Showing posts with label जलसंधारन. Show all posts
Showing posts with label जलसंधारन. Show all posts

Wednesday, October 12, 2011

बंधा-यात पाणी...... ग्रामस्थ समाधानी

पंढरपूर तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणारे गाव म्हणून गादेगावचा उल्लेख होतो. गावाच्या विकासाबाबत येथील नागरिक सदैव जागरुक असतात. पंढरपूर तालुक्याच्या पश्च्चिमेला असणा-या व सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या गादेगाव मध्ये प्रशासन व जनता एक विधायक कामासाठी एकत्र आली आणि त्यातून उभे राहिले एक सकारात्मक कार्य.

या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.

Thursday, October 6, 2011

जलसंधारणामुळे लोधवड्यात पाणीच पाणी


केवळ अभियानांमध्ये क्रमांक मिळविण्यापेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी केलेले श्रम आता फलदायी ठरल्याचे समाधान लोधवडेकरांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत आहे. यंदा माणमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, जलसंधारणांच्या कामांमुळे लोधवडे परिसरात पाण्याची चिंताच उरलेली नाही.

उन्हाळ्यात लोधवडेकरांच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असे, ही स्थिती बदलायला हवी हे समजत होते, पण त्यासाठी काय करावे हेच गावकऱ्यांना उमजत नव्हते. याच दरम्यान गावचे सुपुत्र व सध्याचे कृषि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून इंडोजर्मन प्रकल्पाचे फादर रॉबर्ट डिकोस्टा यांनी गावाला भेट दिली आणि लोधवडेकरांच्या भाग्योदयास सुरवात झाली. या प्रकल्पाची सुरवात गावात करण्यात आल्याने अनेकांना रोजगराही मिळाला. सुरवातीला लोकांनी श्रमदानातून काम करून इंडोजर्मनच्या परीक्षेत ग्रामस्थांनी बाजी मारली.

Friday, January 14, 2011

जलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेने.



शेतीला पाणी मिळाले तर शेतकर्‍यांच्या जीवनात नंदनवन निर्माण होऊ शकते. पावसाचे पाणी वाहून गेले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाचे पाणी अडविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचाही सहभाग आवश्यक असतो. 

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून दुधना नदीवरील कोल्हापूरी बंधार्‍यात दरवर्षी पाणी अडवून निस्वार्थ सेवा होत आहे. साठवलेल्या पाण्याचा शेतकरी शेतातील पिकासाठी वापर करतात. त्याच बरोबर या परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.

जिल्हा परिषदेने मोरेगाव येथील दुधना नदीवरील १७२ दरवाज्याचा कोल्हापुरी बंधारा बांधून २००२ मध्ये मोरेगाव येथील कृषीधन पाणी वापर संस्थेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून ही संस्था प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये या बंधार्‍यात पाणी अडवित आहे. या पाण्याचा वापर मोरेगाव, ब्राम्हणगाव, वाघपिंपरी, घोडके पिंपरी, हादगाव येथील शेतकरी आपल्या शेतातील पिकांसाठी करतात. हे पाणी फेब्रुवारीपर्यंत राहत असल्यामुळे कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांना या पाण्याचा लाभ मिळतो. 

परिसरातील गावांत असणार्‍या पाणीपुरवठय़ाच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. सेलू शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघपिंपरी येथील विहिरीच्या पाणी पातळीत देखील वृध्दी झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे दरवर्षी पाणी अडवून पाणी वितरित करण्याची जबाबदारी पार पाडतात. यावर्षी सप्टेंबर २०१० मध्ये बंधार्‍यातील सर्व दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होऊ नये म्हणून प्लॉस्टिक लावण्यात आले आहे. सध्या या बंधार्‍यात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या बंधार्‍यास भेट देऊन जलपूजन केले. त्यावेळी श्री. वळवी यांनी या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या कामासाठी अध्यक्ष श्री. चव्हाळ, मोरेगावचे सरपंच किशोर चव्हाळ, ब्राम्हणगावचे सरपंच मदन डोईफोडे, डॉ. परमेश्वर लांडे, संतोष डोईफोडे, काशिनाथ मगर आदी परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे. 

'महान्यूज'मधील मजकूर.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती