Showing posts with label भात. Show all posts
Showing posts with label भात. Show all posts

Thursday, October 6, 2011

राज्यात हळव्या भाताची काढणी सुरु तर भुईमूग, तूर, कापूस पक्वतेच्या अवस्थेत


राज्यात चालू वर्षी खरीप पिकाच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला असून हळव्या भाताची काढणी सुरु झाली आहे. निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत तसेच गरवे भात फुलोरा अवस्थेत आहे. ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून बाजरीची काढणी सुरु आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन पिकाची काढणी सुरु झाली आहे. भुईमूग, तूर आणि कापूस पक्वतेच्या अवस्थेत आहेत.

राज्यात चालू वर्षी आतापर्यंत १,१६७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळी, सातारा जिल्ह्यातील मान दहीवडी, सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, पलूस, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यातील भोकर, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी अशा एकूण ११ तालुक्यात ४० ते ६० टक्के एवढाच पाऊस झाला आहे.

Saturday, September 24, 2011

शेतीशाळा प्रशिक्षणामुळे उत्पादनात वाढ


गडचिरोली जिल्ह्याची दर हेक्टरी भात पिकाची उत्पादकता इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड न देता पारंपरिक पध्दतीचा अवलंब करणे होय. या बाबीचा विचार करुन सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास भात पिकाची सरासरी उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृषि विभागामार्फत सन २००९-२०१० या वर्षी आत्मा अंतर्गत भात पिक प्रात्याक्षिकामध्ये चारसुत्री पध्दतीने भात पिकाची लागवड करुन भात पिकाखालील उत्पादन वाढविण्याकरीता काही शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्याक्षिके आयोजित करण्यात आली. त्याकरीता कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी चांदाळा येथे सभा आयोजित केली. शेतकऱ्यांशी संपर्क करुन त्यांना चारसुत्री पध्दतीने भात पिकांची लागवड कशी करावयाची हे पटवून दिले.

Sunday, January 30, 2011

सेंद्रिय भाताची किफायतशीर शेती..


महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या अभियानातून महिला बचत गटाचा संयुक्त सेंद्रिय भात प्रकल्प चंद्रपूर जिल्हयाच्या तीन तालुक्यात घेण्यात आला. पोंभूर्णा, चंद्रपूर आणि गोंडपिपरी या तालुक्यातील १८ गावाच्या महिलांनी७२५ महिलांकडून ११०० एकरावर सेंद्रिय भात प्रकल्प राबविला. या गटाने उत्पादित केलेल्या धानाची नागपूरच्या कीटनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेत तपासणी केली असता एमआरएलच्या निकषानुसार भाताचे सर्व नमुने पात्र ठरले आहे.
या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांना सुधारित व सेंद्रिय पध्दतीने भात लागवडीचे पूर्व हंगामी प्रशिक्षण चंद्रपूर येथील तालुका फळ रोपवाटिकेत देण्यात आले त्यामध्ये सेंद्रिय भात लागवडीसाठी माती परीक्षण, सेंद्रिय खताचा वापर, रोपवाटिका तयार करणे व सुधारित श्री पध्दतीने. भात पिकाची लागवड या प्रशिक्षणाचा समावेश आहे प्रत्यक्ष कार्यानुभव यावा म्हणून शेती शाळेच्या माध्यमातून प्रती आठवडा एक दिवस याप्रमाणे कृषी खात्याने क्षेत्रीय स्तरावर प्रशिक्षणही दिले. राज्यभरातील १०० बचतगट सहभागी झाले आहे

सेंद्रिय पध्दतीने लागवडीच्या खर्चात ५० टक्के बचत झाली. रासायनिक खते वापरल्याशिवाय अपेक्षित उत्पादन मिळत नाही असा शेतकर्‍यांचा समज महिलांनी दूर केला. सेंद्रिय पध्दतीने पिकाचे नियोजन करता येते. पिकास आवश्यक असणारी मूल द्रव्ये दिल्यास उत्पादनात घट न येता मालाची प्रत चांगली टिकून राहते व पिकाचे अधिक उत्पादन घेता येते.

सेंद्रिय शेतीमुळै किमान ५० ते ६० टक्क्यापर्यंत रासायनिक खताची बचत करुन शेती अधिक किफायतशीरपणे करता येऊ शकते. हे या महिलांनी सिद्ध करुन दाखविले. प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल भाताचे उत्पादन झाले. यातून ५ हजार क्विंटल सेंद्रिय भात उपलब्ध झाला आहे. उत्पादित मालाची दहा गावातील रॅन्डम पद्धतीने सॅम्पल काढून नागपूर येथील कीटनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविली. हे सर्व नमुने पात्र ठरले. त्यासाठी ३२ कीटकनाशकाची त्यावर चाचणी घेण्यात आली आहे त्या सर्व चाचणीतून उत्पादित झालेला माल निकषात पात्र ठरला आहे.

हा उत्पादित माल आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहे. जिल्हयात प्रथमच अशा स्वरुपाचा प्रकल्प महिला बचत गटामार्फत चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यामुळे जिल्हयातील मूल, सावली, सिंदेवाही, चिमूर, भद्रावती या भात पट्टयातील तालुक्यातील शेतकरी महिला बचत गटांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

यावर्षी किमान ४ हजार महिला पुढे येतील असे चित्र आता दिसत आहे. त्या सर्वांचे प्रशिक्षण क्षेत्रीय स्तरावर व चंद्रपूर येथील रोपवाटिकेवर जानेवारी २०११ अखेर आयोजित करण्यात येणर आहे. या कार्यक्रमासाठही सहभागी महिलांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अवजारे व प्रचलित अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कडधान्य विकास कार्यक्रम, पपई लागवड, हरितगृह शेती, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यासारख्या आदी क्षेत्रातही संयुक्त शेतीसाठी महिला पुढे येत आहेत.तसेच शेतकरी महिला बचत गटांनी पुढाकार घेतलेला आहे.


'महान्यूज.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती