Thursday, August 25, 2011

सांगलीत मोबाईलवर पूर्व सूचना देणारी हवामान केंद्रे

सांगली जिल्ह्यातील बागायतदारांची हवामान केंद्र सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने मान्य केली असून जिल्ह्यात एकाच दिवशी १६ हवामान केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. देशातील हा पहिलाच महत्वाकांक्षी प्रयोग आहे. मानवी शरिरास जशी अन्न, पाण्याची गरज असते त्याचप्रमाणे शेतीलाही योग्य असे हवामान लागते. योग्य हवामानाअभावी शेती करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. द्राक्षासारख्या संवेदनशील नगदी पिकाच्या बाबतीत हवामानाची माहिती मिळणे ही अत्यावश्यक बाब आहे. या सर्व अंतर्गत बाबी लक्षात घेऊनच जिल्ह्यात १६ केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ९ कि.मी. क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर हवामानाची पूर्वसूचना मिळणार आहे.

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार संघाकडून या उपक्रमाचे स्वागतच झाले आहे. गेली अनेक वर्षे या केंद्राची मागणी सातत्याने त्यांच्याकडून केली जात होती. लोकाभिमुख प्रशासनाला चालना देणारे सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी ही मागणी त्वरीत मान्य करुन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना या बाबतची कारवाई करण्यास सांगून प्रस्ताव तयार केला गेला होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण कामासाठी राखून ठेवलेल्या निधीतून ३० लाख रुपये देण्यात आले होते. द्राक्ष संशोधन केंद्रानेही या नाविन्यपूर्ण कामास त्वरित मान्यता देऊन आवश्यक ते सहकार्य देण्याचे मान्य केले.
या हवामान केंद्रासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार म्हणाले की, या हवामान केंद्रांना प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला आहे. निविदा मागवून एका खाजगी कंपनीव्दारे या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

या केंद्रामुळे ९ कि.मी. परिघातील शेतकऱ्यांना हवेतील आर्द्रता, पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा, ढगांतील पाण्याचे प्रमाण अशा आठ गोष्टींची माहिती दर तासाला शेतकऱ्यांना मिळेल. पुणे आणि कोलकत्ता येथून ही सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाची झालेली हानी लक्षात घेता पुढील वर्षी या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती दक्षता घेता येईल. पिकाची हानी टाळता येईल. इकडेही श्री. बिराजदार यांनी लक्ष वेधले.

द्राक्ष पिक हे या जिल्ह्याचे मुख्य बागायती पिक आहे. त्यामुळे ही केंद्रे उभारताना ज्या ज्या भागात हे पिक घेतले जाते त्या त्या भागात ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही केंद्रे उभारण्यामागे श्री. वर्धने यांनी व्यक्तिगत केलेले परिश्रम कारणीभूत आहेत. अवकाळी पावसाने द्राक्ष पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्ह्यात दौरा काढून त्यांनी केली होती. तसेच केंद्रीय पथकास पाचारण करुन त्या पथकाचाही सल्ला घेण्यात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

जिल्ह्यातील मणेराजूरी, सावळज, निमणी, कवठेएकंद, पलूस, आगळगाव, बिळूर, जत, सोनी, सुभाषनगर, वाळवा, पळशी, शिराळा, शिवणी, कडेगाव येथे ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करु शकतील. तसेच पर्यायाने आवश्यक ती उपाययोजना केल्यामुळे त्यांच्या उत्पादनातही वाढ होईल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद