Showing posts with label ऊस. Show all posts
Showing posts with label ऊस. Show all posts

Monday, June 4, 2012

ऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत्रज्ञान

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीवर आधारित आहेत. पण शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन त्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी प्रयत्न करणे कर्तव्य समजून कोल्हापूर येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबवित आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होत असून संपूर्ण राज्याला हे अभियान दिशादर्शक आहे. या विषयी त्यांनी दिलेली माहिती ....

प्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविणे आवश्यक असल्याचे आपणास का वाटले? 

उत्तर:- ऊसाच्या पाचटाच्या व्यापक फायद्यांचा व जमिनीच्या बिघडत जाणाऱ्या आरोग्याचा विचार करता हे तंत्रज्ञान राबविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्हा पाचटमुक्त करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2011 ला हा संकल्प केला. यामुळे 100 कोटी रुपयांचे उत्पादन वाढणार असून उत्पादन खर्चात 50 कोटी रुपयांची बचत होणार आहे. हे सुरुवातीच्या अभ्यासाअंती लक्षात आल्यानंतर हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले.

Monday, December 26, 2011

ऊसाने आणली आर्थिक सुबत्ता


प्रत्येक शेती प्रकाराला त्या त्या भागातील वातावरण पोषक असतं. त्यामुळेच ती शेती त्या ठराविक भागातच चांगली होते. मात्र, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना सध्याचा तरुण शेतकरी वेगवेगळया प्रयोगाच्या माध्यमातून वातावरणाला जुळवून घ्यायला भाग पाडत आहे. अर्थात कल्पकतेला मेहनतीची जोड दिल्यावर वेगळया वातावरणात नवे पीक घेताना ठराविक भागात मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा थोडंसं कमी उत्पन्न मिळालं तरी तो प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. देवगड तालुक्यांतील पुरळ गावचे सुनील रघुनाथ फाटक यांनीही एक वेगळा प्रयोग केला आहे आणि त्याचे चांगले रिझल्टही त्यांना मिळाले.

Friday, November 11, 2011

अखेर शेतकरी जिंकले...कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये.


अखेर शेतकरी जिंकले...

ऊस दरावर तडजोड_
कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये
तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये प्रस्ताव.

ऊसदर आंदोलनाचा यशस्वी समारोप :
राज्यात सुरु असलेल्या उसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनांचे नेते आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत दरावर एकमत झालं आहे.

तब्बल साडेतीन तासांच्या बैठकीनंतर अखेर दोन्ही बाजूंनी लवचिकता दाखवल्याने सहमती होऊ शकली. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेत ऊसाच्या दरावर तडजोड केल्यानंतर अखेर निर्णय घेण्यात आला. सरकारने राज्यात ऊसासाठी तीन वेगवेगळे दर जाहीर केले आहेत.

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऊसासाठी राज्यभरात पहिला हफ्ता जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर- सातारा- सांगली जिल्ह्यांसाठी पहिला हफ्ता २०५० रुपये प्रतिटन, पुणे-अहमदनगर- सोलापूर जिल्ह्यांसाठी १८५० रुपये प्रतिटन, खानदेश-विदर्भ-मराठवाडा जिल्ह्यांसाठी १८०० रुपये प्रतिटन इतका जाहीर करण्यात आला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. राजू शेट्टी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर आहेत.

दरम्यान लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. साखर आयुक्त किंवा सहकार आयुक्तांकडून लेखी आश्वासन आल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

सहकारमंत्र्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिनिधींकडे पत्र सोपवलं असून ते काही वेळातच शेट्टी यांच्याकडे पोहोचेल. त्यामुळे खासदार शेट्टींनी उपोषणाचा समारोप करणं ही फक्त औपचारिकता आहे.

Wednesday, July 27, 2011

Growth Morphology of Sugarcane


Propagation :
Stem cuttings or sections of the stalks called "setts" or seed pieces propagate sugarcane. Each sett contains one or more buds. The buds, located in the root band of the node, are embryonic shoots consisting of a miniature stalk with small leaves.

The outer small leaves are in the form of scales. The outermost bud scale has the form of
a hood. Normally, one bud is present on each node and they alternate between one side of the stalk to the other.

Variations in size, shape and ther characteristics of the bud provide a means of distinguishing between varieties. Each sett also contains a circle of small dots above the node, which are the root primordia. Each primordium exhibits a dark center, which is a root cap, and a light colored "halo".

Tuesday, July 26, 2011

Drip Irrigation For Sugarcane,Drip Irrigation Features


Introduction
Drip irrigation in sugarcane is a relatively new innovative technology that can conserve water, energy and increase profits. Thus, drip irrigation may help solve three of the most important problems of irrigated sugarcane - water scarcity, rising pumping (energy) costs and depressed farm profits.

 Surface Drip
 Subsurface Drip


Whether or not drip will be successful depends on a host of agronomic, engineering and economic factors. "Drip irrigation is defined as the precise, slow and frequent application of water through point or line source emitters on or below the soil surface at a small operating pressure (20-200 kPa) and at a low discharge rate (0.6 to 20 LPH), resulting in partial wetting of the soil surface.

In the literature, "trickle" is used interchangeably with "drip". Most popular drip versions used in sugarcane are surface and subsurface drip.

  • Surface Drip: The application of water to the soil surface as drops or a tiny stream through emitters placed at predetermined distance along the drip lateral is termed as surface drip irrigation. It can be of two types - online or integral type surface drip system. Integral dripline is recommended for sugarcane.

  • Subsurface Drip (SDI):The application of water below the soil surface through emitters molded on the inner wall of the dripline, with discharge rates (1.0 - 3.0 LPH) generally in the same range as integral surface drip irrigation. This method of water application is different from and not to be confused with the method where the root zone is irrigated by water table control, herein referred to as subirrigation. The integral dripline (thin or thick-walled) is installed at some predetermined depth in the soil depending on the soil type and crop requirements. There are two main types of SDI - "one crop" and "multicrop".

Saturday, July 16, 2011

उसतोडीसाठी सरसावल्या महिला...




सातारा जिल्ह्यातील महिलांनी निव्वळ राजकारणच नाही तर समाजकारण आणि अर्थकारण सकस करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अनेक गावांमध्ये ग्रामविकासाची संकल्पनाच बदलून टाकली असून महिलाच गावकारभारणी झाल्याने गावपातळीवर राजकारण,समाजकारण आणि अर्थकारणाचा पोत बदलू लागला आहे. जावळी,कराड,महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातच्या बहुतांशी गावातील पायाभूत प्रश्नच महिलांनी सोडवून टाकला आहे. ग्रामस्वच्छता असो अथवा दारुबंदी असो, या कामांमध्ये महिला स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत. बचत गटांच्या एकजुटीतून त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वीसहून अधिक गावांतील महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आहेत. केळोली (वरची) आणि कराड तालुक्यातील शेवाळेवाडी-येणपे येथील बचत गटातील महिलांनी 'हम भी किसीसे कम नही...' हे सिध्द करून दाखविले आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ विभागात महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आणि त्यांनी अनेक मद्यपींना पोलीस कोठडीची हवा दाखविली. चाफळ,माचणेवाडी,नानेगाव खुर्द, नानेगाव बुद्रुक, धायटी, पाडळोशी, केळोशी, शिंगणवाडी, वीरेवाडी, डेरवण, बाबरवाडी,मसुगडेवाडी,खराडवाडी,कवठेकरवाडी, सुर्याची वाडी येथे दारुबंदी चळवळ वेगाने वाढत आहे. चोरट्या दारुविक्रेत्यांनी या रणरागिणींच्या कार्यपध्दतीचा धसकाच घेतला आहे. 

Friday, July 15, 2011

ऊसतोडणी मजूर बनले बागाईतदार




दारिद्रय, बेरोजगारी आणि ऊसतोडीसाठी होणा-या स्थलांतरामुळे सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील दलित समाज विकासाच्या परिघाबाहेर होता परंतु पुणे येथील अफार्म व सांगोला येथील अस्तित्व संस्थेने निजामकालीन उपलब्ध वतनी जमिनीचा विकास करुन ३७ जणांना प्रगतशील बागायतदार बनविले. वेडया बाभळी व कुसळांचे साम्राज्य असणा-या या माळरानावर नंदनवन फुलले आहे. 

निजामाच्या काळात गावकीची कामे करणा-या वंचितांना वतनी जमिनी मिळाल्या होत्या. सोलापूर जिल्हयात ३० हजार एकर तर सांगोला तालुक्यात ५ हजार २२० एकर जमीन आहे. गौडवाडी गावात अशीच ८१ एकर वतनी जमीन आहे. येथील प्रत्येक दलित बांधवांच्या नावावर प्रत्येकी दीड ते दोन एकर जमीन आहे. मात्र, मार्गदर्शन व भांडवलाच्या अभावामुळे अनेक जण रोजंदारी किंवा शेतमजुरी करीत होते. स्थलांतरामुळे ऊसातोडणी मजुरांची मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जात होती.

पुणे येथील अफार्म (अक्शन फॉर अग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट) या संस्थेने जर्मनीच्या वो (अरबायटर ओडपर्ट) या स्वयंसेवी वित्तीय संस्थेच्या आर्थिक सहकार्याने मार्ग काढला. 'अनुसूचित जाती-जमाती सक्षमीकरण कार्यक्रम' अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गौडवाडीची निवड झाली. सुरवातीला या शेतक-यांची शेती करण्याची मानसिकता नव्हती. ग्रामीण भागातील शेती म्हणजे आतबटटयाचा व्यवहार असा त्यांचा ठाम समज होता. मात्र, या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शेती विस्तार कार्याचा खुबीने वापर केला. २००६ मध्ये या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली. लाभार्थ्यामध्ये रोज गटचर्चा घडवून आणण्यात आल्या, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेतही बदल झाला.

Monday, May 30, 2011

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे भरघोस उत्पन्न.




उसाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या काही कमी नाही. मात्र, कमी पाणी, कमी खर्चात जादा उत्पन्न घेणारे शेतकरी अभावानेच सापडतात. फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील तरुण शेतकरी अभयसिंह वसंतराव जाधव यांनी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या जातीचे उसाचे पीक घेतले आहे. हे पीक अवघ्या सात महिन्यांत १५ ते १६ कांडय़ावर आले असून या पिकापासून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 


मुळातच आजचा शिकलेला शहरी किंवा ग्रामीण भागातील तरुण शेती व्यवसायाकडे पाठ फिरविताना दिसत आहे. त्याला या व्यवसायात फारसा रस नाही. तो शेतीपेक्षा नोकरीकडे आकर्षित होताना दिसत आहे. मात्र, १९९६-१९९७ मध्ये कृषी पदवीधर झालेले अभयसिंह जाधव नोकरीच्या मागे न लागता फलटण-खुंटे रस्त्यालगत शिंदेवाडी हद्दीत असलेली आपली वडिलोपार्जित २५ एकर शेती पिकविण्यात धन्यता मानू लागले. पदवीच्या शिक्षणानंतर त्यांना सहज एखादी छोटी-मोठी नोकरी मिळाली असती, परंतु त्यापेक्षा त्यांनी शेती व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयाबद्दल ते आजअखेर समाधानी असल्याचे आवर्जून सांगतात. आज ते स्वत: लक्ष देऊन २५ एकर शेती पिकवीत आहेत. श्री. जाधव यांनी शेतीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे शेतीची मशागत, पेरणी, पीकपध्दतीचा अवलंब करुन आधुनिक शेतीचा नवा आदर्श जोपासला आहे. शेती ते फक्त पिकवीत आहेत, असे नव्हे तर कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत भरघोस उत्पन्न घेण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.

श्री. जाधव यांनी आपल्या २५ एकर बागायती क्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर ऊस, सात एकर क्षेत्रावर गहू तर उरलेल्या क्षेत्रावर इतर पिके घेतली आहेत. या शेतीक्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या ऊस जातीची लागवड केली आहे. कोईमतूर जातीचे बियाणे त्यांनी बारामती येथील कृषी प्रतिष्ठान येथून आणून त्याची लागवड केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी स्वत: बियाणे बनविण्याची माहिती घेऊन घरचे बियाणे तयार केले आहे. आज सात एकर क्षेत्रावर कोईमतूर जातीच्या उसाची लागवड करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कोईमतूर जातीच्या बियाणांची लागवड करण्याबरोबरच या पिकाची शास्त्रशुध्द पध्दतीने निगा राखून कमी खर्चात अधिक शेती उत्पादन करण्याचा इतिहास श्री. जाधव यांनी नोंदविला आहे. कृषि अधिकार्‍यांनीही त्यांच्या या प्रयोगशील शेतीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

कोईमतूर जातीचं पीक खरे तर सात महिन्यांत जेमतेम चार ते पाच कांडय़ांवर येत असते. मात्र, श्री. जाधव यांची ऊस शेती पिकविण्याची हातोटी व आजअखेरचा अनुभव आणि कृषीक्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान येथे खर्‍या अर्थांने त्यांनी उपयोगात आणले आहे. हे पीक सात महिन्यांत १६ ते १७ कांडय़ांवर आणण्यात त्यांना यश आले असून, कमी कालावधीत या पिकाची एवढी जोमदार वाढ हा किमान फलटण तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ऊस पिकासंबंधीचा एक विक्रमच म्हणावा लागेल.

श्री. जाधव यांनी आधुनिक शेतीची कास धरली असून शेतीक्षेत्रातील प्रगत ज्ञान, माहिती आणि अनुभवानुसार पीक पध्दती आणि शेती उत्पादनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला ऊस लागवड करावयाच्या क्षेत्रात शेण खत वापरले, बियाणे प्रक्रिया करुन नऊ इंचावर डोळा ठेवून मग ऊस लागवड केली. त्यानंतर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर केला गेला. हे सर्व क्षेत्र विहीर व कालवा बागायती आहे, तरी सुध्दा या ऊस शेतीला साधारणपणे वातावरणानुसार १५ दिवसांनी पाणी देण्याची पध्दत अवलंबिण्यात आली आहे. जमिनीची मशागत, पिकांची लागवड आणि त्यांना आवश्यकतेनुसार खतांची आणि किटकनाशकांची मात्रा देण्याच्या शास्त्रशुध्द पध्दतीही जोपासली आहे. पाणी व खतांचा संतुलित वापर करण्यातही त्यांनी नियोजनपूर्वक काम केले आहे, तसेच लागवडीनंतर अवघ्या २० दिवसांनी व नंतर ७५ दिवसांनी त्यांनी तणनाशकाचा वापर करुन तणांवरचा मोठा खर्च कमी केला. यामुळे पिकातला तणांचा अडसर दूर होऊन पीकाची वाढही जोमदार झाली.

विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, तालुका कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, मंडल कृषी अधिकारी पी. एस. बिचुकले, कृषी पर्यवेक्षक अजित जगताप, कृषी सहाय्यक यांचे वेळोवेळी मिळत गेलेल्या मार्गदर्शनामुळे आज ते या पिकाकडून मोठय़ा अपेक्षा बाळगून आहेत. जे पीक लागवडीपासून १२० दिवसांच्या आसपास बांधणीला येते, ते पीक अवघ्या ६५ दिवसांत बांधणीला आणण्यात श्री. जाधव यांना यश आल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही अचंबित करुन सोडत आहे. त्यामुळे या पिकाकडून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 

ऊसपीक घेण्यापूर्वी श्री. जाधव यांनी आपल्या शेतात काकडी, कलिंगड, भेंडी या सारखी पिके घेऊन त्यामधून चांगले उत्पन्न घेण्यात यश मिळविले आहे. या पिकाबरोबरच त्यांनी आपल्या शेतातील उसापासून लोकांना दर्जेदार आणि आकर्षित करणार्‍या एक किलो गुळाच्या ढेपा तयार केल्या. श्री. जाधव यांनी तयार केलेल्या एक किलोच्या गुळाच्या ढेपांना परदेशातही मोठी मागणी लाभली. ऊस शेतीबरोबरच त्यांनी दूध व्यवसायावरही लक्ष केंद्रीत केले. सध्या त्यांच्याकडे १५ म्हैशी असून आगामी काळातही दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक उद्योग म्हणून वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुग्धव्यवसाय या शेतीपूरक उद्योगापासून आर्थिक लाभाबरोबरच मिळणार्‍या इतर फायद्यांमध्ये शेणखताचा मोठा फायदा आहे. शेणखताचा शेतीतील उत्पन्नवाढीसाठी चांगला फायदा होत आहे. सध्या प्रत्येक वर्षी पाच एकर क्षेत्राला पुरेल एवढे शेणखत त्यांना उपलब्ध होत आहे. आगामी काळात संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने करण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने श्री. जाधव यांनी शेती आणि दुग्धव्यवसायाचे नियोजन चालविले आहे.

Friday, January 14, 2011

ऊस बेने निर्मिती ठरली फायदेशीर...

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या पूर्वेला असणार्‍या नेवरे येथे उध्दव शिंदे यांची वडिलोपार्जित अडीच एकर शेती आहे. त्यांनी १९९५ ला दहावीतून शाळा सोडली आणि ते शेतीकडे वळले. अर्थात लहानपणापासूनच असलेली शेतीची आवड त्या दिशेला घेऊन गेली. त्यांची शेती तशी नावालाच बागायती होती. मात्र चढ-उतार, दगड-गोटय़ांनी भरलेली जमिनीच्या मशागतीचे संकट होते. त्यात राबून सर्वप्रथम ही जमीन त्यांनी एकसमान केली. काही ठिकाणी पाणी साचत होते, तेथे दगडाच्या ताली बांधल्या. आवश्यक तेथे बांधबंदिस्ती केली. अजूनही ही जमीन एकसमान झालेली नाही पण त्यांनी त्यातूनही कौशल्याने ठराविक टप्पे पाडून जमीन कसण्यायोग्य करुन घेतली आहे.

सुरुवातीला ज्वारी, बाजरी अशी पारंपरिक पिके घेत श्री. शिंदे ऊस शेतीकडे वळले. या शेतातच विहीर आहे, पण त्याला हंगामी पाणी असते. त्या भरवशावरच आता दोन एकर ऊस आणि अर्धा एकर डाळिंब केले आहे. सातत्याने नवे प्रयोग करण्याची उध्दव यांची वृत्ती आहे. त्यामुळेच सेंद्रिय पध्दतीच्या शेतीसाठी गांडूळ खत, कंपोस्ट खताची निर्मिती असो की सेंद्रिय आणि रासायनिक दोन्हींचा मेळ असो, असे अनेकविध प्रयत्न त्यांनी केले आहेत. या प्रयत्नातून ऊस बियाणे निर्मितीचा मार्ग त्यांना सापडला. 

मागील वर्षी त्यांनी ६७१, तर यंदा ८६०३२ या जातीच्या बियाणांचा मळा तयार केला आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याचे श्री. शिंदे सभासद आहेत. या कारखान्याच्या धोरणानुसारच ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन फूट सरी व दोन डोळे पध्दतीने लागवडीचे नियोजन केले. यंदा चार फूट सरी व एक डोळा पध्दतीचा वापर केला आहे. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम अधिक मॅलॉथियॉन यांची बियाणे क्रिया केली. लागवडीनंतर अडीच-तीन महिन्यांनी प्रथम उगवलेल्या कोंबाची जमिनीलगत कापणी करुन घेतली. नंतर आलेले सर्व फुटवे एकसारखे येऊन त्यांची वाढ चांगली झाली.

श्री. शिंदे म्हणाले, तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण करुन घेतो. त्यानुसार तसेच पूर्वानुभव व कारखान्याच्या शेती अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार खतांचे व्यवस्थापन केले. पुढच्या काही महिन्यांतच ऊस चांगला वाढला. दहाव्या महिन्यात तो काढणीस आला, शिवाय उसातील एका कांडीची लांबीही नऊ इंचापर्यंत आली. 

उसाला ठिबकसिंचन पध्दतीने पाणी दिले. आवश्यकतेनुसार ठिबकव्दारे विद्राव्य खतांचाही डोस दिला. वेळच्या वेळी झालेली कामे, पाणी आणि खतांचे योग्य नियोजन यामुळे पिकांची वाढ चांगली झाली. त्यासाठी साखर कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी ए. सी. कुमठेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. उसाची गुणवत्ता पाहून साखर कारखान्याने शेतकर्‍यांना बियाण्यासाठी या उसाची शिफारस केली. अलिकडेच पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. जे. एन. रेपाळे यांनी भेट देऊन उसाची पाहणी केली. आज श्री. शिंदे यांच्याकडून अनेक शेतकर्‍यांनी बियाणे नेले आहे.

प्रति गुंठा पाच हजार रुपये याप्रमाणे बियाणेमळा दिला असून, त्यातून सुमारे दोन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. बियाणे निर्मितीसाठीचा एकरी अंदाजे खर्च असा असतो. बियाणे खर्च तीन हजार रुपये, मजूरी खर्च (नांगरण-सरी पाडणे खुरपणीसह) ८ हजार ५०० रुपये, खते १५ हजार रुपये तर अन्य ३ हजार ५०० रुपये मिळून एकूण ३० हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च वजा जाता सुमारे पावणेदोन लाखांचे उत्पन्न या शेतीतून मिळाले आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती