Friday, July 22, 2011

धडपडणाऱ्या युवकाची कृषी भरारी




उस्मानाबाद जिल्हा तसा कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र साठवण तलाव, बंधारे यांच्या माध्यमातून सिंचनाचे प्रयत्न होत आहेत. त्याची फलनिष्पत्ती हळूहळू दिसायला लागली आहे. पाण्याचा योग्य उपयोग करुन काही ठिकाणी फुललेली शेती हे त्याचे बोलके उदाहरण आहे. कळंब तालुक्यातील शिरढोण गावच्या राजेंद्र मुंदडा या युवकाची कहाणीही अशीच आहे. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कष्टाची तयारी आणि सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती यामुळे फायदेशीर व नफ्याची शेती हा मंत्र राजेंद्र मुंदडा यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे.

श्री. मुंदडा यांच्याकडे तशी मुबलक शेती आहे. याच शेतीत त्यांनी अनेकविध प्रयोग करुन आणि वेगवेगळी शेतपिके घेऊन भरघोस उत्पन्न कमावले आहे. शेतीत स्वत: राबून मिळालेले हे यश आहे, असे ते नम्रतापूर्वक सांगतात. आपल्याला कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही, हे त्यांचे साधे सूत्र आहे. त्याच्या जोरावरच त्यांचे शेतीतील प्रयोग सुरु आहेत.


श्री. मुंदडा व त्यांच्या कुटुंबाकडे ५८ हेक्टर शेती आहे. तेथे त्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन पध्दतीने पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातील ८० एकर क्षेत्रात सन २००३-०४ यावर्षी त्यांनी केशर जातीच्या आंब्याची लागवड केली. पूर्णपणे सेंद्रिय शेती पध्दतीने त्यांनी जमिनीची जोपासना केली असून त्यावरच या केशर आंब्याची लागवड केली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राजेंद्र मुंदडा यांनी कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून जवळपास ५ टन आंबा अमेरिकेला पाठवला. विशेष म्हणजे त्यांच्या आंब्यास लातूर, नाशिक, पुणे, बीड, सोलापूर येथील बाजारपेठेतही चांगला प्रतिसाद मिळाला. शेतीतील अनेकविध प्रयोगांबद्दल त्यांना जिल्हा परिषदेनेही यावर्षी कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविले आहे.

आत्मविश्वास, परिश्रम, जिद्द आणि सतत नवे शिकण्याची उर्मी यातूनच त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग केले. कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनीही त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या जिद्दीचे आणि प्रयोगाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे राजेंद्र मुंदडा यांनी आंब्याबरोबरच ३५ एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड केली आहे. मोसंबीच्या पिकामध्ये हरभऱ्याचे आंतरपीक त्यांनी घेतले आहे. यातून एकरी १५ क्विंटल एवढे उत्पन्न त्यांनी काढले आहे.

याशिवाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पशुधनाचीही जोपासना केली आहे. त्यांनी सध्या ७० जनावरे पाळली आहेत. त्यातूनच इंधनाची बचत करण्यासाठी त्यांनी बायोगॅस संयंत्र बसवले आहे. त्याचबरोबर शेतजमिनीला नैसर्गिक सेंद्रिय खतही उपलब्ध झाले आहे. कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रास सतत भेटी, कृषी शास्त्रांचे मार्गदर्शन यातून नवे शिकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. हीच वृत्ती त्यांना यशाचे नवे नवे दालन खुले करुन देत आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद