Showing posts with label कापूस. Show all posts
Showing posts with label कापूस. Show all posts

Thursday, February 2, 2012

पडीक जमिनीतून पिकविले सोने


पेरणी योग्य नसलेल्या पडीक जमिनीमध्ये अहोरात्र काबाडकष्ट करीत कुटुंबाच्या उन्नतीसाठी झपाटलेल्या युवा शेतकऱ्याने कृषीक्रांती घडविली आहे. पडीक जमिनीवर त्याने भरघोस कपाशीचे उत्पादन घेण्याचा करिश्मा केला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील डेहनीच्या दिनेश रामभाऊ मारशेटवार या नवोदित शेतकऱ्याने आपल्या अपार परिश्रमाच्या जोरावर जराशा संकटाने कंपित होणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले असून तालुक्यात त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले जात आहे. उद्यमशीलता, धेर्य, सचोटी आदी गुणांच्या जोरावर माणूस विपरित परिस्थितीवर मात करु शकतो, हे अनेकदा ऐकायला मिळते. या गुणांची कास धरुन दिनेशने आपल्या मालकीच्या तीन एकर मुरमाड व पडीक जमिनीमध्ये कृषीक्रांती घडवून आणली आहे. एकीकडे काळ्याभोर मातीच्या जमिनी योग्य नियोजनाअभावी पडीक करून निसर्गाला दोष देणा-या शेतक-यांची संख्या वाढत असताना दिनेशने मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याचे धैर्य दाखविले आहे. 

Thursday, October 6, 2011

राज्यात हळव्या भाताची काढणी सुरु तर भुईमूग, तूर, कापूस पक्वतेच्या अवस्थेत


राज्यात चालू वर्षी खरीप पिकाच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला असून हळव्या भाताची काढणी सुरु झाली आहे. निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत तसेच गरवे भात फुलोरा अवस्थेत आहे. ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून बाजरीची काढणी सुरु आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन पिकाची काढणी सुरु झाली आहे. भुईमूग, तूर आणि कापूस पक्वतेच्या अवस्थेत आहेत.

राज्यात चालू वर्षी आतापर्यंत १,१६७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळी, सातारा जिल्ह्यातील मान दहीवडी, सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, पलूस, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यातील भोकर, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी अशा एकूण ११ तालुक्यात ४० ते ६० टक्के एवढाच पाऊस झाला आहे.

Thursday, July 7, 2011

यंदा घटणार कापसाची निर्यात

cotton
देशातल्या एकूण कापूस उत्पादनापैकी गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये ७५ टक्के उत्पादन घेतले जाते. या तीन राज्यांमध्ये जून महिन्यात सर्वाधिक कमी पाऊस झालाय. त्यामुळे या प्रमुख कापूस उत्पादक भागात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक कमी पाऊस झाल्याने इथले क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा घटण्याची शक्यता आहे. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हे क्षेत्र आणखी घटण्याचा अंदाज आहे. देशात १ जुलै २०१० च्या तुलनेत १ जुलै २०११ मध्ये २२ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड घटल्याची माहिती केंद्रीय कृषी सचिव पी. के. बासू यांनी दिली.

Sunday, May 8, 2011

एक हजार हेक्टरवर आधुनिक शेती.



लोकसंख्या वाढत आहे आणि उत्पादन क्षेत्र कमी होत आहे. यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी करणे सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कृषी विभागाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजुरा विभागात एक हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन जास्त उत्पादन घेण्याचा आदर्श प्रकल्प पुढील हंगामासाठी तयार केला आहे. या प्रयोगाची प्रथमच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पावसाची अनियमितता, पिकावरील रोग, प्रदुषण या सर्व बाबींमुळे दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. मात्र विपरीत परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व आधुनिक शेतीचे तंत्र जनसामान्यांत पोचविण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल. या प्रकल्पासाठी एक हजार हेक्टर जमीनवर कापूस, तर एक हजार हेक्टर जमीनवर सोयाबीनकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.

याअंतर्गत पीक लागवडीपुर्वी माती परीक्षण, मशागतीपासून सुधारित बियांची निवड, पेरा, जैविक खत, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, जलसंधारण आदी बाबीवर शास्त्रीय मार्गदर्शन करुन पिके घेतली जाईल. येत्या काळात पिकांच्या वाढीच्या नोंदी, त्यावरील कीड व त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जातील. कृषी विभागामार्फत शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत आहे. शेतीशाळेसाठी निवडक ३० शेतक-यांना प्रतिनिधिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आठवडयातून एक दिवस, याप्रमाणे प्रत्येक विषयावर योग्य मार्गदर्शन दिल्यानंतर आपापल्या गावांत ते मार्गदर्शन करतील.

या योजनेअंतर्गत पिकावरील रोग नियंत्रणासाठी प्रलोभन सापळे लावण्यात येईल. यामुळे किडीचा मोठया प्रमाणावर बंदोबस्त होईल. एकंदरीत उत्पादनवाढीसाठी शास्त्रीय व आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी प्रायोगिक स्वरुपात राजूरा तालुक्यातील अहेरी, खामोना, मुठरा, पांढरपोवनी, चंदनवाही, रानवेली, सोंडो, सोनुर्ली, सिंदेश्वर, लक्कडकोट, खिर्डी या गावांतील जमिनीची निवड करण्यात आली असून येथे हा प्रकल्प राबविला जात आहे.

Friday, March 25, 2011

परभणीतील कापूस प्रथमच परदेशात.



परभणी जिल्ह्यातील बहुतांश भाग सपाट व नद्यांच्या खोर्‍यातील असून सुपीक आहे. या जिल्ह्यातून गोदावरी, पूर्णा व दुधना या प्रमुख नद्या वाहतात. खरीप हंगामात ज्वारी, मुग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांसह कापसाचेही उत्पादन घेतले जाते. 

जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बराच भाग जंगलाचा आहे. तथापि गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कापसाचे विक्रमी उत्पादन होत आहे. जिंतूर व बोरी बाजारपेठेत सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. खरेदीबरोबरच कापसाच्या गाठींची निर्मितीदेखील मोठय़ा प्रमाणात होत आहे. 

आत्तापर्यंत तालुक्यातील दहा जिनिंग व प्रेसिंगमधून प्रक्रिया झालेल्या कापसाच्या गाठी मुंबईसह मध्यप्रदेश, गुजरात या प्रांतात निर्यात होत होत्या. यावेळी त्या प्रथमच थेट देशाबाहेर निर्यात झाल्या आहेत. कापसाचे विक्रमी उत्पादन व गाठींची मोठय़ा प्रमाणातील निर्मिती या पार्श्वभूमीवर उद्योजक बी. आर. तोष्णीवाल यांनी पाच हजार गाठींच्या निर्यातीसाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरु केले होते. 

केंद्र सरकारच्या कॉटन एक्स्पोर्ट रजिस्ट्रेशन समितीने त्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ५०० गाठी निर्यातीची परवानगी दिली. त्यापैकी अयोध्या जिनिंग व प्रेसिंगमधून ३०० गाठी मुंबई बंदरमार्गे हाँगकाँग येथे मे. हाँगकाँग ट्रेड सर्व्हिस कंपनीकडे रवाना झाल्या. जागतिक बाजारपेठेतील सध्याच्या भावानुसार (अमेरिकन डॉलरप्रमाणे) दळणवळणाचा खर्च वगळता कापसाच्या एका खंडीस (तीन क्विंटल ५६ किलो) ५५ हजार रुपये मिळू शकतात.

परभणी जिल्ह्यातून परदेशात कापसाच्या गाठी प्रथमच निर्यात झाल्याने भविष्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव मिळण्याची आशा आहे.

Wednesday, January 12, 2011

थंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्राक्ष,मोसंबी,अंजीर,आंबा,कापूस,भाजीपाला.

थंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्राक्ष,मोसंबी,अंजीर,आंबा,कापूस,भाजीपाला.
थंडीमध्ये पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा... 

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती