Sunday, August 21, 2011

हिरवाई नर्सरी




एकीचे बळ हे नेहमीच मोठे असते. या बळातून सर्वसामान्य माणसेसुध्दा सहजपणे एखादे मोठे काम करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, ता. मालवण येथील सात मित्रांनी एकत्र येत या एकीच्या बळावरच हिरवाई नर्सरी फुलविली आहे.

कट्टा येथील विकास म्हाडगुल, किशारे शिरोडकर, शरद बोरसकर, दीपक पावसकर, राघो गावडे, महेंद्र माणगावकर व नारायण बिडये हे बालमित्र. लहानपणापासून एकत्र खेळले, बागडले. महाविद्यालयीन शिक्षणही एकत्रित पूर्ण केले. एकदुसऱ्याच्या सुखदु:खात सहभागी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो-तो पोटापाण्यासाठी नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. सुदैवाने सर्वांनाच चांगली नोकरीही मिळाली. लौकिक अर्थाने प्रत्येकजण आपल्या संसारात रममाण झाला.

मात्र या सर्व रहाटगाड्यात एकमेकांची व गावाची नाळ तुटल्याची खंत त्यांना स्वस्थ बसू देईना. यासाठी सर्वांनी एकत्र येत गावाकडे काहीतरी निर्माण करावे जेणेकरून वर्षातून एकदा काही दिवस सर्व मित्रांना सहकुटूंब एकत्र जमता येईल व बालपणीच्या आठवणींना उजाळा देता येईल या भावनेतून त्यांनी १९९० साली मालवण तालुक्यातील गोळवण गावात सुमारे ३५ एकर जागा खरेदी केली. मात्र या जागेवर नेमके काय करायचे याविषयी काहीच निश्चित नव्हते. शासनाने फलोत्पादन विकासासाठी १०० टक्के अनुदान योजना चालू केली होती. या योजनेचा लाभ घेत त्यांनी ३५ एकर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा फळझाडांची लागवड केली. मात्र सुरुवातीला देखभालीअभावी यातील बरीचशी झाडे मरुन गेली. मात्र यामुळे हार न मानता या सातही जणांनी दुसऱ्या वर्षी स्वखर्चाने पुन्हा नव्याने लागवड केली. यावेळी बागेच्या देखभालीसाठी कृषी पदवीधर तरुणाची नेमणूक केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली बागेचा विकास होऊ लागला.

बागेतून बऱ्यापैकी उत्पन्नही मिळू लागले. याचवेळी परिसरातील सर्वसामान्यांना रोजगार देण्यासाठी काय करता येईल याबाबत त्यांनी विचार सुरु केला व यातूनच हिरवाई नर्सरीचा जन्म झाला. सन १९९४ साली कृषी विभागाकडून रीतसर नर्सरी परवाना घेऊन नर्सरी चालू केली. नर्सरीत आंबा, काजू, आवळा, चिकू यासारख्या फळझाडांची निर्मिती होऊ लागली. दर्जेदार व खात्रीशीर कलमे माफक दरात मिळू लागल्यामुळे अल्पावधीतच नर्सरी प्रसिध्दीस आली.

कलमांची गुणवत्ता टिकून रहावी, यासाठी नर्सरीत मातृवृक्षांची लागवड करण्यात आली. नर्सरीच्या या गुणवत्तेमुळे दरवर्षी कर्नाटक, ओरिसा आंध्रप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आसाम या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात काजू व आंबा कलमे निर्यात केली जातात. या नर्सरीमुळे परिसरातील ५० लोकांना थेट रोजागार उपलब्ध झाला आहे. नर्सरीला अनेक कृषी तज्ज्ञ, उद्योजक, राजकीय नेते यांनी भेट देऊन नर्सरीचे कौतुक केले. गेली २१ वर्षे या सातही मित्रांची एकजूट अबाधित आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद