Showing posts with label वनराई बंधारे. Show all posts
Showing posts with label वनराई बंधारे. Show all posts

Monday, May 30, 2011

सुप्त पाण्याच्या झ-याव्दारे ओंढेवाडीस मिळाले पाणी.




सर्वसामान्यांमध्ये एक प्रचलित उक्ती आहे गाव करी ते राव काय करी याप्रमाणे नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी या गावातील ग्रामस्थांनी ७० दिवस श्रमदान करुन स्वत: पुरुष , स्त्री मुले राबत राहून गावासाठी पूर्ण पाण्याचा स्त्रोत शोधला आणि आपल्या गावासाठी पाणी पुरवठा करण्याची योजना कार्यान्वीत केली. हे खरोखरच आदर्शवत काम आहे.


सिन्नर तालुक्यातील सिन्नर घोटी महामार्गापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले औंढेवाडी हे आदिवासी बहुल वस्तीचे गाव. पाटबंधारे विभाग, मेरी यांच्या सहकार्याने युवामित्र या समाजसेवी संस्थेच्या प्रयत्नाने येथील डोंगरावरील नैसर्गिक ढोल्या झ-याचे पाणी गावात पोहविण्याचे महत्वपूर्ण काम करुन गावास पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.


औंढेवाडी हे ८०० लोकवस्तीचे गाव असून या प्रयत्नाने गावाची पाणी टंचाई दूर होणार असून ग्रामस्थांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करण्याची गरज उरली नाही. औंढेवाडी जवळील डोंगरावर सुप्त पाण्याचा झरा होता. याची माहिती युवामित्र संस्थेचे प्रमुख सुनील पोटे व मनीषा पोटे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ, पाटबंधारे खात्याचे अभियंता अविनाश लोखंडे व मेरीचे कार्यकारी अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्या मदतीने या झ-याचा शोध घेतला. 


हा झरा खुप जुना असून त्यात बारामाही पाणी असते. मात्र या झ-याचा आवाज होऊन पाणी लुप्त होत असते. या पाण्याचा आवाज होत असल्याने त्याला ढोल्या झरा असे नाव पडले. या झ-याचा उपयोग करुन गावाची पाणी टंचाई दूर करता येईल. या विचाराने पोटे यांनी सर्व ग्रामस्थांना प्रेरित केले. पुण्याचे युवा उद्योजक सोमदत्त लाड यांनी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये दिले तर पुण्यातील एचडीएफसी बँकेतील अधिकारी ज्युडा रॉड्डीज यांनी बँकेतील इतर कर्मचा-यांच्या सहकार्याने ७० हजार रुपये मदत मिळवून दिली. त्या आधारे पाईप, सिमेंट वाळू इत्यादीची जमवाजमव करुन ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन एक महिन्यातच १२० मीटर उंचीवरुन हे पाणी गावात आणले.


या पाणी योजनेसाठी दररोज २० ग्रामस्थ व शेवटच्या काही दिवसात रोज ७० लहान थोर, स्त्री पुरुष गावकरी राबत होते. यामुळे गावास दररोज दीड लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे. गावाच्या गरजेच्या मानाने हे पाणी तिप्पट असून, जादा पाण्याचा वापर शेतीसाठीही करण्यात येणार आहे. 

सामूहिक प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे गावासाठी पाणी योजनेचे मोठे यश उभे राहिले आहे तसेच रस्ते , वीज, आरोग्य विषयक , विविध कामे करुन ओंढेवाडी गाव आदर्श करण्याचा संकल्पही ग्रामस्थानी केला. यासाठी ग्रामस्थांचे कौतुकच करावयास हवे. 

Thursday, January 20, 2011

कर्मचार्‍यांनी स्वकमाईतून बांधले वनराई बंधारे.


शासकीय कर्मचार्‍यांविषयी क्वचितच चांगले बोलले जाते. तथापि प्रेरणा देणार्‍या अधिकार्‍यांमुळे कर्मचारी समाजापुढे चांगला आदर्श निर्माण करु शकतात. परभणी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी वनराई बंधार्‍याच्या माध्यमातून हा आदर्श निर्माण केला आहे.

वनराई बंधारे, शेततळे अधिकाधिक संख्येने घेण्याची जिल्हा परिषदेची योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही आता पुढाकार घेतला आहे. त्यातूनच एकाच दिवशी श्रमदानातून तब्बल २५ वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले. तालुक्यातील भूजल पातळीत वाढ व्हावी व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांतील पदाधिकार्‍यांसमवेत एक बैठक आयोजित केली. त्यामध्ये पाणी पातळी वाढविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनानुसार जिल्हा परिषदेतील ५०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचार्‍यांनी १० वेगवेगळे पथक तयार केले. 

परभणी तालुक्यातील लोहगाव, सिंगणापूर, बाभळगांव, पेगरगव्हाण, पान्हेरा, अमडापूर, साळापूरी, कोटंबवाडी, उजळंबा, तामसवाडी आणि शिर्शी (खुर्द) आदी गावांतील २५ ठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधले. विशेष म्हणजे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी स्वखर्चातून जवळपास साडेतीन हजार पोती विकत घेऊन वनराई बंधारे बांधले. 

गावातील नागरिक आणि शेतकरी वनराई बंधारे बांधण्याकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांना या बंधार्‍याचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील या अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वत:हून हे बंधारे उभारले. विशेष म्हणजे, यापुढेही श्रमदानातून बंधारे बांधण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, अशोक सिरसे आदींसह ५०० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

'महान्यूज'मधील मजकूर. 

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती