Showing posts with label भाजीपाला.. Show all posts
Showing posts with label भाजीपाला.. Show all posts

Wednesday, January 18, 2012

शेततळ्याच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती


कोरडवाहू शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाच्या अनियमितेमुळे अशा शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे खात्रीशीर राहत नाही. यावर सामूहिक शेततळ्याचा पर्याय शोधून पाण्याची सोय झाल्याने कोरडवाहू शेतीमधूनच अधिक आणि खात्रीशीर उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील कुबेफळ येथील शेतकरी रामराव फड यांनी करून दाखविला आहे.

फड यांनी कोरडवाहू शेतीला पाण्याचा शाश्वत आधार देण्यासाठी सामूहिक शेततळे तयार केले. शेताशेजारी असणाऱ्या ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधला. त्यामुळे पाण्याची पातळी वर आली आहे. बंधाऱ्यालगत ४४ बाय ४४ मीटर आकाराचे १ कोटी २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. या शेततळ्याचा फड यांना मोठा फायदा झाला असून कमी कालावधीत येणारी भाजीपाल्याची शेती या शेततळ्याच्या पाण्यावर त्यांनी फुलवली आहे.

Sunday, June 26, 2011

महिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.




ग्रामीण भागातील बहुतांश महिलांचा मोठा व्यवसाय करण्याकडे कल नसतो. घरातील घरात पापड लाटणे, लोणची बनविणे, खानावळ चालविणे सारखे व्यवसाय करतात . परंतू याला अपवाद ठरला खैरे गावातील महिला बचतगट.

वाडा तालुक्यातील मानिवली मध्ये असलेल्या खैरे गावातील कल्पना पाटील यांनी ११ महिलांचा बचतगट तयार केला. गावातील परिस्थितीचा अभ्यास करून शेळीपालन आणि शेती नांगरणीसाठी भाडेतत्वावर पॉवर टिलर टॅक्टर देण्याचा व्यवसाय सुरु केला. या पॉवर टिलर टॅक्टरसाठी बॅक ऑफ महाराष्ट्रकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. व्यवसाय सुरु केला पण दुदैंवाने शेळीपालन व्यवसाय हवा तसा चालना नाही. तसेच शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टरला मागणी न आल्याने संपूर्ण बचतगटच अडचणीत आला.

महिलांच्या अंगी असणारी जिद्द व चिकाटीमुळे त्या डगमगल्या नाहीत. या अडचणींवर मात करून नव्या उमेदीने त्यांनी वाडयातील सामाजिक वनीकरण विभागाकडून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळविले. पुढे तर बँकांकडे कर्जासाठी हात न पसरता बचतगटाच्या सर्व महिलांनी २५ ते ३० हजार रुपये खर्च करून शेती व्यवसाय सुरु केला. शेतीत त्यांनी चवळी, मका, कारली असा भाजीचा मळा फुलवला. विशेष म्हणजे या महिलांच्या घरातील सर्वच मंडळी या भाजीपाला व्यवसायात हातभार लावत आहेत. साधारणपणे या भागात ५०० किलोचे उत्पादन होते. वाडा शहरात भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ नसल्याने नवी मुंबईतील व्यापारी हा भाजीपाला उचलतात. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे त्यांना ५ ते १० हजार रुपये मिळतात.

महिला बचतगटाने फुलविलेल्या भाजीपाला व्यवसायातून महिलांचा आर्थिकस्तर उंचचावण्यास मदत झाली आहे. बँकेचे कर्ज वेळेत फेडणे, सामाजिक वनीकरणासाठी सहकार्य, भाजीपाला उत्पादनसारखा स्तुत्य उपक्रम राबविणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत या महिला बचतगटाला ठाणे जिल्हा आणि कोकण विभागासाठी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार देण्यात आला.

Wednesday, June 8, 2011

सांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.




माणगावपासून २५ कि.मी. अंतरावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोवेले गावाची लोकसंख्या ४५० एवढी आहे. गावातील बरीचशी पुरुष मंडळी नोकरीनिमित्त मुंबईला असतात. गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने महिलांनीही पुरुषांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याच गावातील वयस्कर असणाऱ्या हिराबाई राजाराम साळुंखे या महिलेने घरातील सांडपाण्यावर भाजीचा मळा तयार केला आहे. पायख्याचा (सांडपाण्याचा) उपयोग कसा करायचा हे दाखवून देऊन त्यांनी टॉमेटो, मिरची, घेवडा, वांगी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले आहे.

येथील शेतकऱ्यांना फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. उन्हाळी पाणी नसल्याने व डोंगराळ भाग असल्याने उन्हाळी शेती करता येत नाही. गावात पुरातन काळातील गणपती मंदिर तसेच भेरीचा मंदिर असल्याने गावातील वातावरण भक्तीमय आहे. गणेश जयंती दिवशी गावात सप्ताह सुरु होतो. अशा या निसर्गरम्य तसेच भक्तीमय गावात घरातील वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा उपयोग करुन घेवडा, वांगी, टॉमेटो, मिरची, आळूची पाने इत्यादी प्रकारच्या भाजीबरोबरच अबोलींच्या फुलांची बागही तयार करण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारचे खत न वापरता फक्त शेणखत व पाण्याचा वापर करुन त्यांनी भाजीमळा पिकविला आहे. स्वत:च्या पोटापाण्याचा मार्ग स्वत:च शोधायचा असतो. उतारवयात देखील कष्ट करण्याची हिंमत उराशी बाळगून गोवेले गावातील हिराबाई साळुंखे यांनी भाजीपाला शेतीची कास धरुन रोजंदारीचा प्रश्नही सोडविला आहे. हाच आदर्श नोकरीसाठी फिरणाऱ्या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. यातूनच स्वयंरोजगार निर्माण होतो. शिवाय स्वत:च्या कुटुंबाबरोबर गावाचा विकासदेखील होतो. माणसाने कष्ट करण्याची तयारी ठेवली तर शेतीबरोबरच भाजी पाल्याचे पिकही उत्तम घेता येते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हिराबाई या स्वत:च्या कुंटुंबाला लागणारी भाजी उपयोगात आणून उरलेली भाजी विकून चार पैसेही कमावित आहेत, हेही नसे थोडके.

Wednesday, May 25, 2011

आदिवासी शेतकर्‍यांची भेंडी व मिरची युरोपीयन बाजारपेठेत .





जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे मोखाडय़ातील खोच या आदिवासींच्या गावाने दाखवून दिले आहे. मुंबईतील आरोहन या सामाजिक संस्थेने येथील आदिवासींना एकत्र करून साडेसात एकर जमिनीवर सेंद्रिय खताचा वापर करून भेंडी आणि मिरच्यांची लागवड केली. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन मेहनत केल्याने भेंडी आणि मिरचीचे चांगले उत्पादन आले. महत्त्वाचे म्हणजे त्याला इंग्लंडमधून चांगली मागणी असल्याने या शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गावातील बेरोजगारीचा प्रश्नही संपुष्टात आला आहे. 


ठाणे जिल्ह्यातील मोखाडा हा दुर्गम आदिवासींचा तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांचा फायदा देखील आदिवासी घेतात. या योजनांचा लाभ घेऊन आदिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने आरोहन ही संस्था सातत्याने प्रयत्न करीत असते. 

या संस्थेने खोच गावातील लोकांना एकत्र करून साडेसात एकर जमिनीवर भेंडी आणि मिरच्यांची लागवड केली. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करून युरोपमधील बाजारपेठ त्यासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यात त्यांना यश आले. येथील भेंडीला इंग्लंडमधून मोठी मागणी असल्याने ती आता निर्यात केली जाते. यामुळे येथील शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळत असल्याने त्यांचे राहणीमान उंचावण्यास तर मदत झाली आहेच, पण त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. 

ही योजना राबवताना पाण्याची सोय असलेली साडेसात एकर जमीन निवडण्यात आली. ही जमीन ११ शेतकर्‍यांच्या मालकीची होती. त्यामुळे त्यांना एकत्र करून गटशेती तयार केली. या गावातील लोकांबरोबरच शेजारच्या गावांतीलही सुमारे १५० मजुरांना शेतीच्या कामासाठी घेण्यात आले. सेंद्रिय खताचा वापर केल्याने येथील भेंडी आणि मिरचीचा दर्जा उत्तम राहिला. त्यामुळेच या उत्पादनांना युरोपीयन बाजारपेठ मिळण्यात अडचण आली नाही. येथील शेतकर्‍यांना आता हमीभाव देणे आम्हाला शक्य झाले असल्याचे या संस्थेचे राहूल तिवरेकर यांनी सांगितले. 

शेतीची लागवड कशी करायची याची माहिती कृषितज्ञांनी दिल्यामुळे शेतकर्‍यांना आत्मविश्वास आला. येथे भेंडी आणि मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. आम्ही सुमारे साडेतीन टन एवढं रिजंटा १५२ या जातीच्या भेंडीचे उत्पादन घेतले असून त्यातील अडीच टन भेंडी इंग्लंडला निर्यात केली. ही भेंडी शंभर टक्के नैसर्गिक वातावरणात वाढवली असल्यामुळे ती पौष्टिक असून तिची चवही खूपच चांगली आहे. त्यामुळे परदेशातून तिला चांगली मागणी आहे. येथील शेतकर्‍यांना या हंगामात प्रत्येकी ४५ हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे. 
'महान्यूज'.

Friday, April 22, 2011

कारल्यामुळे झाला लखपती.





निसर्गाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न घटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकर्‍यांनी जमिनी विकण्याचा सपाटा लावला असतानाच दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेघरच्या पंकज पाटील या तरुण शेतकर्‍याने भातशेतीबरोबरच साडेतीन एकरामध्ये कारल्याचे पीक घेऊन नवीन पायंडा पाडला आहे.

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख होती. मात्र, काही वर्षांपासून जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगाने वाढू लागले आणि पडिक जमिनीसह शेतजमिनींवर प्रकल्प उभे राहू लागले. त्यातच खडीकरणाच्या जमिनी संरक्षक बंधारे फुटल्याने नापीक होऊ लागल्या. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्या, मसाल्याची पिके घेण्याबरोबरच दुग्धव्यवसाय करण्याच्या सूचनाही कृषी विभागाकडून वारंवार करण्यात आल्या. 

अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेपूर येथील पंकज पांडुरंग पाटील या तरुणाने असाच एक नवा पायंडा पाडला आहे. त्याने साडेतीन एकर शेतात नऊ वर्षापासून कारल्याचे पीक घेतले आहे. दहावीच्या परीक्षेत अयशस्वी झालेल्या पंकजला पुढे शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिकता आले नाही. त्याने कृषी व्यवसायातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबानेही सहकार्य केले. त्याचप्रमाणे कृषी विभागाचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 

पावसाळी भातकापणीनंतर अभिषेक जातीच्या कारल्याचे पीक घेण्यात येते. एक दिवसाआड ८०० ते ९०० किलो कारले मिळते, असे पंकज सांगतो. नवी मुंबईतील वाशी येथील बाजारात कारले विक्रीसाठी नेण्यात येते. या पिकातून वर्षाला सुमारे तीन लाखांचा नफा मिळतो, असे तो आत्मविश्वासपूर्वक सांगतो.

कारल्याचे पीक घेताना त्याला सर्व प्रकारची आवश्यक द्रव्ये मिळतील असा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी ७५ टक्के शेणखत आणि २५ टक्के रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. रासायनिक खतामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानेच शेणखतावर अधिक भर दिल्याचे पंकज सांगतो. उत्पादन वाढीसाठी आणि पिकाचा दर्जा राखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करत असल्यामुळे त्याचा त्याला फायदाच होत आहे. त्याने अतिरिक्त उत्पन्नातून आणखी जमीन खरेदी केली आहे. 

पाऊस लहरी आहे आणि दराचा भरवसा नाही यामुळे हताश न होता बाजारभावाचा अंदाज घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे हिताचे आहे, असा संदेशही तो यानिमित्ताने देतो. 

आदिवासींनी फुलवले भाजीचे मळे.






केंद्र सरकारने वन हक्क दाव्यांचा कायदा केला. त्यातून रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार आदिवासींना त्यांच्या हक्कांच्या जमिनी मिळाल्या आहेत. यापूर्वी थोडेसे दचकत शेती करणारे आदिवासी आता बिनधास्तपणे या व्यवसायात उतरले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वरप परिसरात आदिवासी आता आपल्या मालकी हक्कांच्या जमिनींवर भाजीचे मळे फुलवू लागले आहेत.

जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. येथील आदिवासींनी वनराई बंधारे बांधून त्यात पाणी अडवून ठेवले आहे. साकव संस्थेने त्यांना पंप पुरविले आहेत. या पंपाने पाणी खेचून आदिवासी बांधव शेती-बागायती करीत आहेत. शिक्षणाचा फारसा प्रसार या भागात झाला नसला तरी शेतीच्या माध्यमातून त्यांची चांगल्या प्रकारे उपजीविका सुरु आहे. वांगी, टोमॅटो, मिरची, दुधी, कारली यासारख्या फळभाज्या पिकवून त्या नागोठणे बाजारात नेऊन विकायचा नित्यक्रम ठरुन गेला आहे. सरकारने जमिनी नावावर करुन दिल्याने या आदिवासींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे

पिकविलेला भाजीपाला आम्ही डोक्यावर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जातो. गावात यायला पूर्वी साधी पाऊलवाट होती. आता ग्रामस्थांनी श्रमदानाने बर्‍यापैकी रस्ता तयार केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी गावातील प्राथमिक शाळा, तसेच अंगणवाडीला भेट देऊन तेथील शैक्षणिक स्थितीची माहिती घेतली. अंगणवाडीतील सर्व मुलांना पूरक पोषण आहार द्या, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना केली. त्यावेळी साकव सामाजिक संस्थेचे प्रमुख अरुण शिवकर यांनीही आदिवासींच्या समस्या जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

गावातील एकही नागरिक यापुढे रोजगारापासून वंचित राहणार नाही, ज्याच्याकडे शेती आहे त्याला आणि शेती नाही त्यालाही पुरेसा रोजगार मिळेल, अशी आश्वासक स्थिती निर्माण करण्यात आली आहे. शेतीच्या माध्यमातून सुरु झालेला आर्थिक संपन्नतेचा मार्ग त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीपर्यंत पोहोचेल यात आता शंका वाटत नाही.


Wednesday, January 12, 2011

थंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्राक्ष,मोसंबी,अंजीर,आंबा,कापूस,भाजीपाला.

थंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्राक्ष,मोसंबी,अंजीर,आंबा,कापूस,भाजीपाला.
थंडीमध्ये पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा... 

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती