Showing posts with label सेंद्रिय शेती. Show all posts
Showing posts with label सेंद्रिय शेती. Show all posts

Wednesday, June 13, 2012

पूजा सावंत यांची सेंद्रिय शेती


रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम त्यामुळे जमिनीचा कमी होणारा कस आदी बाबी लक्षात घेऊन तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व पटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील पूजा पांडुरंग सावंत यांनी सेंद्रीय व औषधी शेतीचा अभिनव प्रयोग करून आपल्या पूर्वजांचा सेंद्रीय व औषधी शेतीचा वारसा जतन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वी जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

टाकळी सिकंदर येथील कृषीभूषण कै.दिगंबर (अण्णा) सावंत यांच्या स्नुषा पूजाताईंचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे विवाहानंतरही त्यांना शेतीची ओढ स्वस्थ बसू देईना. रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग परस बागेतील झाडांवर सुरू केले. 

Tuesday, May 15, 2012

मेळघाटमध्ये सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन


चिखलदरा तालुक्‍यातील सोमवारखेडा, वस्तापूर, कुलंगणा (खुर्द) कुलंगणा बुजरूक या चार गावातील अनेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहेत. शेतीत लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळे होणारी हानी आणि महागाईमुळे येणारा कर्जबाजारीपणा या बाबी लक्षात आल्यावर सेंद्रीय पद्धतीने शेती केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. जीवन विकास संस्था यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, मिरची, ज्‍वारी, भुईमूग यांचे सेंद्रीय पद्धतीने चांगले

Wednesday, February 8, 2012

सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन


नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला शेतमाल अलिकडे दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करून पिकविलेले धान्य तथा भाजीपालाच आज वापरावा लागतो. त्यातून शरीराला किती आणि कोणते अन्नघटक मिळतात हा प्रश्न आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत केवळ नैसर्गिक आणि सेंद्रीय पद्धतीने गेल्या बारा वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी बाबाराव जाधव हे शेती करीत आहे. बाबाराव जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे तंत्र वापरुन भरघोस उत्पादन घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या अकरा वर्षापासून प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रीय शेतीचा ते प्रचार करीत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या गहू, हरभरा, तूर, सोयाबिन, भाजीपाला यासारख्या सेंद्रीय शेतमालाला प्रचंड मागणी आहे.

Wednesday, October 26, 2011

सेंद्रिय शुद्धता


राज्य शासनातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेती आणि त्यासाठी लागणाऱ्या खतनिर्मिती युनिटबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालगड गावातील कोंडविलकर कुटुंबाने चांगला गांडुळखत प्रकल्प उभारून शासनाच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे.

पुष्पा कोंडविलकर यांचेकडे पारंपरिक फळबाग आणि भाताची शेती होत असे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात येई. सेंद्रिय खताविषयी अधिक माहिती घेतल्यावर बाहेरून किंमत मोजून खत आणण्याऐवजी आपल्याच शेतात सेंद्रिय खताचे युनिट उभारण्याचे त्यांनी निश्चित केले. २००५ मध्ये श्री समर्थ गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोंडविलकर गुरुजींनी निवृत्तीनंतर या युनिटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. प्रकल्पाची गुणवत्ता चांगली असली तर भूमीपुत्राचे ऋण फेडण्यासाठी खत प्रकल्पाच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल म्हणून त्यांनी या प्रकल्पाचा सूक्ष्म अभ्यास केला.

Wednesday, October 19, 2011

घनकचऱ्यापासून सेंद्रिय आणि जैविक खतनिर्मिती


घनकचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा राज्यातील तिसरा प्रकल्प अकोला येथील अमानतपूर ताकोंडा येथे सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला १०० टन सेंद्रिय, जैविक खतनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पास आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे घनकचऱ्याचे नियोजन करणे अकोला महापालिकेला शक्य तर झालेच शिवाय आर्थिक उत्पन्नातही वाढ झाली आहे.

अकोल्यातील भूधन ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २००३ मध्ये शहरापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या अमानतपूर ताकोंडा येथे खतनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी महानगरातील घनकचरा पुरविण्यात येतो. त्यासाठी मनपाला प्रती खेप १०० रुपये मिळतात. हा प्रकल्प सुरु झाल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे मनपाला सहज शक्य झाले आहे.

Tuesday, July 26, 2011

कमी खर्चाची सेंद्रिय शेती




भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश म्हणजे जवळ जवळ ६० ते ७० टक्क्यांहून जास्त लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. बलशाली भारताला सुजलाम-सुफलाम बनविण्यास बळीराजा जबाबदार आहे. मात्र सध्याच्या गतिमान काळात वेगवेगळी रासायनिक खते वापरुन झटपट पैसे मिळविण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे याचा जमिनीवर तर परिणाम होतोच, शिवाय रासायनिक खतातील कार्बन डायऑक्साईड, पोटॅशिअम सारख्या विषारी घटकांमुळे अन्न द्रव्‍यामधून मानवाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे रासायनिक शेती धोकादायक ठरत आहे. मात्र सध्याच्या गतिमान युगातही गांडूळ, सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरुन नैसर्गिक शेती फूलवत भरघोस उत्पन्न मिळविणारे पटवर्धन कुरोलीतील शेतकरी पोपट देवकर यांच्या सेंद्रिय शेतीची गोष्ट काही निराळीच आहे.

सेंद्रिय शेतीकडे कसे वळलो हा अनुभव सांगताना श्री. देवकर म्हणाले की, पूर्वी मी रासायनिक खतांचा जास्त प्रमाणावर वापर करत होतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी, सततचा रासायनिक खतांचा वापर यामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला होता. अशा स्थितीत मला पांडूरंग सहकारी साखर कारखान्याकडून गांडूळ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आला व हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून २५ हजाराचे अनुदानही मिळाले. गांडूळखत

Sunday, January 30, 2011

सेंद्रिय भाताची किफायतशीर शेती..


महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या अभियानातून महिला बचत गटाचा संयुक्त सेंद्रिय भात प्रकल्प चंद्रपूर जिल्हयाच्या तीन तालुक्यात घेण्यात आला. पोंभूर्णा, चंद्रपूर आणि गोंडपिपरी या तालुक्यातील १८ गावाच्या महिलांनी७२५ महिलांकडून ११०० एकरावर सेंद्रिय भात प्रकल्प राबविला. या गटाने उत्पादित केलेल्या धानाची नागपूरच्या कीटनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेत तपासणी केली असता एमआरएलच्या निकषानुसार भाताचे सर्व नमुने पात्र ठरले आहे.
या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांना सुधारित व सेंद्रिय पध्दतीने भात लागवडीचे पूर्व हंगामी प्रशिक्षण चंद्रपूर येथील तालुका फळ रोपवाटिकेत देण्यात आले त्यामध्ये सेंद्रिय भात लागवडीसाठी माती परीक्षण, सेंद्रिय खताचा वापर, रोपवाटिका तयार करणे व सुधारित श्री पध्दतीने. भात पिकाची लागवड या प्रशिक्षणाचा समावेश आहे प्रत्यक्ष कार्यानुभव यावा म्हणून शेती शाळेच्या माध्यमातून प्रती आठवडा एक दिवस याप्रमाणे कृषी खात्याने क्षेत्रीय स्तरावर प्रशिक्षणही दिले. राज्यभरातील १०० बचतगट सहभागी झाले आहे

सेंद्रिय पध्दतीने लागवडीच्या खर्चात ५० टक्के बचत झाली. रासायनिक खते वापरल्याशिवाय अपेक्षित उत्पादन मिळत नाही असा शेतकर्‍यांचा समज महिलांनी दूर केला. सेंद्रिय पध्दतीने पिकाचे नियोजन करता येते. पिकास आवश्यक असणारी मूल द्रव्ये दिल्यास उत्पादनात घट न येता मालाची प्रत चांगली टिकून राहते व पिकाचे अधिक उत्पादन घेता येते.

सेंद्रिय शेतीमुळै किमान ५० ते ६० टक्क्यापर्यंत रासायनिक खताची बचत करुन शेती अधिक किफायतशीरपणे करता येऊ शकते. हे या महिलांनी सिद्ध करुन दाखविले. प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल भाताचे उत्पादन झाले. यातून ५ हजार क्विंटल सेंद्रिय भात उपलब्ध झाला आहे. उत्पादित मालाची दहा गावातील रॅन्डम पद्धतीने सॅम्पल काढून नागपूर येथील कीटनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविली. हे सर्व नमुने पात्र ठरले. त्यासाठी ३२ कीटकनाशकाची त्यावर चाचणी घेण्यात आली आहे त्या सर्व चाचणीतून उत्पादित झालेला माल निकषात पात्र ठरला आहे.

हा उत्पादित माल आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहे. जिल्हयात प्रथमच अशा स्वरुपाचा प्रकल्प महिला बचत गटामार्फत चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यामुळे जिल्हयातील मूल, सावली, सिंदेवाही, चिमूर, भद्रावती या भात पट्टयातील तालुक्यातील शेतकरी महिला बचत गटांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

यावर्षी किमान ४ हजार महिला पुढे येतील असे चित्र आता दिसत आहे. त्या सर्वांचे प्रशिक्षण क्षेत्रीय स्तरावर व चंद्रपूर येथील रोपवाटिकेवर जानेवारी २०११ अखेर आयोजित करण्यात येणर आहे. या कार्यक्रमासाठही सहभागी महिलांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अवजारे व प्रचलित अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कडधान्य विकास कार्यक्रम, पपई लागवड, हरितगृह शेती, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यासारख्या आदी क्षेत्रातही संयुक्त शेतीसाठी महिला पुढे येत आहेत.तसेच शेतकरी महिला बचत गटांनी पुढाकार घेतलेला आहे.


'महान्यूज.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती