Showing posts with label ऊसतोडणी. Show all posts
Showing posts with label ऊसतोडणी. Show all posts

Friday, November 11, 2011

अखेर शेतकरी जिंकले...कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये.


अखेर शेतकरी जिंकले...

ऊस दरावर तडजोड_
कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये
तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये प्रस्ताव.

ऊसदर आंदोलनाचा यशस्वी समारोप :
राज्यात सुरु असलेल्या उसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनांचे नेते आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत दरावर एकमत झालं आहे.

तब्बल साडेतीन तासांच्या बैठकीनंतर अखेर दोन्ही बाजूंनी लवचिकता दाखवल्याने सहमती होऊ शकली. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेत ऊसाच्या दरावर तडजोड केल्यानंतर अखेर निर्णय घेण्यात आला. सरकारने राज्यात ऊसासाठी तीन वेगवेगळे दर जाहीर केले आहेत.

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऊसासाठी राज्यभरात पहिला हफ्ता जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर- सातारा- सांगली जिल्ह्यांसाठी पहिला हफ्ता २०५० रुपये प्रतिटन, पुणे-अहमदनगर- सोलापूर जिल्ह्यांसाठी १८५० रुपये प्रतिटन, खानदेश-विदर्भ-मराठवाडा जिल्ह्यांसाठी १८०० रुपये प्रतिटन इतका जाहीर करण्यात आला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. राजू शेट्टी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर आहेत.

दरम्यान लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. साखर आयुक्त किंवा सहकार आयुक्तांकडून लेखी आश्वासन आल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

सहकारमंत्र्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिनिधींकडे पत्र सोपवलं असून ते काही वेळातच शेट्टी यांच्याकडे पोहोचेल. त्यामुळे खासदार शेट्टींनी उपोषणाचा समारोप करणं ही फक्त औपचारिकता आहे.

Saturday, July 16, 2011

उसतोडीसाठी सरसावल्या महिला...




सातारा जिल्ह्यातील महिलांनी निव्वळ राजकारणच नाही तर समाजकारण आणि अर्थकारण सकस करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अनेक गावांमध्ये ग्रामविकासाची संकल्पनाच बदलून टाकली असून महिलाच गावकारभारणी झाल्याने गावपातळीवर राजकारण,समाजकारण आणि अर्थकारणाचा पोत बदलू लागला आहे. जावळी,कराड,महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातच्या बहुतांशी गावातील पायाभूत प्रश्नच महिलांनी सोडवून टाकला आहे. ग्रामस्वच्छता असो अथवा दारुबंदी असो, या कामांमध्ये महिला स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत. बचत गटांच्या एकजुटीतून त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वीसहून अधिक गावांतील महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आहेत. केळोली (वरची) आणि कराड तालुक्यातील शेवाळेवाडी-येणपे येथील बचत गटातील महिलांनी 'हम भी किसीसे कम नही...' हे सिध्द करून दाखविले आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ विभागात महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आणि त्यांनी अनेक मद्यपींना पोलीस कोठडीची हवा दाखविली. चाफळ,माचणेवाडी,नानेगाव खुर्द, नानेगाव बुद्रुक, धायटी, पाडळोशी, केळोशी, शिंगणवाडी, वीरेवाडी, डेरवण, बाबरवाडी,मसुगडेवाडी,खराडवाडी,कवठेकरवाडी, सुर्याची वाडी येथे दारुबंदी चळवळ वेगाने वाढत आहे. चोरट्या दारुविक्रेत्यांनी या रणरागिणींच्या कार्यपध्दतीचा धसकाच घेतला आहे. 

Friday, July 15, 2011

ऊसतोडणी मजूर बनले बागाईतदार




दारिद्रय, बेरोजगारी आणि ऊसतोडीसाठी होणा-या स्थलांतरामुळे सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील दलित समाज विकासाच्या परिघाबाहेर होता परंतु पुणे येथील अफार्म व सांगोला येथील अस्तित्व संस्थेने निजामकालीन उपलब्ध वतनी जमिनीचा विकास करुन ३७ जणांना प्रगतशील बागायतदार बनविले. वेडया बाभळी व कुसळांचे साम्राज्य असणा-या या माळरानावर नंदनवन फुलले आहे. 

निजामाच्या काळात गावकीची कामे करणा-या वंचितांना वतनी जमिनी मिळाल्या होत्या. सोलापूर जिल्हयात ३० हजार एकर तर सांगोला तालुक्यात ५ हजार २२० एकर जमीन आहे. गौडवाडी गावात अशीच ८१ एकर वतनी जमीन आहे. येथील प्रत्येक दलित बांधवांच्या नावावर प्रत्येकी दीड ते दोन एकर जमीन आहे. मात्र, मार्गदर्शन व भांडवलाच्या अभावामुळे अनेक जण रोजंदारी किंवा शेतमजुरी करीत होते. स्थलांतरामुळे ऊसातोडणी मजुरांची मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जात होती.

पुणे येथील अफार्म (अक्शन फॉर अग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट) या संस्थेने जर्मनीच्या वो (अरबायटर ओडपर्ट) या स्वयंसेवी वित्तीय संस्थेच्या आर्थिक सहकार्याने मार्ग काढला. 'अनुसूचित जाती-जमाती सक्षमीकरण कार्यक्रम' अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गौडवाडीची निवड झाली. सुरवातीला या शेतक-यांची शेती करण्याची मानसिकता नव्हती. ग्रामीण भागातील शेती म्हणजे आतबटटयाचा व्यवहार असा त्यांचा ठाम समज होता. मात्र, या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शेती विस्तार कार्याचा खुबीने वापर केला. २००६ मध्ये या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली. लाभार्थ्यामध्ये रोज गटचर्चा घडवून आणण्यात आल्या, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेतही बदल झाला.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती