटोचे उत्पन्न घेतले. परंतु हे उत्पन्न केवळ तीन महिनेच मिळू शकते. यामुळे नजीकच्या गावचे बाळासाहेब पाटील यांचा सल्ला घेऊन बारमाही उत्पन्न मिळणाऱ्या पानमळ्याची लागवड करण्याचे त्यांनी ठरविले.

श्री. खांबे म्हणाले की, चार वर्षापूर्वी स्नेही बाळासाहेब पाटील यांच्या पानमळ्यातील तीन हजार शेंडे आणून या तीस गुंठ्यात हा पानमळा उभा केला. यासाठी नऊ ट्रॉली शेणखत, तेरा ट्रॉली माती खणून जमिनीत भर घातली. या मळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही रासायनिक खत या पानमळ्यासाठी वापरले नाही त्यामुळे पहिल्या वर्षी जेमतेम उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी खर्च वजा जाता गुंठ्याला १५ हजार प्रमाणे जवळ जवळ चार लाखाचे उत्पन्न आम्हाला मिळत आहे. शिवाय पुण्या-मुंबई सारख्या शहरात आमच्या सांगली जिल्ह्याचे पान आवडीने खाल्ले जात आहे याचे समाधान आहे.

बाराही महिने उत्पन्न मिळत असल्याने पानमळा व्यावसायिकदृष्ट्या समाधानकारक आहे. पानमळ्यातून उत्पन्न मिळतेच तसेच यासोबत भाजीपाला व दुग्धव्यवसाय सारखे जोडधंदेही करता येतात. आम्ही येथे केळी, शेवग्याच्या शेंगा यासारख्या भाजीपाल्यापासून उत्पन्न मिळवतो. घरातील जनावरांसाठी वैरणही आम्हाला मिळते.

अशा प्रकारचा फायदा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने पिके घेण्याचे सोडून पानमळ्यासारख्या पिकांकडे वळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना सल्ला दिला आहे. एक पानमळा उभारल्यानंतर सात ते आठ वर्षे उत्पन्न घेता येते. दरवर्षी पावसाळ्यात डास, चिलटांचा त्रास होतो. यावेळी एक किटकनाशक फवारावे लागते. वेलीवरती रोगराई होऊ नये म्हणून घरचा उपाय म्हणून मी गोमूत्र फवारतो. सुरुवातीस हा मळा उभारताना जे काही परिश्रम आम्ही घेतले आहे त्याचे आता आम्हाला फळ मिळत आहे. आता पुढील आठ वर्षे आम्ही बाराही महिने उत्पन्न घेऊ. ज्या कोणा तरुणांना व्यावसायिक शेती करावयाची असेल त्यांनी पानमळा सारख्या शेतीकडे वळावे, अशी विनवनीही ते करतात.

Friday, March 4, 2011

आणि कात लाल झाला...





सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील जंगलामध्ये आता कातभट्टय़ा पेटू लागल्या आहेत. रंग, पानमसाल्यासाठी वापरल्या जाणार्‍या काताची मागणी देशभरातून वाढू लागल्याने प्रतिकिलोमागे ३०० रुपये इतका दर वाढला आहे. कात ज्यापासून उत्पादित केला जातो, त्या खैराची झाडे विकणारे शेतकरी आणि कात भट्टय़ातून कात उत्पादन करणार्‍या व्यावसायिकांना त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक फायदा मिळू लागला आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये जंगलात खैराची नैसर्गिक झाडे आहेत. पूर्वीपासूनच कातभट्टय़ा या जंगलांच्या परिसरात पेटविल्या जातात. आता काताची मागणीही वाढली आहे. त्यामुळे भट्टयांचे कामही वाढले आहे. देवगड तालुक्यातील फणसगाव परिसरात दरवर्षी कोटय़ावधी रुपयांची उलाढाल करणार्‍या कातभट्टया सध्या सुरु आहेत. परिसरातील शेतकर्‍यांची खैर तोडणी मोठय़ा प्रमाणात सुरु झाली आहे. फणसगाव परिसरात नाद, गवाणे, वाघिवरे, वेळगिवे, बुरंबावडे, उंडील, कुणकवण, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले, महाळुंगे आदी भागातील शेतकरी खैराची तोड करीत असतात.

खैराची तोड करताना शेतकरी खैराचे झाड मुळापासून खोदून काढतो. त्यामुळे त्या झाडावर नवीन झाड उगवत नाही. या झाडाचे पडणारे बी जंगली भागात रुजून येऊन अशी झाडे नव्याने तयार होतात. तोडल्यानंतर त्याची पूर्ण साल काढली जाते. यानंतर आत असणार्‍या साडीव भाग वेगळा करुन तो कातभट्टीवर नेऊन विकला जातो. या साडीव भागाचे वजन करताना मण हे प्रमाण मानले जाते. एक मण म्हणजे चाळीस किलो वजन धरण्यात येते. एका मणाला सध्या नऊशे ते एक हजार रुपयाचा चढता भाव मिळतो आहे. त्यामुळे येथील शेतकरी खैराच्या झाडांची काळजी घेतो. या झाडांना वाढीसाठी कोणतेही खतपाणी दिले जात नाही. ती नैसर्गिक वाढत जातात आणि शेतकर्‍यांना लाखो रुपये मिळवून देतात. फणसगाव परिसरात सात ते आठ कातभट्टय़ा सध्या पेटत आहेत. रात्रंदिवस हे काम सुरु असते. कातभट्टय़ा चालवणारे बहुतांशी व्यावसायिक हे सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावाच्या परिसरातील आहेत. या भट्टय़ा दरवर्षी त्या-त्या जागेवरच शासनाची परवानगी घेऊन चालविल्या जातात.

कातभट्टयांमुळे त्या त्या भागातील ग्रामपंचायतींनाही कर मिळतो. दरवर्षी काताचे भाव वाढत चालल्याने व्यावसायिक आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. फणसगाव परिसरात प्रशांत कोरगावकर, सुरेश वराडकर, विलास परब, प्रकाश परब, थॉमस फर्नांडीस या व्यावसायिकांच्या कातभट्टया आहेत.

पारंपरिक शेतीबरोबरच कोकणातील शेतकर्‍यांनी जर खैराच्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करुन त्यात नवनविन प्रयोगाद्वारे सुधारणा केल्यास त्यांना आर्थिक उत्पान्नाचे नवे दालनच उघडे होईल.

  • 'महान्यूज

  • Popular Keywords

    अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती