Showing posts with label डाळिंब. Show all posts
Showing posts with label डाळिंब. Show all posts

Tuesday, April 17, 2012

माळरानावर बहरले डाळींब


पर्जन्यमानात घट झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडणारे दर पाहता शेती उद्योग तोट्यात आला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांना बाजूला सारत पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करून आणि मेहनत व चिकाटीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील आवटी बंधूंनी त्यांच्या खंडाळा मकरध्वज शिवारातील माळरानावर डाळिंबाचा बगीचा फुलविण्यात यश मिळविले आहे. खडकाळ आणि निकस म्हणवल्या जाणाऱ्या माळरानावर डाळिंबांचा बहर निर्माण करुन इतर शेतकऱ्यासमोर नवा आदर्श निर्माण करण्याचे काम आवटे बंधूनी केले आहे.

Thursday, January 12, 2012

आठ एकरात डाळिंबाचे ७० टन उत्पादन


सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे जवळच्या बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीत आठ एकर क्षेत्रातून विनायक मनोहर नामजोशी यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाचे ७० टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

श्री. नामजोशी हे फलटण संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचे नातू आहेत. ते शेती पिकविण्यात आनंद मानतात. त्यांनी येथील शेतील ऊस पीक घेतले आहे, तर बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असताना त्यांनी १३ एकर क्षेत्रात डाळिंब पीक घेणे पसंत केले आहे. 

Wednesday, September 7, 2011

संघर्षाने मिळवली डाळिंबाला बाजारपेठ


सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञानाला मेहनतीची जोड मिळाल्यानंतर काय किमया होऊ शकते, याची प्रचिती मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी येथील विठ्ठल कारंडे या तरुण शेतक-याने डाळिंब शेतीतून दाखवून दिली आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी बाजार पेठेप्रमाणे पीकपध्दतीत बदल करताना दिसत आहेत. विशेषत: डाळिंबासारखे नगदी पीक काही शेतक-यांना खुणावताना दिसत आहे. मात्र, या पिकामध्ये रोगाची समस्या वाढली असल्याने शेतक-यांना बाजारपेठ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अर्थात, सर्व समस्यांवर मात करुनही हे पीक यशस्वी करणारे शेतकरीही पाहण्यास मिळतात.

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यात वडाचीवाडी हे गाव आहे. येथील विठ्ठल कारंडे हे त्यापैकीच एक उदाहरण म्हणावे लागेल. २००४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यांतर नोकरीपेक्षा घरच्या शेतीलाच त्यांनी पसंती दिली. परंतू तेच तेच करण्यापेक्षा शेतीत नवे काही करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यातूनच त्यांच्या परिसरातील अरण येथील प्रयोगशील शेतकरी हणमंत गाजरे यांची डाळिंबाची शेती त्यांनी पाहिली. प्रयोगासाठी प्रेरणा मिळाली आणि सुरु झाला विठ्ठल यांचा डाळिंब शेतीतील प्रवास. त्यातच सोलापूरच्या कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी त्यांचा संवाद वाढला. कृषी विज्ञान केंद्राने मध्ये मृग बहार तेल्या रोग व्यवस्थापन अंतर्गत प्रात्यक्षिक घेतले.या प्रात्यक्षिकामध्ये विठ्ठल हे लाभार्थी होते. त्यानंतर केंद्राचे प्रमुख समन्वयक प्रा. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ प्रा. सय्यद शाकिर अली, किरण जाधव यांनी त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे(आयसीएआर) महासंचालक डॉ.एस.अय्यप्पन यांनी सोलापूर दौ-यात आवर्जून विठ्ठलच्या बागेला भेट दिली. त्या वेळी बागेची घेतलेली काळजी पाहून अय्यप्पन यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर थोडी- थोडकी नव्हे, तर तब्बल सहा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. माढा तालुक्यातील तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या चुका सुधारतानाच नव्याने काही नियोजन केले. पुण्यासह कोलकत्याच्या बाजारपेठेतही डाळिंबे पाठविली. तिथे ८७ ते १४५ रुपयांपर्यंत प्रति किलो भाव मिळाला. त्यातूनच त्यांनी दोन वर्षात १ लाख २० हजार रुपये निव्वळ नफा मिळवला. नैसर्गिक आपत्तीवर मात करीत आणि संघर्षाने बाजारपेठ मिळवित विठ्ठलने एक नवा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.

Sunday, August 7, 2011

रोहयो अंतर्गत डाळींब बागेतून भरघोस उत्पन्न




जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तळेगाव येथील शिवाजी काशिनाथ शिवतारे यांनी डाळींब फळबाग लागवड करण्याचे ठरविले. ते यापूर्वी सतत १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण सभापती या पदावर कार्यरत होते. त्यासोबतच त्यांना शेती करण्याचा छंद होता. त्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत ३ हेक्टर क्षेत्रावर डाळींब लागवड केली.

वेळोवेळी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन डाळींब पिकामधील आदर्श व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तसेच सूत्रकृमीचे नियंत्रण, उच्च प्रतीच्या डाळींब उत्पादनासाठी फर्टिगेशनव्दारे खत व्यवस्थापन अशा प्रकारे नियोजन केले. लागवड करण्यापूर्वी मे महिन्यात खड्डे खोदून त्यामध्ये सेंद्रिय पालापाचोळा, शेणखत, लिंडेन पावडरने खड्डे भरुन घेतले. नंतर लगेच ३ हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन संच बसवून लागवड केली.

पाण्याचे व्यवस्थापन करुन गरजेनुसार डाळींब बागेला पाणी दिले. वर्षातून तीन ते चार वेळा खुरपणी करुन निघालेल्या तणाचे डाळींब पिकाच्या बुडख्यापाशी आच्छादन करुन पाण्याची बचत केली. ट्रायकोडर्मा, पी.एस.बी. हे शेणामध्ये मिश्रण करुन प्रत्येक झाडास दोन लिटर याप्रमाणे दिले. डाळींबाची छाटणी स्वत: दरवर्षी अनुभवी कामगारांकडून करुन घेतली. फांदीची फळे आकाराने मोठी असतात यामुळे पंजा छाटणी व पोट छाटणी अशा दोन प्रकारच्या छाटणी करण्यात येतात. छाटणीनंतर लगेच एक टक्का बोर्डी मिश्रणाची फवारणी करण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञान वापरुन एका झाडापासून ३५ किलो उत्पादन मिळते. एकूण २४०० झाडांपासून ८४ हजार किलो उत्पादन झाले. यावर्षामध्ये मिळालेला सरासरी बाजारभाव २० रुपये प्रति किलो प्रमाणे १६ लाख ८० हजार रुपये एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. या सोबतच डाळींबाची पॅकींग, ग्रेडिंग करुनच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठविले जाते.

शेतकऱ्यांकडून डाळींब रोपासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मागणी प्रमाणे ७० हजार डाळींब कलमे तयार करुन प्रती रोप १५ रुपये दराने विक्री करण्यात येते. त्यापासून १० लाख ५० हजार रुपये मिळाले आहेत. डाळींब विक्रीपासून व डाळींब कलमापासून २७ लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे श्री. शिवतारे यांनी सांगितले. 

Saturday, July 2, 2011

डाळिंबावरील तेल्या चे नियंत्रण कसे कराल

पानांवरील रोगाची लक्षणे - 
रोगाची प्रथम सुरवात ही पानांवर होते. त्यानंतर अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यांवर रोग येतो. सुरवातीला रोगग्रस्त पानांवर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पाणथळ - तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येऊन ते 3 ते 4 मि.मी. आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्‍यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते. यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फुलकळीवरील रोगांची लक्षणेसुद्धा पानांप्रमाणे असतात.

फांदीवर रोगाची लक्षणे -
पानांप्रमाणे कोवळ्या फुटींवर रोगाचे ठिपके साधारणतः फांदीच्या पेऱ्यावर, फुटीच्या बेचक्‍यात दिसून येतात. ठिपक्‍यांचे लंब गोलाकार चिट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळेस ठिपक्‍यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते. डाळिंब फळावर रोगाची लक्षणे : फळांवर पानांप्रमाणे पाणथळ - तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर-तेलकट होतो. फळांवर रोगग्रस्त भागात आडवे - उभे तडे जातात व फळे फुटतात. फळांवर थोडा जरी रोग आला, तरी त्यांची प्रत पूर्णपणे खराब होते आणि अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.

रोगाचा प्रसार -
प्राथमिक प्रादुर्भाव : रोगग्रस्त भागातून आणलेल्या गुटीकलमांचा वापर, बागेशेजारी रोगग्रस्त फळे आणि झाडाचे रोगग्रस्त अवशेष टाकणे. बागेमध्ये अस्वच्छता असणे, त्याचबरोबर झाडांच्या दाटीमुळे हवा खेळती नसणे व सूर्यप्रकाशाचा अभाव असणे.

दुय्यम प्रादुर्भाव : रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा बागेत दुय्यम प्रसार हा वाऱ्याबरोबर वाहून आलेली रोगग्रस्त पाने, वादळी पाऊस, औत-अवजारे, मातीचे कण, आंतरमशागत करताना प्राणी, तसेच मजुरांच्या हाताळणीमुळे, जमिनीवर वाहणारे पाणी, कीटक इ. मुळे होतो; परंतु हवेमार्फत रोगाचा प्रसार फारच कमी होतो.

अनुकूल परिस्थिती -
पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ अतिशय झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी साधारणतः उष्ण (30 अंश सेल्सिअस) तापमान, मध्यम ते भरपूर आर्द्रता (50 ते 90 टक्के), अधूनमधून हलका पाऊस आणि ढगाळ हवामान अशा वातावरणाची आवश्‍यकता असते, तसेच रोगकारक जिवाणू हे 50 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत जिवंत राहू शकतात. हंगामाच्या सुरवातीला नवीन बहर फुटल्यानंतर जोराचा मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो आणि पुढील वाढ झपाट्याने होते.

# डाळिंबावरील तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोगनियोजनाची शिफारस करण्यात आली आहे.
हलक्‍या व मध्यम जमिनीत डाळिंब लागवड करावी.
रोगग्रस्त भागांत शक्‍यतो हस्त बहर घ्यावा .
लागवडीसाठी रोगविरहित प्रमाणित केलेली रोपे वापरावीत.
बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रत्येक झाडास तीन ते चार खोडे ठेवावीत.
छाटणीसाठी व इतर अवजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1 लि. पाण्यात 50 ग्रॅम मोरचूद बारीक करून विरघळून घ्यावे व या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मि. बुडवावे. नंतरच अवजारांचा वापर करावा.

रोगग्रस्त पाने, फुले, फळे, फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
बागेत जमिनीवर कॉपर डस्ट 4 टक्के (20 किलो प्रति हेक्टर) धुरळणी करावी.
छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर बॅक्टीरियानाशक 50 ग्रॅम + कॅप्टन (0.5 टक्के) 500 ग्रॅम मि.लि. पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा.

छाटणीनंतर लगेचच 1 टक्का बोर्डोमिश्रणाची पहिली फवारणी करावी.
दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने बॅक्टीरियानाशक 50 ग्रॅम + कॅप्टन (0.5 टक्के) 500 ग्रॅम मि.लि. पाण्यात मिसळून या द्रावणाची करावी.

त्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक सल्फेट (1 ग्रॅम) + मॅग्नेशिअम सल्फेट (1 ग्रॅम) + कॅल्शिअम नायट्रेट (1 ग्रॅम) + बोरॉन (1 ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.

बागेतील रोगाचे प्रमाण आणि रोग वाढीस अनुकूल हवामान असल्यास गरजेनुसार वरीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

Wednesday, January 12, 2011

थंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्राक्ष,मोसंबी,अंजीर,आंबा,कापूस,भाजीपाला.

थंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्राक्ष,मोसंबी,अंजीर,आंबा,कापूस,भाजीपाला.
थंडीमध्ये पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा... 

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती