Sunday, June 3, 2012
शेवगा शेतीचा 'मराळे' पॅटर्न
Saturday, June 2, 2012
शेतीतून समृद्धी
Monday, April 16, 2012
कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक - राधाकृष्ण विखे पाटील
Wednesday, April 11, 2012
कथा हिरव्या यशाची
आधुनिक शेती लाखमोलाची
Tuesday, April 10, 2012
शेतीतील आधुनिक वाल्मिकी
Tuesday, January 31, 2012
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने घडविली कृषी क्रांती
Tuesday, November 22, 2011
“Climate-Smart” Agriculture..
Over the past six decades world agriculture has become considerably more efficient.
Sunday, November 20, 2011
Agriculture key to addressing future water and energy needs
Sunday, October 16, 2011
लिंबूवर्गीय फळांची आता यंत्राने तोडणी
पारंपरिकतेसोबतच व्यावसायिक शेतीकामात मजुरांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या उपलब्धतेच्या या समस्येचे समाधान काही अंशी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच हा एक पुढील टप्पा बनू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
Friday, July 22, 2011
यंदा अन्नधान्याचं रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार
केंद्रीय कृषि सचिव पी.के. बसू यांनी कृषि उत्पादनाचे हे आकडे जाहीर करताना भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीची ही कमाल चांगला मान्सून आणि शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ केल्यामुळे झाल्याचा दावा केला. त्यांच्यामते चांगला मान्सून आणि एमएसपीच्या वाढवलेल्या किंमती यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी भरपूर कष्ट करून चांगलं उत्पादन घेतलं. चांगल्या उत्पादनवाढीसाठी पाऊस आणि शेतकऱ्यांचे कष्ट सर्वाधिक महत्वाचं कारण ठरलं असलं तरी सरकारने अपेक्षेप्रमाणेच त्यामध्ये एमएसपी, शेतीसंदर्भातली सरकारची धोरणं याचाही वाटा असल्याचं सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. डाळ आणि तेलबियांच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे यावर्षी भारताला कमीतकमी खाद्यतेल आयात करावं लागेल, अशी आशाही बसू यांनी व्यक्त केली,
संपलेल्या वर्षासाठी तांदळाचं उद्दीष्ट 89.09 दशलक्ष टन एवढं उद्दीष्ट होतं, तर झालेलं उत्पादन हे तब्बल 95.32 दशलक्ष टन होतं. यामुळे आता तांदळाच्या उद्दीष्टात वाढ करून 102 दशलक्ष टन एवढं करण्यात आलंय.
याबरोबरच ऊस, कापूस, सोयाबिन यांच्या उत्पादनातही यावर्षी भरीव वाढ झालीय.
Wednesday, February 23, 2011
वाळव्यातील कृषी प्रकल्प.
Wednesday, February 9, 2011
कृषी विकासदर घेणार पाच टक्क्यांची उडी...
कृषी क्षेत्राच्या प्रगतीच्या आधारावर यंदाच्या आर्थिक वर्षात (2010-11) एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) 8.6 टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) वर्तविला आहे. चांगल्या पाऊसमानाने खरीप हंगामाने दिलेला हात, हिवाळ्यातील पावसामुळे रब्बी हंगामासाठी झालेली पाण्याची बेगमी यामुळे गतवर्षीच्या विकासदरामध्ये तब्बल पाच टक्क्यांची उडी कृषी क्षेत्र घेऊ शकणार असल्याचा अंदाज सीएसओने व्यक्त केला आहे.
2009-10 मध्ये कृषीचा विकासदर केवळ 0.4 टक्के होता, तेव्हा देशाचा आर्थिक विकासदर आठ टक्के राहिला होता. चालू वर्षात कृषी आणि पूरक उद्योगांच्या विकासात 5.4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे "जीडीपी'चा आलेख गेल्या वर्षाच्या तुलनेत चढता राहणार आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी "जीडीपी' साडेआठ टक्क्यांदरम्यान असेल असे म्हटले होते. तर रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात तिमाही पतधोरण आढाव्यादरम्यानदेखील साडेआठ टक्क्यांचाच अंदाज वर्तविला होता. त्या पार्श्वभूमीवर "सीएसओ'चा वाढीव अंदाज आशादायक मानला जात आहे. विशेष म्हणजे या अंदाजामागे 2010-11 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान, नोंदविलेल्या 8.9 टक्के जीडीपीचा आधार आहे. याशिवाय कृषी क्षेत्राने 0.4 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांवर घेतलेली झेपदेखील या अंदाजासाठी उपयुक्त ठरली आहे. त्या तुलनेत उत्पादन क्षेत्राचा विकासदर हा गेल्या वर्षीइतकाच म्हणजे 8.8 टक्के एवढा कायम आहे.
देशातील दरडोई उत्पन्नात 6.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 36 हजार तीन रुपयांवर जाणार आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार दरडोई उत्पन्न 6.1 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा होती.
आर्थिक वर्ष - कृषी विकास दर -- आर्थिक विकास दर (जीडीपी) (टक्के)
2007-08 - 4.7 - 9.03
2008-09 - 1.6 - 6.7
2009-10 - 0.4 - 7.2
2010-11 - 5.4 - 8.6
Friday, December 24, 2010
माती आणि माणसं समृद्ध करणारी कृषी विद्यापीठे / Agriculture Universities In Maharashtra
महाराष्ट्रातील शेती ही मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस पडला तरच शेतं पिकतात आणि शेतकरी जगतात. पाऊस नाही पडला तर शेतकरी राजाला आकाशाकडे डोळे लावून आपले नशीब अजमावे लागते. पावसावर हवाला ठेवून जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धीची स्वप्नं इथल्या कृषी विद्यापीठांनी सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.
देशातील अग्रणी कृषी विद्यापीठ
महात्मा फुले कृषी विद्यापीठ
१ जून १९६८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या ध्येयधोरणाच्या पूर्तीसाठी अविरतपणे काम करणारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातील एक अग्रणी कृषी विद्यापीठ मानले जाते. अर्थात हा सन्मान मिळविण्यासाठी या विद्यापीठाने तितकीच मेहनत घेतली आहे. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या क्षेत्रात या विद्यापीठाने भरीव असे काम केले आहे. या विद्यापीठामध्ये केले जाणारे संशोधन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात घेऊन त्या संशोधनाचा बदलत्या शेती तंत्रज्ञानाशी कशी सांगड घालता येईल याचा ध्यास जसा येथील शिक्षकांना आहे तसाच येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आहे. म्हणूनच या विभागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विद्यापीठाचे योगदान नक्कीच महत्त्वपूर्ण आहे.
Saturday, November 13, 2010
Balancing crop protection and responsible use of pesticides in agriculture sector.
FAO helps its member countries reduce risks from pesticides while supporting
sustainable intensification of crop production and maintaining effective control of
transboundary pests and diseases. The Organization promotes safe management
of pesticides throughout their life cycle. The Rotterdam, Stockholm and Basel
conventions provide necessary tools for managing pesticides and other chemicals.
These instruments can be used even to protect citizens of poor countries.
Achieving synergies among these three conventions when implementing them at
the national level will improve national capacities to manage pesticides.
From FAO.
Tuesday, October 5, 2010
शेती व्यवसायातून धरली प्रगतीची कास
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये जांब नावाचे गाव आहे. गावातील दिवाकर पांडुरंग पवार या शेतकर्याने शेती व्यवसायात नवा आदर्श निर्माण केला आहे. पवार यांनी परंपरागत शेती पध्दतीला फाटा देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरली आहे. शेतीपूरक व्यवसाय सुरु करुन सधनकडे वाटचाल केली आहे. श्री. पवार हे सोरणा, लोहारा, लंजेरा, देऊळगाव, खैरलांजी, धोप व पिटेसूर या परिसरातील शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या शेतीत सुध्दा आमुलाग्र बदल घडविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
श्री. दिवाकर पवार हे वयाच्या २२ व्या वर्षापासून शेती व्यवसाय करतात. त्यांच्या संयुक्त कुटुंबात पूर्वी ११.२ हेक्टर शेती होती. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच सेंद्रीय शेती करुन उत्पादनामध्ये वाढ केली आहे. कमी खर्चाची शेती करुन जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांनी २५.२ हेक्टर जमीन विकसित केली आहे. केवळ धान या एकाच पिकावर अवलंबून न राहता आवळा, आंबा, विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. रोग व किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधीचा कमीत कमी वापर करुन जास्तीत जास्त सेंद्रिय, जैविक व वनस्पती औषधांचा वापराकडे त्यांचा कल आहे.
बागायती पिके घेताना पाण्याचे योग्य नियोजन करुन ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे जमिनीची धुप थांबविली गेली आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी निम, करज, महुआ, कुसूम व ऐरंडी पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. सन २००६-०७ पासून श्री. पवार हे महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रम राबवून उत्तम प्रकारचे बियाणे उत्पादित करुन पुरवठा करतात. एकात्मिक किड व्यवस्थापना अंतर्गत प्रकाश सापळे, चिकट सापळे, फेरोमन सापळे, पक्षी थांबे यांचा वापर करुन किडीचे व्यवस्थापन करतात.
पिक उत्पादन वाढीसाठी शेतात ड्रममध्ये गांडुळाव्दारे व्हर्मीवॉश तयार करुन त्याचा वापर संजीवके, बुरशीनाशके म्हणून करतात. श्री. पवार यांनी एक एकर निकृष्ट जमिनीमध्ये आवळा व सागवान झाडाची लागवड केली आहे. फलोत्पादन योजनेअंतर्गत ५ हेक्टरवर राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत उती संवर्धनाचा वापर करुन चांगले उत्पादन घेतले आहे. तसेच एक हेक्टर क्षेत्रावर केळीची बाग ठिबक सिंचनाचा वापर करुन फुलविली आहे. अर्धा एकरवर आंबा, चिकू, लिंबू, पेरु व डाळिंबाच्या झाडाची लागवड केली आहे. शेतीपूरक व्यवसायाची जोड म्हणून गावरान गाईपासून घरीच जरशी गाई तयार करुन दुग्ध उत्पादन सुरु केले आहे.
श्री. पवार हे शेतीसोबतच ग्रामोत्थानासाठी प्रयत्नशील आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे उपाध्यक्ष असून गावकर्यांच्या सहकार्याने जांब गावाला तंटामुक्तीचा ४ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच शासनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व योजनांची अंमलबजावणीत ते नेहमीच तत्पर असतात. कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल राज्य शासनाने त्यांना १९९८ या वर्षी शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानित केले आहे. तसेच त्यांना २००८ च्या कृषी भूषण शेतकरी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
'महान्यूज'मधील मजकूर.