Showing posts with label Dairy. Show all posts
Showing posts with label Dairy. Show all posts

Saturday, November 19, 2011

महाराष्ट्रातील दोन दूध उत्पादकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान


शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या अहमदनगर व सांगली येथील दोन दूध उत्पादक शेतकऱ्यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला. यावर्षी २८ राज्यांमधून ५६ दूध उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली .

नवी दिल्लीतील भारतीय कृषी विज्ञान केंद्र, पुसा येथे एका शानदार सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याच्या शालिनी राधाकृष्ण विखे-पाटील आणि सांगली जिल्ह्याचे प्रकाश दत्तात्रय पाटील हे दूध उत्पादक शेतकरी आहेत. या पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र, व २१ हजार रोख असे आहे.

Friday, August 12, 2011

धानोरा गावात अवतरली दूधगंगा




राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत आता एकात्मिक दुग्ध विकास प्रकल्पाव्दारे दुग्ध विकासाला चालना दिली जात आहे. धानोरा येथील बालाजी दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवड या प्रकल्पासाठी झाली. संस्थेतील ५० लाभार्थ्यांची निवड करुन प्रत्येक लाभार्थ्याला २ या प्रमाणे १०० गाई ५० टक्के अनुदानावर वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकल्पासाठी ४७ लाख १३ हजार रुपये खर्च होत आहे. त्यामध्ये गाईसाठी निवारा, वैरण गोडावून, पशूखाद्य, जनावरांच्या आरोग्याची देखभाल, दूध मशिन, एक हजार लिटर क्षमतेचा बल्क कुलर, संगणकीय वजन प्रणाली आदी सुविधांच्या समावेशामुळे शास्त्रोक्त पध्दतीने दूध संकलन शक्य आहे.

Thursday, August 11, 2011

युवा अभियंत्याची दुग्ध भरारी




नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने जिल्ह्यातील बेसखेडा (चांदुर बाजार) येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या युवकाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून 'चॅलेंज' म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. रवी पाटील असे या होतकरु युवकाचे नाव आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.

समाजसेवी संस्था म्हणून काम करतांना आलेल्या अनेक प्रकारच्या अनुभवातून पाटील यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र आर्थिक तरतूदी अभावी त्यांचा हा व्यवसाय सुरु होऊ शकला नाही. त्यांचे वास्तव्य असलेल्या चांदुर बाजार तालुका परिसरात अनेक भाकड गाई कसायामार्फत कटाईसाठी जात होत्या. या गाईंना कसायापासून सोडविण्याच्या कामास त्यांनी प्रारंभ केला

Saturday, July 30, 2011

संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना




आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे.वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे.

राज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. या करिता राज्‍यात दुग्‍धोत्‍पादनास चालना देण्‍यासाठी सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे, ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे.

या राज्‍यस्‍तरीय योजनेंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे.

ही योजना खालील तपशीलानुसार सन २०११-२०१२ मध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.
योजनेचे स्‍वरुप (आर्थिक निकष)- 
• सहा संकरित गाई/म्‍हशींचा गट प्रति गाय/म्‍हैस ४० हजार रुपयांप्रमाणे २ लक्ष ४० हजार रुपये, जनावरांसाठी गोठा ३० हजार रुपये, स्‍वयंचलित चारा कटाई यंत्र २५ हजार रुपये, खाद्य साठविण्‍यासाठी शेड २५ हजार रुपये, ५.७५ टक्‍के (+१०.०३ टक्‍के सेवाकर) दराने तीन वर्षाचा विमा १५ हजार १८४ रुपये अशी एकूण ३ लक्ष ३५ हजार १८४ रुपये सहा संकरित गायी/म्‍हशींच्‍या एका गटाची किंमत ठरविण्‍यात आलेली आहे.

Monday, September 13, 2010

दुग्धव्यवसायाने दिली समृध्दी / Dairy helps farmer.



बचतगट हा शब्द कोल्हापूर जिल्ह्यात परवलीचा शब्द झाला असून ही चळवळ आज जिल्ह्यातील खेडोपाडी रुजली आहे. ही चळवळ ग्रामीण जनतेचा श्वास बनली आहे. लोणची, पापडाच्या पारंपरिक जोखडातून मुक्त होवून चळवळीने आता खेडोपाडी चालणार्‍या सर्व व्यवसायात आपले स्थान पक्के केले आहे. महिलांच्या मनात तर या चळवळीने आपुलकीचे स्थान मिळवले आहे.

राधानगरी तालुक्यातील कुडुत्री गावच्या बचतगटाने म्हैस पालनाचा उपक्रम राबवून आज जिल्ह्यात एक आदर्शगट म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या उपक्रमामुळे आज हा गट महिलांची उन्नती साधणारा, त्यांना स्वावलंबी बनवणारा उपक्रमशील बचतगट म्हणून जिल्ह्यात ओळखला जात आहे.

गावातील एक धडाडीचे कार्यकर्ते रामचंद्र चौगुले यांनी पुढाकार घेवून महिलांच्या बैठका घेवून, त्यांना प्रोत्साहन देवून ७ डिसेंबर २००६ रोजी या बचतगटाची स्थापना केली. सुरवातीला महिलांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता. परंतु त्यांचे मन वळविण्यात त्यांना यश आले. मालुबाई डवर या एका उत्साही गावच्या महिलेस त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावयास लावून बचतगटाच्या कामकाजासंबंधी माहिती दिली. या गृहिणीने मग आपल्या गावातील भगिनींचे मन वळविण्याचे काम केले. यातूनच छाया मोहिते, अनुराधा कांबळे, छाया चौगुले, सुजाता डवर, सुलोचना डवर, अनुसया चौगुले, आनंदी जाधव अशा काही महिला एकत्र आल्या. सुरवातीस प्रथम मासिक ३० रुपये वर्गणी भरुन बचत गटाच्या कार्याचा शुभारंभ त्यांनी केला. अवघ्या पाच महिन्यातच गटाच्या अंतर्गत कर्ज देत छोटे मोठे व्यवसाय करत नियमीतपणे कर्जफेड करुन गटास त्यांनी उर्जितावस्था आणली.

गटाची ही चांगली कामगिरी पाहून राधानगरी पंचायत समितीनेही मग ग्रामीण विकास यंत्रणेकडून बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचे कर्ज गटास दिले. हे ही कर्ज या गटाने अवघ्या सहा महिन्यात फेडून बँकेचा आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा विश्वास संपादन केला. बँकेने गटाच्या अध्यक्षा मालुबाई डवर यांना बोलवून अधिक कर्ज देण्याची आपली तयारी दर्शवली. डवर बाईंनी आपल्या गटातील महिलांशी सल्लामसलत केली. गटविकास अधिकारी जी. एम. जाधव, ग्रामसेवक निलकंठ चव्हाण आणि सरपंच श्रीमती भारती रानमाळे यांचे मार्गदर्शन घेवून दुग्धव्यवसाय करण्याचा मानस व्यक्त केला. म्हैसपालन व्यवसायही या जिल्ह्यात चांगलाच चालतो. त्यामुळे गटाने हा उपक्रम करण्याचे निश्चित केले. गटातील सर्व महिलांना विश्वासात घेवून प्रत्येकी एक म्हैस घेण्यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज दिले. दहाही सदस्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेवून हा व्यवसाय सुरु केला. हा गट गावातील डेअरीस दररोज सरासरी १५० ते २०० लिटर दुध देत असतो. हे अडीच लाखाचे कर्ज या गटाने मुदतीआधीच फेडले. त्यामुळे या गटाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सामाजिक कार्यातही हा गट मागे नाही. केवळ आपली प्रगती साधून हा गट गप्प बसला नाही तर सामाजिक बांधिलकी ओळखून गरीब, गरजू, बेरोजेगार महिलांच्या उन्नतीसाठीही हा गट कार्य करत आहे. शिवण क्लासचे वर्ग हा गट चालवित आहे. निर्मलग्राम, तंटामुक्त ग्राम योजना, दारुबंदी, गुटखा, मटकाबंदी आदी कार्यातही हा गट सहभागी होवून कार्य करीत आहे. विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देवून त्यांना या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न हा गट करत आहे. या गटाच्या महिलांना वेळोवेळी दिलेल्या प्रशिक्षणामुळे हा गट म्हणजे महिला बळकटीकरणाचे एक सक्षम उदाहरण ठरले आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती