Wednesday, September 7, 2011

संघर्षाने मिळवली डाळिंबाला बाजारपेठ


सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञानाला मेहनतीची जोड मिळाल्यानंतर काय किमया होऊ शकते, याची प्रचिती मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी येथील विठ्ठल कारंडे या तरुण शेतक-याने डाळिंब शेतीतून दाखवून दिली आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी बाजार पेठेप्रमाणे पीकपध्दतीत बदल करताना दिसत आहेत. विशेषत: डाळिंबासारखे नगदी पीक काही शेतक-यांना खुणावताना दिसत आहे. मात्र, या पिकामध्ये रोगाची समस्या वाढली असल्याने शेतक-यांना बाजारपेठ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अर्थात, सर्व समस्यांवर मात करुनही हे पीक यशस्वी करणारे शेतकरीही पाहण्यास मिळतात.

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यात वडाचीवाडी हे गाव आहे. येथील विठ्ठल कारंडे हे त्यापैकीच एक उदाहरण म्हणावे लागेल. २००४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यांतर नोकरीपेक्षा घरच्या शेतीलाच त्यांनी पसंती दिली. परंतू तेच तेच करण्यापेक्षा शेतीत नवे काही करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यातूनच त्यांच्या परिसरातील अरण येथील प्रयोगशील शेतकरी हणमंत गाजरे यांची डाळिंबाची शेती त्यांनी पाहिली. प्रयोगासाठी प्रेरणा मिळाली आणि सुरु झाला विठ्ठल यांचा डाळिंब शेतीतील प्रवास. त्यातच सोलापूरच्या कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी त्यांचा संवाद वाढला. कृषी विज्ञान केंद्राने मध्ये मृग बहार तेल्या रोग व्यवस्थापन अंतर्गत प्रात्यक्षिक घेतले.या प्रात्यक्षिकामध्ये विठ्ठल हे लाभार्थी होते. त्यानंतर केंद्राचे प्रमुख समन्वयक प्रा. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ प्रा. सय्यद शाकिर अली, किरण जाधव यांनी त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे(आयसीएआर) महासंचालक डॉ.एस.अय्यप्पन यांनी सोलापूर दौ-यात आवर्जून विठ्ठलच्या बागेला भेट दिली. त्या वेळी बागेची घेतलेली काळजी पाहून अय्यप्पन यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर थोडी- थोडकी नव्हे, तर तब्बल सहा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. माढा तालुक्यातील तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या चुका सुधारतानाच नव्याने काही नियोजन केले. पुण्यासह कोलकत्याच्या बाजारपेठेतही डाळिंबे पाठविली. तिथे ८७ ते १४५ रुपयांपर्यंत प्रति किलो भाव मिळाला. त्यातूनच त्यांनी दोन वर्षात १ लाख २० हजार रुपये निव्वळ नफा मिळवला. नैसर्गिक आपत्तीवर मात करीत आणि संघर्षाने बाजारपेठ मिळवित विठ्ठलने एक नवा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद