Thursday, January 27, 2011

कृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का ?

कृषी विद्यापीठे ही पांढरे हत्ती झाली आहेत इथपासून ते कृषी विद्यापीठे आता शेतकऱ्याच्या बांधावर इथपर्यंत घोषणा आपण ऐकल्या आहेत. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात व विशेष म्हणजे महाराष्ट्रात अशी कृषी विद्यापीठे काय करतात व त्याचा लाभ कितपत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला याचा शोध घ्यावा लागेल. हे खरे असले तरी कृषी विद्यापीठे व तेथील संशोधकांनी केलेले काम दुर्लक्षित करताही येणार नाही. वस्तुत: कृषी विद्यापीठांचे काम, तेथील संशोधन अजूनही पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे अशी काही व्यवस्था करण्याची गरज आहे, हाच मुद्दा मुळात दुर्लक्षित राहिला. जे शेतकरी कृषी विद्यापीठाच्या संपर्कात आले, त्यांना हवी ती माहिती मिळते. बाकीचे शेतकरी कोरडेच. म्हणजे शेतकरी कृषी विद्यापीठाकडे आला तर त्याला माहिती मिळते. असे शेतकरी थोडकेच असतात, हे वेगळे सांगायला नको. खेडय़ापाडय़ात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात जे बियाणे पडते, त्याचे मूळ कृषी संशोधकांपर्यंत पोहोचते. या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारणच आहे. ते केवळ शेतकऱ्यांसाठी नव्हे तर मानवसमाजासाठी ते महत्त्व तितकेच असाधारण आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात कोणीही जाऊन तेथील रानटी तुरीची संवर्धित झाडे पाहावी. सात-आठ प्रकारच्या या रानतुरी पाहून कोणी तुरीच्या डाळीचे वरण खाण्याचेही मनात आणणार नाही. याच मूळ वाणांच्या आधाराने संकर करून नवनव्या तुरीच्या वाणांची निर्मिती केली जाते. हे सारं लक्षात घेतल्यावर कृषी संशोधकांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही, हे स्पष्ट आहे. या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक गोष्टींच्या मुळाशी आपल्याला जाता येते.
मध्यंतरी पुण्याच्या माहिती विभागाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. या कृषी विद्यापीठाचे काम मोठे आहे, यात शंका नाही. तब्बल आठ हजार एकराचा विस्तार घेतलेले हे विद्यापीठ वेगवेगळय़ा पातळय़ांवर काम करते आहे. अगदी घरगुती वाटाव्यात अशा काही अडचणी असल्या तरी आपण घरात जशी अडचण सोडवतो, तशाच पद्धतीने अडचणीतून मार्ग काढताना तेथे संशोधकही मागे राहात नाहीत, याचे अप्रूप वाटावे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद